शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

रिलेशनशिपमध्ये सतत खटके उडतात तरी 'या' कारणामुळे ब्रेकअप करत नाहीत कपल्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 13:55 IST

कोणतही नातं सुरूवातीला फार सुंदर वाटत असतं. पण बदलत्या वेळेनुसार नात्यांची चकाकी कमी होऊ लागते.

(Image Credit : Fix Your Relationship Advice)

कोणतही नातं सुरूवातीला फार सुंदर वाटत असतं. पण बदलत्या वेळेनुसार नात्यांची चकाकी कमी होऊ लागते. नात्यात अडचणी असतील तर काही कपल्स हे त्यांच्या पार्टनरपासून दूर जातात तर काही कपल्स असेही असतात जे त्यांच्या तणावपूर्ण नात्यात अडकूनच राहतात. कधी विचार केलाय का की, लोक अशा नात्यात का राहातत, जिथे त्यांना केवळ त्रास मिळतो?

(Image Credit : Insider)

यूनिव्हर्सिटी ऑफ उटाहच्या अभ्यासकांनी दावा केला आहे की, काही लोक इच्छा असूनही त्यांच्या पार्टनरला सोडत नाहीत. कारण त्यांना वाटत असतं की, त्यांचा किंवा त्यांची पार्टनर त्यांच्यावर गरजेपेक्षा जास्त अवलंबून आहे. पार्टनरला सोडून ते एकटे राहू शकणार नाहीत.  तर दुसऱ्या काही रिसर्चमधून समोर आलं होतं की, लोक त्यांच्या खाजगी गरजांमुळे पार्टनरला सोडत नाहीत. आणि एका तणावपूर्ण नात्यात इच्छा नसतानाही अडकून राहतात. काही लोकांना एकटेपणाची भीती वाटते, तर काही लोकांना वाटत असतं की, त्यांना दुसरा पार्टनर मिळणार नाही. 

(Image Credit : Power of Positivity)

पण नव्या रिसर्चच्या आधारावर असं म्हटलं जाऊ शकतं की, पार्टनरप्रति सहानुभूतीची भावना असल्याकारणाने लोक पार्टनरसोबत ब्रेकअप करत नाहीत. पर्सनॅलिटी अ‍ॅन्ड सोशल सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, ज्या लोकांना वाटतं की, त्यांचा पार्टनर त्यांच्यावर फार जास्त अवलंबून आहे, ते लोक पार्टनरसोबत ब्रेकअप करत नाहीत. तसेच काही लोक त्यांच्या आनंदाऐवजी पार्टनरच्या आनंदासाठी एका नको असलेल्या रिलेशनशिपमध्ये अडकून राहतात. 

(Image Credit : the-conscious-mind.com)

हा रिसर्च दोन भागांमध्ये करण्यात आला. पहिल्या टप्प्यात १० आठवडे साधारण १,३४८ रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या टप्प्यात ५०० अशा लोकांची माहिती घेतली गेली जे ब्रेकअपबाबत विचार करत होते. 

(Image Credit : Slism)

या रिसर्चचे मुख्य आणि यूनिव्हर्सिटी ऑफ उटाहचे असिस्टंट सायकॉलॉजीचे प्राध्यापक समेंथा जोएल यांचं म्हणणं आहे की, पार्टनरचं स्वत:प्रति समर्पण बघून लोक इच्छा असूनही त्यांच्या पार्टनरसोबत ब्रेकअप करू शकत नाहीत. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपResearchसंशोधन