शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणातून पाण्यासाठी हवेत १५०० कोटी, मदनभाऊ युवा मंच आक्रमक

By शीतल पाटील | Updated: December 2, 2023 13:50 IST

वारणा नदी की धरण वाद पेटणार

शितल पाटील

सांगली : सांगली व कुपवाड शहराला चांदोली धरणातून पाणी मिळावे, की वारणा नदीतून हा वाद नजीकच्या काळात चांगलाच पेटणार आहे. चांदोली धरणातून पाणी आणण्यासाठी जवळपास १,५०० कोटीची गरज भासणार आहे. याशिवाय देखभाल दुरूस्तीचा प्रश्न वेगळाच आहे. त्याऐवजी वारणा नदीतून पाणी देण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मदनभाऊ युवा मंचाने आक्रमक भूमिका घेतली आहे.कृष्णा नदी कोरडी पडत आहे. शिवाय कृष्णेच्या प्रदूषणात वाढ झाल्याने २००६ साली तत्कालीन मंत्री मदनभाऊ पाटील यांनी वारणा पाणी योजना आखली होती. पण, त्यानंतर महापालिकेत सत्ताबदल झाल्याने वारणा नदीतून पाणी उचलण्याची योजना बारगळली. आता पुन्हा या योजनेची गरज भासू लागली आहे. त्यासाठी मदनभाऊ युवा मंचाने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. समडोळी येथून वारणा नदीतून पाणी उपसा केले जाणार होते. पण समडोळीकरांनी विरोध केल्याने आता हरिपूर हद्दीतून पाणी उचलण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.अनेक अडथळे त्यात नागरिक जागृती मंचाने चांदोली धरणातून पाणी आणण्याची मागणी लावून धरली आहे. पण त्यासाठी येणारा खर्च पाहता धरणातून पाणी सांगलीकरांच्या दारापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे आहेत. जवळपास १०० किलोमीटरहून पाणी आणावे लागणार आहे. त्यासाठी शासनाकडून निधी मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. त्याऐवजी १० किलोमीटरवर असलेल्या वारणा नदीतून पाणी उचलून सांगली व कुपवाडला देणे संयुक्तिक ठरणार असल्याचे मतही काही तज्ज्ञांनी व्यक्त केले.

वारणेसाठी २७० कोटीवारणा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी २७० कोटीचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यात १० किलोमीटरची साडेतीन फूट पाइपलाइन, दोन टंकवेल, एक जॅकवेल, बारा ठिकाणी पाण्याच्या टाक्या, गावठाणमध्ये जुन्या जलवाहिन्या बदलण्यासह कृष्णा नदीवर छोटा पूल उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

चांदोलीसाठी १,५०० कोटीसांगली ते चांदोली धरणापर्यंतचे अंतर जवळपास ११० ते ११७ किलोमीटर आहे. प्रत्येक किलोमीटरला ९ कोटीचा खर्च धरला तर जवळपास १,०५३ कोटी रुपये केवळ पाइपलाइनसाठी लागतील. याशिवाय विविध परवाने, सर्वेक्षण, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई हा खर्च पाहता ही योजना दीड हजार कोटीपर्यंत जाऊ शकते.

महापालिकेवर आर्थिक भारवारणा पाणी योजनेसाठी महापालिकेवर ८१ कोटींचा बोजा पडणार आहे. तर चांदोलीतून पाणी आणण्यासाठी जवळपास ४०० कोटींचा भार पालिकेवर येईल. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता ४०० कोटी रुपयांचा हिस्सा देणे अशक्यप्राय आहे.

पाण्याचा हार्डनेस किती?सध्या महापालिका कृष्णा नदीतून पाणी उचलते. या पाण्याचा शुद्धीकरणानंतरचा हार्डनेस २८४ ते ३५० दरम्यान आहे. महापालिकेने अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. तेथील पाणी जुन्या जलशुद्धीकरण केंद्रापेक्षा चांगले आहे. वारणा नदीच्या पाण्याचा हार्डनेस ७६ इतका आहे. कृष्णेपेक्षा वारणेचे पाणी शुद्ध आहे. त्यामुळे वारणा नदीतून पाणी उचलणेच योग्य ठरणार आहे.

चांदोली धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला आमचा विरोध नाही. परंतु, तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या या योजनेत अनेक अडचणी आहेत. शहरातील जलवाहिन्यांची गळती काढण्यासाठी महापालिकेकडे कामगार नाहीत, तिथे धरणातून आलेल्या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती होईल का, याचा विचार करावा. धरणातून पाणी आणण्यासाठी किती वर्षे जातील, याचा नेम नाही. काही जण वारणा योजना होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. या योजनेला खो बसल्यास त्या पापाचे धनी कोण? वारणा योजना मदनभाऊंच्या नावे असल्याने काहींना पोटशूळ आहे. या झारीतील शुक्राचार्यांनी चांदोली धरणातून पाणी आणण्याची योजना कधी पूर्ण होणार हे जाहीर करावे. - आनंद लेंगरे, जिल्हाध्यक्ष, मदनभाऊ युवा मंच.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी