शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वाळवा तालुक्यात ७ दिवसांत १३९२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या ७ दिवसांत १३९२ इतक्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या ७ दिवसांत १३९२ इतक्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ जूनला रुग्णांची संख्या २९१ पर्यंत पोहोचल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते. पुन्हा पुढचे दोन दिवस रुग्णसंख्या ही २००च्या वरच राहिली होती. त्यानंतर १७ जूनपासून या रुग्णसंख्येला उतार लागला आहे. रविवारी २० जूनला ही संख्या ११७ पर्यंत खाली आली होती. गेल्या ७ दिवसांतील मृत्युदराचे प्रमाण १.८६ टक्के इतके होते.

तालुक्यात पहिल्या लाटेपासून आतापर्यंत १८ हजार ७२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील १६ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९२.२९ टक्के इतके आहे. तर आज अखेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्लामपूूर आणि आष्टा या शहरातील १८० जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तालुक्याचा सरासरी मृत्युदर ३.४० टक्के इतका आहे. ग्रामीण भागातील हा मृत्युदर २.४० टक्के तर शहरी भागात त्याचे प्रमाण ०.९९ टक्के इतके कमी राहिले आहे.

वाळवा तालुक्यतील काही गावे ही कोरोनाचे हॉटस्पॉट बनली होती. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही बाब गांभीर्याने घेत प्रशासनाला कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी त्यांनी स्वत: या गावांना भेटी देत तेथील ग्रामस्थांचे मनोधैर्य उंचावतानाच कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले होते. जि.प.चे मुुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दोन वेळा तालुक्याचा दौरा करत आरोग्य यंत्रणेला कामाला लावले होते. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी कोरोनाची तपासणी वाढवितानाच कोरोनाबाधित रुग्णांवर लक्ष केंद्रित केले आहे.