शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चांदोली धरणातून पाण्यासाठी हवेत १५०० कोटी, मदनभाऊ युवा मंच आक्रमक

By शीतल पाटील | Updated: December 2, 2023 13:50 IST

वारणा नदी की धरण वाद पेटणार

शितल पाटील

सांगली : सांगली व कुपवाड शहराला चांदोली धरणातून पाणी मिळावे, की वारणा नदीतून हा वाद नजीकच्या काळात चांगलाच पेटणार आहे. चांदोली धरणातून पाणी आणण्यासाठी जवळपास १,५०० कोटीची गरज भासणार आहे. याशिवाय देखभाल दुरूस्तीचा प्रश्न वेगळाच आहे. त्याऐवजी वारणा नदीतून पाणी देण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मदनभाऊ युवा मंचाने आक्रमक भूमिका घेतली आहे.कृष्णा नदी कोरडी पडत आहे. शिवाय कृष्णेच्या प्रदूषणात वाढ झाल्याने २००६ साली तत्कालीन मंत्री मदनभाऊ पाटील यांनी वारणा पाणी योजना आखली होती. पण, त्यानंतर महापालिकेत सत्ताबदल झाल्याने वारणा नदीतून पाणी उचलण्याची योजना बारगळली. आता पुन्हा या योजनेची गरज भासू लागली आहे. त्यासाठी मदनभाऊ युवा मंचाने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. समडोळी येथून वारणा नदीतून पाणी उपसा केले जाणार होते. पण समडोळीकरांनी विरोध केल्याने आता हरिपूर हद्दीतून पाणी उचलण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.अनेक अडथळे त्यात नागरिक जागृती मंचाने चांदोली धरणातून पाणी आणण्याची मागणी लावून धरली आहे. पण त्यासाठी येणारा खर्च पाहता धरणातून पाणी सांगलीकरांच्या दारापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे आहेत. जवळपास १०० किलोमीटरहून पाणी आणावे लागणार आहे. त्यासाठी शासनाकडून निधी मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. त्याऐवजी १० किलोमीटरवर असलेल्या वारणा नदीतून पाणी उचलून सांगली व कुपवाडला देणे संयुक्तिक ठरणार असल्याचे मतही काही तज्ज्ञांनी व्यक्त केले.

वारणेसाठी २७० कोटीवारणा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी २७० कोटीचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यात १० किलोमीटरची साडेतीन फूट पाइपलाइन, दोन टंकवेल, एक जॅकवेल, बारा ठिकाणी पाण्याच्या टाक्या, गावठाणमध्ये जुन्या जलवाहिन्या बदलण्यासह कृष्णा नदीवर छोटा पूल उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

चांदोलीसाठी १,५०० कोटीसांगली ते चांदोली धरणापर्यंतचे अंतर जवळपास ११० ते ११७ किलोमीटर आहे. प्रत्येक किलोमीटरला ९ कोटीचा खर्च धरला तर जवळपास १,०५३ कोटी रुपये केवळ पाइपलाइनसाठी लागतील. याशिवाय विविध परवाने, सर्वेक्षण, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई हा खर्च पाहता ही योजना दीड हजार कोटीपर्यंत जाऊ शकते.

महापालिकेवर आर्थिक भारवारणा पाणी योजनेसाठी महापालिकेवर ८१ कोटींचा बोजा पडणार आहे. तर चांदोलीतून पाणी आणण्यासाठी जवळपास ४०० कोटींचा भार पालिकेवर येईल. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता ४०० कोटी रुपयांचा हिस्सा देणे अशक्यप्राय आहे.

पाण्याचा हार्डनेस किती?सध्या महापालिका कृष्णा नदीतून पाणी उचलते. या पाण्याचा शुद्धीकरणानंतरचा हार्डनेस २८४ ते ३५० दरम्यान आहे. महापालिकेने अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. तेथील पाणी जुन्या जलशुद्धीकरण केंद्रापेक्षा चांगले आहे. वारणा नदीच्या पाण्याचा हार्डनेस ७६ इतका आहे. कृष्णेपेक्षा वारणेचे पाणी शुद्ध आहे. त्यामुळे वारणा नदीतून पाणी उचलणेच योग्य ठरणार आहे.

चांदोली धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला आमचा विरोध नाही. परंतु, तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या या योजनेत अनेक अडचणी आहेत. शहरातील जलवाहिन्यांची गळती काढण्यासाठी महापालिकेकडे कामगार नाहीत, तिथे धरणातून आलेल्या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती होईल का, याचा विचार करावा. धरणातून पाणी आणण्यासाठी किती वर्षे जातील, याचा नेम नाही. काही जण वारणा योजना होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. या योजनेला खो बसल्यास त्या पापाचे धनी कोण? वारणा योजना मदनभाऊंच्या नावे असल्याने काहींना पोटशूळ आहे. या झारीतील शुक्राचार्यांनी चांदोली धरणातून पाणी आणण्याची योजना कधी पूर्ण होणार हे जाहीर करावे. - आनंद लेंगरे, जिल्हाध्यक्ष, मदनभाऊ युवा मंच.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी