शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

या कारणांमुळे तरुण-तरुणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे करतात पसंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 13:06 IST

अनेक तरुण-तरुणी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. तरुणांचा कल लिव्ह इन रिलेशनशिपकडे इतका का आहे याची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.  

गेल्या काही वर्षांमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपचं फॅड भारतात चांगलंच वाढलं आहे. याची कारणेही वेगवेगळी असू शकतात. एकतर लग्नातील वेगवेगळ्या अडचणींमुळे तरुणांचा लग्नाबाबत नकारात्मक दृष्टीकोनही बघायला मिळतो. आजकालचे काही किंवा एका क्लासमधील तरूण असा विचार करतात की, लग्न करणे हा त्यांचा खाजगी निर्णय आहे. त्यात घरच्यांनी हस्तक्षेप करु नये. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. तरुणांचा कल लिव्ह इन रिलेशनशिपकडे इतका का आहे, याची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.  

1) एकमेकांना जाणून घेणं

लग्न करण्याआधी एकमेकांना चांगल्याप्रकारे जाणून घेणे हे एक या नात्याचं मुख्य कारण असू शकतं. सोबत राहिल्याने दोघांनाही एकमेकांच्या स्वभावांची, सवयींची माहिती मिळते. त्यानुसार ते ठरवू शकतात की, ते एकमेकांसोबत आयुष्यभर राहू शकतील कि नाही. 

2) प्रेम वाढतं?

बरेच दिवस एकत्र राहिल्याने एकमेकांमधील प्रेम वाढतं असं मानलं जातं. काही प्रमाणात हे बरोबरही असावं. लग्नाआधी दोघांमधील नातं आणखी घट्ट व्हावं हे सुद्धा या नात्यात अडकण्याचं कारण असू शकतं. प्रेम वाढलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही वाढलं तर तेही कळेलच.

3) आर्थिक स्थैर्य

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहताना तरुण-तरुणी दोघेही आपापल्या नोकरीवर निर्भर असतात. एकमेकांवर अवलंबून राहत नसतात. घरातील खर्च वाटला गेला असतो. त्यामुळेही या नात्यात अनेकांना इंटरेस्ट असतो. कारण कोणतही आर्थिक दडपण त्यांच्यावर नसतं. 

4) स्वातंत्र्य

आजकालचे तरुण-तरुणी स्वतंत्र विचारांचे असतात. मुलगा असो वा मुलगी दोघांनाही त्यांचं स्वातंत्र हवं असतं. काही लोकांना लग्न करुन स्वत:ला एका साच्यात बांधून घ्यायचं नसतं. त्यामुळेही काही लोक लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतात. 

5) जबाबदाऱ्यापासून दूर पळणे

आजच्या पिढीतील सर्वांनाच नाही पण काहींना जबाबदाऱ्यांची भीती वाटते. लग्न केल्यास पती-पत्नीवर एकमेकांची जबाबदारी असते. पण लिव्ह-इनमध्ये असं काही नसतं. त्यामुळेही काही तरुण हे नातं स्विकारतात. 

6) घटस्फोटाची गरज नाही

लिव्ह-इनमध्ये पार्टनरसोबत कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही विचार करुन त्याला सोडू शकता. त्यांना जर वाटत असेल की, त्यांचं नातं पुढे जाऊ शकत नाही तेव्हा ते सहज वेगळे होऊ शकतात. 

7) परिवाराचं टेन्शन नाही

अनेकदा काही मुलींना किंवा काही मुलांना पार्टनरच्या फॅमिलीसोबत जुळवून घेण्यास अडचण असते. लग्न झाल्यावर दोन परिवारांची जबाबदारी आपसूक येते. अशात काहींना ही जबाबदारी नको असते. त्यामुळेही काही लोक हे लिव्ह-इनचा मार्ग धरतात. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट