शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सांगली जिल्ह्यात ६० उद्योजकांची १०२५ कोटींची गुंतवणूक, उद्योजकांशी सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 14:07 IST

तीन हजारांवर कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार 

सांगली : जिल्ह्यात विविध प्रकाराचे उद्योग उभारणीसाठी ६० उद्योजकांनी एक हजार २५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी ठेवली आहे. या उद्योगांमुळे जिल्ह्यात जवळपास अडीच ते तीन हजार तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. यासंबंधी ६० उद्योजकांशी शासनाने सोमवारी सामंजस्य करारही झाला आहे. वर्षभरात उद्योगाची उभारणी होणार असून शासनाकडून मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत.टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ उपसा सिंचन योजनांमुळे ओलिताखालील क्षेत्र वाढले आहे. ऊस, द्राक्ष, हळ, मक्याचे क्षेत्र वाढले असून उद्योगासाठी लागणारा कच्चा मालही उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यातून नागपूर ते रत्नागिरी, गुहागर ते विजापूर असे महत्त्वाचे महामार्ग गेले आहेत. रेल्वेमार्गही गतिमान झाला आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक पुढे येऊ लागले आहेत हे जमेची बाजू आहे.झिरान इंडिया, हिंदुस्थान नॉयलॉन, गोदावरी उद्योग, सुदर्शन ॲलिम्युनिअम, द बेस्ट इंडिया, उमेद ग्रुप, भरणी धरण पांडीया, इंडियन ह्यूम पाइप, दांडेकर ग्रुप आदींसह ६० उद्योजकांनी उद्योगाचा विस्तार करण्यासाठी एक हजार २५ कोटी रुपयांची जिल्ह्यात गुंतवणूक करण्याची तयारी ठेवली आहे. या उद्योजकांनी तसा सामंजस्य करार जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून शासनाशी केला आहे. या उद्योगांचा विस्तार वाढल्यानंतर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी दिली.

शासनाकडून जागा, रस्ते, पाणी सुविधा देणार : विद्या कुलकर्णीउद्योजकांनी जिल्ह्यात ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी, असे आमचे उद्दिष्ट होते. पण, उद्योजकांनी जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे. एक हजार २५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी तयारी ठेवली आहे. या उद्योजकांना लागणारी जागा, रस्ते, पाणी, वाहतूक व्यवस्थेसह अन्य मूलभूत सुविधा मिरज, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली