शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सांगली जिल्ह्यातील १३५ कोटींवरील कामांना आचारसंहितेचा बसणार ब्रेक, निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 14:06 IST

ऑक्टोबर महिन्यात जिल्हा नियोजनची सभा होऊन विकासकामांना नव्याने मंजुरी दिली आहे. या कामांच्या काही निविदा प्रसिद्ध होऊन कामे सुरू करण्याचे आदेश देण्यापूर्वीच ग्रामपंचायत निवडणुकीची बुधवारपासून आचारसंहिता जाहीर झाली आहे.

सांगली : राज्यातील सत्ता बदलाच्या राजकारणांमुळे तीन महिने जिल्ह्यातील विकासकामे थांबली होती. राज्याने निधी खर्चावरील बंदी उठविल्यानंतर विकासकामे सुरू होणार, तोपर्यंत जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे १३५ कोटींवरील विकासकामांना ब्रेक लागला आहे.राज्यातील महाविकास आघाडी जाऊन शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता आली. नवीन सरकारने पूर्वीच्या सरकारच्या सर्वच कामे थांबविल्यामुळे तीन महिने जिल्ह्यातील विकासकामे ठप्प झाली होती. ऑक्टोबर महिन्यात जिल्हा नियोजनची सभा होऊन विकासकामांना नव्याने मंजुरी दिली आहे. या कामांच्या काही निविदा प्रसिद्ध होऊन कामे सुरू करण्याचे आदेश देण्यापूर्वीच ग्रामपंचायत निवडणुकीची बुधवारपासून आचारसंहिता जाहीर झाली आहे.२०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीला निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील ५९ कोटी १३ लाख रुपयांची ४६ कामे थांबली आहेत. शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, समाजकल्याण, छोटे पाटबंधारे विभागाकडील निविदा झालेल्या कामेही थांबवावी लागली आहेत. जिल्ह्यातील जवळपास १३५ कोटी रुपयांच्या कामांना ब्रेक लागला असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील १३५ कोटींच्या कामांना दीड महिन्यात मंजुरी देता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कामांना आचारसंहितेचा अडथळाविभाग             निधीआरोग्य           २६.०० कोटीपशुसंवर्धन        ०१.८१ कोटीग्रामपंचायत      २४.३७ कोटीबांधकाम         १७.७५ कोटीग्रामीण पाणी पुरवठा - ५९.१३ कोटीप्राथमिक शिक्षण - ०७.०० कोटी

निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हानराज्य सरकारमधील सत्ताबदलाचा गोंधळ आणि आता ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू आहे. यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्याच्या विकासकामासाठी मंजूर झालेला निधी वेळेत खर्चाचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. कारण, ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता संपेपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचीही जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागणार आहे. यामुळे विकासकामांना पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक