शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

Gauri Pujan 2025: आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:22 IST

गणरायापाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीण गौराईचे स्वागत झाले असून, सोमवारी आज तिचे लाड पुरवले जाणार आहेत.

मुंबई : गणरायापाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीण गौराईचे स्वागत झाले असून, सोमवारी आज तिचे लाड पुरवले जाणार आहेत. दागिन्यांतील, साड्यांतील वैविध्यता, तसेच फराळातील पारंपरिक निराळेपण आणि जागरणांचा खेळ या साऱ्यांचा समावेश असल्याने गौराईच्या आगमनाने गणेशोत्सवातील चैतन्य द्विगुणित झाले आहे. 'आली गौराई अंगणी, तिचे लिंबलोण करा,' असे म्हणत सगळे तिच्या सेवेत गुंतले आहेत. भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करण्यात येते. त्यानुसार सायंकाळी ५:२५ च्या मुहूर्तापर्यंत ज्येष्ठ-कनिष्ठ गौरीचे स्वागत घरोघरी झाले आहे. त्यानंतर सोमवारी गौरी पूजन, तर मंगळवारी विसर्जन होणार आहे.

गौराईच्या पूजेसाठी सोनकी, ताग, शेवंती, करवीर, जुई, जाई, भोपळ्याचे फूल, केवड्याचे पान-फूल, तेरडा, सुपारी, आघाडा, तुळशीपत्राला विशेष मागणी असते. गौराईच्या सजावटीत आणि पूजेत कृत्रिम वस्तूंपेक्षा रानफुलांची सुगंधी आरास केली जाते. त्यामुळे रानफुलांना आणि रानभाज्यांनाही मागणी या दिवसांत वाढते, अशी माहिती जाणकारांनी दिली.

१६ भाज्या, कोशिंबीर, वडे, मिठाई

- गौराई म्हणजे गणपतीची आई. ती माहेरी १ आल्याने तिच्या आगमनापासून विविध फराळ तिच्यासाठी तयार केले जातात. यामध्ये पिठाच्या करंजीपासून ते तिळाचे लाडू, मोदक, बेसन लाडू यांचा समावेश असतो. यामध्ये कमीत कमी १५ ते १६ मिठाई, गोडपदार्थ ठेवण्याची मान्यता आहे.- नैवेद्यासाठी पुरणपोळी, खिरी या 3 मिष्ठान्नाला प्राधान्य दिले जाते. गौरीपूजनाच्या दिवशी विविध ठिकाणी विविध पारंपरिक नैवेद्य दाखवले जात असून, यामध्ये वड्यांपासून पिठलं-भाकरी, सोळा भाज्यांची मिक्स भाजी, धोंडस अशा पदार्थांचा समावेश असतो.-गौरीला विसर्जनाच्या दिवशी दही-भाताचा ३ घास आवर्जून भरवला जातो. तिसऱ्या दिवशी विसर्जनावेळी हळदी-कुंकू, सुकामेवा, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल अशा वस्तू सुतात गुंडाळून गाठी घेण्याची प्रथा आहे.

ओवशाची प्रथागौरी पूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे ओवसा. कोकणात खास करून ही परंपरा आजही जपली जाते. नववधूसाठी पहिला ओवसा फार महत्त्वाचा असतो. सुवासिनी गौरीला ओवसायला येतात. सोन्याचे मणिमंगळसूत्र, चांदीची जोडवी, खण, नारळ, तांदूळ, पानाचा विडा, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारच्या मिठाई, पाच भोपळ्याची पाने आदी वस्तूंनी नवीन सूप सजवून सुवासिनी गौरीभोवती पाच वेळा ओवाळतात. ते सूप गौरी पुढे ठेवतात आणि आशीर्वाद घेतात.

टॅग्स :Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र