शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाळवा तालुक्यात ७ दिवसांत १३९२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या ७ दिवसांत १३९२ इतक्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या ७ दिवसांत १३९२ इतक्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ जूनला रुग्णांची संख्या २९१ पर्यंत पोहोचल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते. पुन्हा पुढचे दोन दिवस रुग्णसंख्या ही २००च्या वरच राहिली होती. त्यानंतर १७ जूनपासून या रुग्णसंख्येला उतार लागला आहे. रविवारी २० जूनला ही संख्या ११७ पर्यंत खाली आली होती. गेल्या ७ दिवसांतील मृत्युदराचे प्रमाण १.८६ टक्के इतके होते.

तालुक्यात पहिल्या लाटेपासून आतापर्यंत १८ हजार ७२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील १६ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९२.२९ टक्के इतके आहे. तर आज अखेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्लामपूूर आणि आष्टा या शहरातील १८० जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तालुक्याचा सरासरी मृत्युदर ३.४० टक्के इतका आहे. ग्रामीण भागातील हा मृत्युदर २.४० टक्के तर शहरी भागात त्याचे प्रमाण ०.९९ टक्के इतके कमी राहिले आहे.

वाळवा तालुक्यतील काही गावे ही कोरोनाचे हॉटस्पॉट बनली होती. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही बाब गांभीर्याने घेत प्रशासनाला कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी त्यांनी स्वत: या गावांना भेटी देत तेथील ग्रामस्थांचे मनोधैर्य उंचावतानाच कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले होते. जि.प.चे मुुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दोन वेळा तालुक्याचा दौरा करत आरोग्य यंत्रणेला कामाला लावले होते. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी कोरोनाची तपासणी वाढवितानाच कोरोनाबाधित रुग्णांवर लक्ष केंद्रित केले आहे.