शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

Sangli: अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे ११ कोटींचे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कधी?

By अशोक डोंबाळे | Updated: September 13, 2024 14:11 IST

शासनाला अहवाल पाठवला 

सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या धुवाॅंधार पावसामुळे मिरज, पलूस, वाळवा, शिराळा तालुक्यांतील सहा हजार १६७.४७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे १० कोटी ९२ लाख ९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठवला आहे. शासनाकडे नुकसानाचा अहवाल पाठवला असला, तरी शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाने बुधवारी राज्य शासनाला अहवाल पाठवला आहे. अतिवृष्टी, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मिरज, शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांमध्ये भाजीपाला, पपई, सोयाबीन, भुईमूग, भात, हळद, मका, केळी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.यामध्ये चार तालुक्यांतील १६ हजार ९९९ शेतकऱ्यांचे सहा हजार १५९.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी १० कोटी ९२ लाख ९ हजार रुपयांची गरज आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्या सहीने बुधवारी शासनाकडे पाठवला आहे.

सर्वाधिक फटका चार तालुक्यांमध्ये (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका -  शेतकरी - संख्या क्षेत्र - नुकसान रक्कममिरज - ४०३२ -  २५८८.९० - ४.४१ कोटीवाळवा - ६१९३ - १६४९.०१ -  ३.६० कोटीशिराळा - ५५०२ - १७१८ - ३.९० कोटीपलूस - १२७२ - २०३.३४ ० - ०.३४ कोटी

कोणत्या पिकांचे नुकसानमिरज : सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग, ऊस, भात, मका, हळद, पपई, केळी.वाळवा : सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग, ऊस, भात, मका, हळद, पपई.पलूस : सोयाबीन, भाजीपाला, ऊस, मका.शिराळा : ऊस, भात.

अशी मिळणार भरपाईबाधित पिकाखालील शेतीला हेक्टरी १७ हजार रुपये तर फळपिकांना हेक्टरी २२ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

फळपिकांचे अत्यल्प नुकसानशिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यांतील ३६ शेतकऱ्यांच्या आठ हेक्टर २२ गुंठे फळपिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी दोन लाख ३३ हजार रुपये निधीची गरज आहे. या निधीची मागणी शासनाकडे केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीfloodपूर