शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

रिलेशनशिपमध्ये सतत खटके उडतात तरी 'या' कारणामुळे ब्रेकअप करत नाहीत कपल्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 13:55 IST

कोणतही नातं सुरूवातीला फार सुंदर वाटत असतं. पण बदलत्या वेळेनुसार नात्यांची चकाकी कमी होऊ लागते.

(Image Credit : Fix Your Relationship Advice)

कोणतही नातं सुरूवातीला फार सुंदर वाटत असतं. पण बदलत्या वेळेनुसार नात्यांची चकाकी कमी होऊ लागते. नात्यात अडचणी असतील तर काही कपल्स हे त्यांच्या पार्टनरपासून दूर जातात तर काही कपल्स असेही असतात जे त्यांच्या तणावपूर्ण नात्यात अडकूनच राहतात. कधी विचार केलाय का की, लोक अशा नात्यात का राहातत, जिथे त्यांना केवळ त्रास मिळतो?

(Image Credit : Insider)

यूनिव्हर्सिटी ऑफ उटाहच्या अभ्यासकांनी दावा केला आहे की, काही लोक इच्छा असूनही त्यांच्या पार्टनरला सोडत नाहीत. कारण त्यांना वाटत असतं की, त्यांचा किंवा त्यांची पार्टनर त्यांच्यावर गरजेपेक्षा जास्त अवलंबून आहे. पार्टनरला सोडून ते एकटे राहू शकणार नाहीत.  तर दुसऱ्या काही रिसर्चमधून समोर आलं होतं की, लोक त्यांच्या खाजगी गरजांमुळे पार्टनरला सोडत नाहीत. आणि एका तणावपूर्ण नात्यात इच्छा नसतानाही अडकून राहतात. काही लोकांना एकटेपणाची भीती वाटते, तर काही लोकांना वाटत असतं की, त्यांना दुसरा पार्टनर मिळणार नाही. 

(Image Credit : Power of Positivity)

पण नव्या रिसर्चच्या आधारावर असं म्हटलं जाऊ शकतं की, पार्टनरप्रति सहानुभूतीची भावना असल्याकारणाने लोक पार्टनरसोबत ब्रेकअप करत नाहीत. पर्सनॅलिटी अ‍ॅन्ड सोशल सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, ज्या लोकांना वाटतं की, त्यांचा पार्टनर त्यांच्यावर फार जास्त अवलंबून आहे, ते लोक पार्टनरसोबत ब्रेकअप करत नाहीत. तसेच काही लोक त्यांच्या आनंदाऐवजी पार्टनरच्या आनंदासाठी एका नको असलेल्या रिलेशनशिपमध्ये अडकून राहतात. 

(Image Credit : the-conscious-mind.com)

हा रिसर्च दोन भागांमध्ये करण्यात आला. पहिल्या टप्प्यात १० आठवडे साधारण १,३४८ रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या टप्प्यात ५०० अशा लोकांची माहिती घेतली गेली जे ब्रेकअपबाबत विचार करत होते. 

(Image Credit : Slism)

या रिसर्चचे मुख्य आणि यूनिव्हर्सिटी ऑफ उटाहचे असिस्टंट सायकॉलॉजीचे प्राध्यापक समेंथा जोएल यांचं म्हणणं आहे की, पार्टनरचं स्वत:प्रति समर्पण बघून लोक इच्छा असूनही त्यांच्या पार्टनरसोबत ब्रेकअप करू शकत नाहीत. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपResearchसंशोधन