शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रिलेशनशिप कंटाळवाणं होऊ नये म्हणून विवाहित कपल्सने फॉलो करा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 11:01 IST

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये एकमेकांसाठी वेळ कमी असल्याने लोक निराश असतात आणि अशात तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस सहन करावा लागतो.

Relationship Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक कामासाठी सकाळी घरातून बाहेर पडतात आणि थेट रात्री उशीरा घरी परत येतात. ही लाइफस्टाईल आज कॉमन झाली आहे. या लाइफस्टाईलमुळे लोकांच्या रिलेशनशिप आणि वैवाहिक जीवनावरही वाईट प्रभाव पडत आहे. अनेकदा लोक काम आणि कामाच्या टेंशनमुळे जोडीदाराला अंटेशन देऊ शकत नाहीत. ज्याची त्यांना गरज असते. अडचण ही आहे की, अनेक तास काम करून घरी आल्यावर त्यांच्याकडे जोडीदारासाठी वेळच नसतो.

रिलेशनशिपमध्ये एकमेकांसाठी वेळ कमी असल्याने लोक निराश असतात आणि अशात तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस सहन करावा लागतो. अशात आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुमचं रिलेशनशिप आणि वैवाहिक जीवनातील आनंद कायम ठेवू शकता.

प्रेम कसं कायम ठेवाल

कामाचा भरपूर लोड असूनही अशा अनेक पद्धती आहेत ज्यांद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कनेक्टेड राहू शकता. गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ जोडीदारासाठी काढावा. यादरम्यान फोन दूर ठेवा आणि एकमेकांवर फोकस करा.

या गोष्टी न विसरता करा - भलेही तुम्ही दिवसभर बिझी असता, पण गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी रोज फॉलो केल्या पाहिजे. जसे की, सकाळी सोबत चहा घेणं किंवा वॉक करणं. सोबत जेवण करणं. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पुन्हा जवळ आणतात.

टेक्नॉलॉजीपासून दूर रहा - तुम्हाला तुमच्या जोडीदाराला भेटण्यासाठी कितीही वेळ लागू द्या, पण या दरम्यान मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉप अशा गोष्टी दूर ठेवा. सोबतच हेही गरजेचं आहे की, तुम्ही जोडीदारासोबत असताना शरीराने आणि मनाने त्यांच्यासोबत असावं.

छोटा ब्रेक - रिलेशनशिपमध्ये गरजेचं आहे की, तुम्ही जोडीदारासोबत फिरण्यासाठी थोडा वेळ काढावा. वीकेंड किंवा लॉंग वीकेंड छोट्या ट्रीपचा प्लान करू शकता. याने तुमच्यातील दुरावा कमी होईल.

झोपण्याआधी बोला - रात्री झोपण्याआधी एकमेकांसोबत बोला. एकमेकांना सांगा की, तुमचा दिवस कसा गेला आणि तुमच्यासोबत दिवसभर काय झालं. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप