शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

सांगली जिल्ह्यातील १३५ कोटींवरील कामांना आचारसंहितेचा बसणार ब्रेक, निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 14:06 IST

ऑक्टोबर महिन्यात जिल्हा नियोजनची सभा होऊन विकासकामांना नव्याने मंजुरी दिली आहे. या कामांच्या काही निविदा प्रसिद्ध होऊन कामे सुरू करण्याचे आदेश देण्यापूर्वीच ग्रामपंचायत निवडणुकीची बुधवारपासून आचारसंहिता जाहीर झाली आहे.

सांगली : राज्यातील सत्ता बदलाच्या राजकारणांमुळे तीन महिने जिल्ह्यातील विकासकामे थांबली होती. राज्याने निधी खर्चावरील बंदी उठविल्यानंतर विकासकामे सुरू होणार, तोपर्यंत जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे १३५ कोटींवरील विकासकामांना ब्रेक लागला आहे.राज्यातील महाविकास आघाडी जाऊन शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता आली. नवीन सरकारने पूर्वीच्या सरकारच्या सर्वच कामे थांबविल्यामुळे तीन महिने जिल्ह्यातील विकासकामे ठप्प झाली होती. ऑक्टोबर महिन्यात जिल्हा नियोजनची सभा होऊन विकासकामांना नव्याने मंजुरी दिली आहे. या कामांच्या काही निविदा प्रसिद्ध होऊन कामे सुरू करण्याचे आदेश देण्यापूर्वीच ग्रामपंचायत निवडणुकीची बुधवारपासून आचारसंहिता जाहीर झाली आहे.२०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीला निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील ५९ कोटी १३ लाख रुपयांची ४६ कामे थांबली आहेत. शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, समाजकल्याण, छोटे पाटबंधारे विभागाकडील निविदा झालेल्या कामेही थांबवावी लागली आहेत. जिल्ह्यातील जवळपास १३५ कोटी रुपयांच्या कामांना ब्रेक लागला असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील १३५ कोटींच्या कामांना दीड महिन्यात मंजुरी देता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कामांना आचारसंहितेचा अडथळाविभाग             निधीआरोग्य           २६.०० कोटीपशुसंवर्धन        ०१.८१ कोटीग्रामपंचायत      २४.३७ कोटीबांधकाम         १७.७५ कोटीग्रामीण पाणी पुरवठा - ५९.१३ कोटीप्राथमिक शिक्षण - ०७.०० कोटी

निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हानराज्य सरकारमधील सत्ताबदलाचा गोंधळ आणि आता ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू आहे. यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्याच्या विकासकामासाठी मंजूर झालेला निधी वेळेत खर्चाचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. कारण, ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता संपेपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचीही जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागणार आहे. यामुळे विकासकामांना पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक