शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विसावं वय तुम्हाला प्रेमाबाबत आणि नात्याबाबत काय शिकवून जातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 15:05 IST

२० वय हे कुणाच्याही आयुष्यातील सर्वात इंटरेस्टींग कालावधी असतो. या वयात व्यावहारीक जगाकडे छोटी छोटी पावले तुम्ही घेत असता आणि याच तुम्हाला तुम्ही ठरवत असता की, तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं आहे.

(Image Credit : thisisinsider.com)

२० वय हे कुणाच्याही आयुष्यातील सर्वात इंटरेस्टींग कालावधी असतो. या वयात व्यावहारीक जगाकडे छोटी छोटी पावले तुम्ही घेत असता आणि याच तुम्हाला तुम्ही ठरवत असता की, तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं आहे. त्यासोबतच तुम्ही तुमचं लव्ह लाइफची हॅन्डल करत असता. त्याला जोडून हार्टब्रेक होणे, संशय, उत्सुकता, हार्मोन्स बदल आणि अशा वेगवेगळ्या भावनांचा खेळ मनात खेळ सुरू असतो. पण हाच तो काळ असतो ज्यात तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळतं ते प्रेमाबाबत आणि नात्यांबाबत. चला जाणून घेऊ या वयात प्रेमाबाबत तुम्ही काय काय शिकत असता. 

प्रेम दुसऱ्यांदा होऊ शकतं

सुरूवातीला सगळ्यांना असं वाटत असतं की, खरं प्रेम आयुष्यात केवळ एकदाच होत असतं. पण हे पुढे खोटं ठरतं. अनेकांनी ब्रेकअप किंवा जी व्यक्ती आपल्याला आवडते त्याकडून नकार येणे हे अनुभवलं असेलच. अशात आपला यावर विश्वास बसतो की, आता आपण पुन्हा प्रेमात पडणार नाही. यावर विश्वास बसतो कारण सिनेमांमधून आपण तेच बघत आलो असतो. पण खऱ्या आयुष्यात ब्रेकअप तुमच्या आयुष्यातील प्रेमाचा शेवट नसतो. उलट त्यानंतर आपण नव्या लोकांना भेटत असतो, तेव्हा तुम्हाला नकळत तुम्ही पुन्हा प्रेमात पडलेले असता.  

खऱ्या गरजांची जाणिव

असं कोणतही पुस्तक नाहीये की, जे तुम्हाला सांगेल की नात्याकडून किंवा पार्टनरकडून काय हवं असतं. हे पाण्यात पडल्यावर पोहणं येण्यासारखं आहे. तुम्ही हळूहळू यात शिरत जाता आणि तुम्हाला कळत जातं. तुम्ही थोडा वेळ काढून विचार केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की, २० व्या वर्षीच तुम्हाला हे कळत असतं की, तुमच्यासाठी काय चांगलं आहे. 

ब्रेकअपच्या त्रासातून बाहेर पडता

बहुतेकांचं पहिलं ब्रेकअप हे २०व्या वयातच होतं. हा सर्वात वाईट असा काळ असतो. तुमचा स्वत:शी लढा सुरू असतो. तुम्हाला वाटत असतं की, आता यातून बाहेर कधीच निघता येणार नाही. किंवा यातून बाहेर कसं निघायचं. सतत तुमच्या एक्सबाबत किंवा सोबत घालवलेल्या क्षणांबाबत विचार करत असता. पण कालांतराने वेळनुसार, तुम्ही यातून बाहेर येता. पण या अनुभवामुळे तुम्ही फार स्ट्रॉग झालेले असता. इथून जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला कशाचाही त्रास होत नसतो. कारण काय तर तुम्ही त्या गोष्टी मागे सोडून आलेले असता.  

जीवनाबाबत सिरीअस

ही २० वयात मिळणारी आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण म्हणता येईल. या कालावधीत तुम्ही तुमच्या लाइफबाबत सिरीअस होऊन विचार करू लागता. काही लोकांना हे ब्रेकअप झाल्यावर कळतं तर काहींना दुसऱ्यांचे अनुभव पाहून शहाणपण येतं. 

नातं केवळ प्रेमापुरतं नसतं

यशस्वी नात्याची रेसिपी केवळ प्रेम या एका गोष्टीमुळे चांगली होत नसते. नातं तेव्हाच चांगलं असतं जेव्हा दोघेही तडजोड करतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांना चांगल्या-वाईटात साथ देतात आणि कधीही एकमेकांची साथ सोड नाहीत. एकमेकांच्या विचारांचा, भावनांचा सन्मा करणे हेही यात महत्त्वाचं ठरतं. या सर्व गोष्टी या वयातच कळायला लागतात. 

नातं हे परीकथेतील प्रेमासारखं नसतं 

प्रेमाची सुरूवात फारच रोमॅंटिक आणि उत्साहाने होते. I love You म्हणून सतत एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणे, लपून भेटणे, किस करणे या सर्व पहिल्यांदाच केलेल्या गोष्टींची आपल्या मनात एक वेगळीच जागा असते. पण ही फेस काही महिन्यांनी नाहीशी होते. कारण तेव्हा दोघेही एकमेकांना आतून बाहेरून ओळखायला लागलेले असता. तेव्हा तुम्हाला कळतं की, प्रेमाचं नातं केवळ परीकथेतील प्रेमासारखं नेहमी गोड गोड असं नसतं. त्यात भांडणं असतात, रूसवे फुगवे असतात, वाद असतात. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप