शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सांगली जिल्ह्यात ६० उद्योजकांची १०२५ कोटींची गुंतवणूक, उद्योजकांशी सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 14:07 IST

तीन हजारांवर कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार 

सांगली : जिल्ह्यात विविध प्रकाराचे उद्योग उभारणीसाठी ६० उद्योजकांनी एक हजार २५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी ठेवली आहे. या उद्योगांमुळे जिल्ह्यात जवळपास अडीच ते तीन हजार तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. यासंबंधी ६० उद्योजकांशी शासनाने सोमवारी सामंजस्य करारही झाला आहे. वर्षभरात उद्योगाची उभारणी होणार असून शासनाकडून मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत.टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ उपसा सिंचन योजनांमुळे ओलिताखालील क्षेत्र वाढले आहे. ऊस, द्राक्ष, हळ, मक्याचे क्षेत्र वाढले असून उद्योगासाठी लागणारा कच्चा मालही उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यातून नागपूर ते रत्नागिरी, गुहागर ते विजापूर असे महत्त्वाचे महामार्ग गेले आहेत. रेल्वेमार्गही गतिमान झाला आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक पुढे येऊ लागले आहेत हे जमेची बाजू आहे.झिरान इंडिया, हिंदुस्थान नॉयलॉन, गोदावरी उद्योग, सुदर्शन ॲलिम्युनिअम, द बेस्ट इंडिया, उमेद ग्रुप, भरणी धरण पांडीया, इंडियन ह्यूम पाइप, दांडेकर ग्रुप आदींसह ६० उद्योजकांनी उद्योगाचा विस्तार करण्यासाठी एक हजार २५ कोटी रुपयांची जिल्ह्यात गुंतवणूक करण्याची तयारी ठेवली आहे. या उद्योजकांनी तसा सामंजस्य करार जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून शासनाशी केला आहे. या उद्योगांचा विस्तार वाढल्यानंतर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी दिली.

शासनाकडून जागा, रस्ते, पाणी सुविधा देणार : विद्या कुलकर्णीउद्योजकांनी जिल्ह्यात ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी, असे आमचे उद्दिष्ट होते. पण, उद्योजकांनी जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे. एक हजार २५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी तयारी ठेवली आहे. या उद्योजकांना लागणारी जागा, रस्ते, पाणी, वाहतूक व्यवस्थेसह अन्य मूलभूत सुविधा मिरज, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली