शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

फिस्कटलेलं नातं पुन्हा रूळावर आणायचंय? या ६ टिप्सने भरा जीवनात नवा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 13:46 IST

नात्यांचे धागे फारच नाजूक असतात. छोट्या छोट्या चुकांमुळे नाती तुटण्याच्या उंबरठ्यावर येतात. जे नातं तयार करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात ते तुटायला काही मिनिटे पुरेसे असतात.

(Image Credit : IOL)

नात्यांचे धागे फारच नाजूक असतात. छोट्या छोट्या चुकांमुळे नाती तुटण्याच्या उंबरठ्यावर येतात. जे नातं तयार करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात ते तुटायला काही मिनिटे पुरेसे असतात. काही नाती ऐकमेकांमधील असंमजसपणा आणि अहंकार यामुळे तुटतात. त्यामुळे तुमचं नातं टिकवून ठेवण्यासाठी स्वत:वर लक्ष देण्याची गरज आहे. स्वत:च्या जाणून घेण्याची गरज आहे. जेणेकरून तुटणारं नातं वाचवलं जाऊ शकेल.

१) स्वत:ची काळजी

(Image Credit : Magnolia Creek)

जोपर्यंत तुम्ही तुमच्या नात्यात आलेल्या अडचणी समजू शकाल, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. हे असं तुमच्या अहंकारामुळे होतं. नकारात्मकता तुमच्या आत्मविश्वासाला नष्ट करते. त्यामुळे तुमची काय चूक झाली हे समजून घ्या आणि आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी एक्सरसाइज करा. पार्टनरला तुम्ही त्यांचेच असल्याची जाणीव करून द्या. 

२) थेरपी

(Image Credit : Fox Valley Institute)

नातं सांभाळण्यासाठी तुम्ही थेरपीचा आधार घेऊ शकता. यात दोन्ही पक्षांची बाजू समजून घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातो. कारण असं नेहमी होत नाही की, काहीच न बोलता एकमेकांचं म्हणणं समजावं. यासाठी तुम्हाला थेरपीचा आधार घ्यावा लागेल. याने गुंतलेल्या गोष्टी सोडवण्यास मदत मिळते.

३) सकारात्मक व्हा

(Image Credit : Alysia Hamilton)

दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वत: सकारात्मक बना. जेणेकरून तुमच्यात होणारे बदल पाहून पार्टनरला सुद्धा बदलण्याची गरज भासावी. नकारात्मकतेचा पराभव करण्यासाठी सकारात्मकता हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे सकारात्मक गोष्टी बघा, वाचा आणि सकारात्मक विचाराच्या लोकांसोबत रहा.

४) पार्टनरचं ऐका

(Image Credit : Video Blocks)

पार्टनरला ऐकणं सुरू करा. ते काय म्हणताहेत, काय बोलताहेत याकडे लक्ष द्या. त्यांना तुमच्याकडून काय हवंय, त्यांना काय सांगायचंय याकडे लक्ष द्या. वाद कशावरून होतोय त्याचं कारण विचारा. त्यावर चर्चा करा.

५) एकमेकांना दोष देऊ नका

(Image Credit : Radio.com)

कुणालाही चुकीचं ठरवणं फार सोपं असतं. पण याने नात्यात दुरावा येऊ लागतो. कोणत्याही नात्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते. त्यामुळे आपल्या लोकांना चुकीचं ठरवण्याऐवजी आरामात बसून त्यांना त्यांची चूक दाखवा. हेच रागाने सांगाल तर नातं आणखी बिघडू शकतं.

६) जबाबदारी घ्या

(Image Credit : Mike & Susan Dawson)

कोणतंही नातं तयार होण्यास आणि बिघडण्याला दोन लोक जबाबदार असतात. फक्त बघायचं हे असतं की, नकारात्मकतेला नकारात्मकपणे नष्ट करायचंय की, तुमच्याकडून झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायचीय. जर तुम्ही असं कराल तर पार्टनरलाही चांगलं वाटेल आणि नातं पुन्हा रूळावर आणण्यासाठी एक नवं कारण मिळेल.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप