शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

या कारणांमुळे तरुण-तरुणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे करतात पसंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 13:06 IST

अनेक तरुण-तरुणी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. तरुणांचा कल लिव्ह इन रिलेशनशिपकडे इतका का आहे याची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.  

गेल्या काही वर्षांमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपचं फॅड भारतात चांगलंच वाढलं आहे. याची कारणेही वेगवेगळी असू शकतात. एकतर लग्नातील वेगवेगळ्या अडचणींमुळे तरुणांचा लग्नाबाबत नकारात्मक दृष्टीकोनही बघायला मिळतो. आजकालचे काही किंवा एका क्लासमधील तरूण असा विचार करतात की, लग्न करणे हा त्यांचा खाजगी निर्णय आहे. त्यात घरच्यांनी हस्तक्षेप करु नये. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. तरुणांचा कल लिव्ह इन रिलेशनशिपकडे इतका का आहे, याची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.  

1) एकमेकांना जाणून घेणं

लग्न करण्याआधी एकमेकांना चांगल्याप्रकारे जाणून घेणे हे एक या नात्याचं मुख्य कारण असू शकतं. सोबत राहिल्याने दोघांनाही एकमेकांच्या स्वभावांची, सवयींची माहिती मिळते. त्यानुसार ते ठरवू शकतात की, ते एकमेकांसोबत आयुष्यभर राहू शकतील कि नाही. 

2) प्रेम वाढतं?

बरेच दिवस एकत्र राहिल्याने एकमेकांमधील प्रेम वाढतं असं मानलं जातं. काही प्रमाणात हे बरोबरही असावं. लग्नाआधी दोघांमधील नातं आणखी घट्ट व्हावं हे सुद्धा या नात्यात अडकण्याचं कारण असू शकतं. प्रेम वाढलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही वाढलं तर तेही कळेलच.

3) आर्थिक स्थैर्य

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहताना तरुण-तरुणी दोघेही आपापल्या नोकरीवर निर्भर असतात. एकमेकांवर अवलंबून राहत नसतात. घरातील खर्च वाटला गेला असतो. त्यामुळेही या नात्यात अनेकांना इंटरेस्ट असतो. कारण कोणतही आर्थिक दडपण त्यांच्यावर नसतं. 

4) स्वातंत्र्य

आजकालचे तरुण-तरुणी स्वतंत्र विचारांचे असतात. मुलगा असो वा मुलगी दोघांनाही त्यांचं स्वातंत्र हवं असतं. काही लोकांना लग्न करुन स्वत:ला एका साच्यात बांधून घ्यायचं नसतं. त्यामुळेही काही लोक लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतात. 

5) जबाबदाऱ्यापासून दूर पळणे

आजच्या पिढीतील सर्वांनाच नाही पण काहींना जबाबदाऱ्यांची भीती वाटते. लग्न केल्यास पती-पत्नीवर एकमेकांची जबाबदारी असते. पण लिव्ह-इनमध्ये असं काही नसतं. त्यामुळेही काही तरुण हे नातं स्विकारतात. 

6) घटस्फोटाची गरज नाही

लिव्ह-इनमध्ये पार्टनरसोबत कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही विचार करुन त्याला सोडू शकता. त्यांना जर वाटत असेल की, त्यांचं नातं पुढे जाऊ शकत नाही तेव्हा ते सहज वेगळे होऊ शकतात. 

7) परिवाराचं टेन्शन नाही

अनेकदा काही मुलींना किंवा काही मुलांना पार्टनरच्या फॅमिलीसोबत जुळवून घेण्यास अडचण असते. लग्न झाल्यावर दोन परिवारांची जबाबदारी आपसूक येते. अशात काहींना ही जबाबदारी नको असते. त्यामुळेही काही लोक हे लिव्ह-इनचा मार्ग धरतात. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट