शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
7
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
8
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
9
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
10
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
11
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
12
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
13
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
15
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
16
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
17
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
18
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
19
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
20
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

विसावं वय तुम्हाला प्रेमाबाबत आणि नात्याबाबत काय शिकवून जातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 15:05 IST

२० वय हे कुणाच्याही आयुष्यातील सर्वात इंटरेस्टींग कालावधी असतो. या वयात व्यावहारीक जगाकडे छोटी छोटी पावले तुम्ही घेत असता आणि याच तुम्हाला तुम्ही ठरवत असता की, तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं आहे.

(Image Credit : thisisinsider.com)

२० वय हे कुणाच्याही आयुष्यातील सर्वात इंटरेस्टींग कालावधी असतो. या वयात व्यावहारीक जगाकडे छोटी छोटी पावले तुम्ही घेत असता आणि याच तुम्हाला तुम्ही ठरवत असता की, तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं आहे. त्यासोबतच तुम्ही तुमचं लव्ह लाइफची हॅन्डल करत असता. त्याला जोडून हार्टब्रेक होणे, संशय, उत्सुकता, हार्मोन्स बदल आणि अशा वेगवेगळ्या भावनांचा खेळ मनात खेळ सुरू असतो. पण हाच तो काळ असतो ज्यात तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळतं ते प्रेमाबाबत आणि नात्यांबाबत. चला जाणून घेऊ या वयात प्रेमाबाबत तुम्ही काय काय शिकत असता. 

प्रेम दुसऱ्यांदा होऊ शकतं

सुरूवातीला सगळ्यांना असं वाटत असतं की, खरं प्रेम आयुष्यात केवळ एकदाच होत असतं. पण हे पुढे खोटं ठरतं. अनेकांनी ब्रेकअप किंवा जी व्यक्ती आपल्याला आवडते त्याकडून नकार येणे हे अनुभवलं असेलच. अशात आपला यावर विश्वास बसतो की, आता आपण पुन्हा प्रेमात पडणार नाही. यावर विश्वास बसतो कारण सिनेमांमधून आपण तेच बघत आलो असतो. पण खऱ्या आयुष्यात ब्रेकअप तुमच्या आयुष्यातील प्रेमाचा शेवट नसतो. उलट त्यानंतर आपण नव्या लोकांना भेटत असतो, तेव्हा तुम्हाला नकळत तुम्ही पुन्हा प्रेमात पडलेले असता.  

खऱ्या गरजांची जाणिव

असं कोणतही पुस्तक नाहीये की, जे तुम्हाला सांगेल की नात्याकडून किंवा पार्टनरकडून काय हवं असतं. हे पाण्यात पडल्यावर पोहणं येण्यासारखं आहे. तुम्ही हळूहळू यात शिरत जाता आणि तुम्हाला कळत जातं. तुम्ही थोडा वेळ काढून विचार केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की, २० व्या वर्षीच तुम्हाला हे कळत असतं की, तुमच्यासाठी काय चांगलं आहे. 

ब्रेकअपच्या त्रासातून बाहेर पडता

बहुतेकांचं पहिलं ब्रेकअप हे २०व्या वयातच होतं. हा सर्वात वाईट असा काळ असतो. तुमचा स्वत:शी लढा सुरू असतो. तुम्हाला वाटत असतं की, आता यातून बाहेर कधीच निघता येणार नाही. किंवा यातून बाहेर कसं निघायचं. सतत तुमच्या एक्सबाबत किंवा सोबत घालवलेल्या क्षणांबाबत विचार करत असता. पण कालांतराने वेळनुसार, तुम्ही यातून बाहेर येता. पण या अनुभवामुळे तुम्ही फार स्ट्रॉग झालेले असता. इथून जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला कशाचाही त्रास होत नसतो. कारण काय तर तुम्ही त्या गोष्टी मागे सोडून आलेले असता.  

जीवनाबाबत सिरीअस

ही २० वयात मिळणारी आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण म्हणता येईल. या कालावधीत तुम्ही तुमच्या लाइफबाबत सिरीअस होऊन विचार करू लागता. काही लोकांना हे ब्रेकअप झाल्यावर कळतं तर काहींना दुसऱ्यांचे अनुभव पाहून शहाणपण येतं. 

नातं केवळ प्रेमापुरतं नसतं

यशस्वी नात्याची रेसिपी केवळ प्रेम या एका गोष्टीमुळे चांगली होत नसते. नातं तेव्हाच चांगलं असतं जेव्हा दोघेही तडजोड करतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांना चांगल्या-वाईटात साथ देतात आणि कधीही एकमेकांची साथ सोड नाहीत. एकमेकांच्या विचारांचा, भावनांचा सन्मा करणे हेही यात महत्त्वाचं ठरतं. या सर्व गोष्टी या वयातच कळायला लागतात. 

नातं हे परीकथेतील प्रेमासारखं नसतं 

प्रेमाची सुरूवात फारच रोमॅंटिक आणि उत्साहाने होते. I love You म्हणून सतत एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणे, लपून भेटणे, किस करणे या सर्व पहिल्यांदाच केलेल्या गोष्टींची आपल्या मनात एक वेगळीच जागा असते. पण ही फेस काही महिन्यांनी नाहीशी होते. कारण तेव्हा दोघेही एकमेकांना आतून बाहेरून ओळखायला लागलेले असता. तेव्हा तुम्हाला कळतं की, प्रेमाचं नातं केवळ परीकथेतील प्रेमासारखं नेहमी गोड गोड असं नसतं. त्यात भांडणं असतात, रूसवे फुगवे असतात, वाद असतात. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप