शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

आपल्याच मुलांना ‘नमवण्यात’ काय शौर्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 16:57 IST

तुम्ही जर असं काही करीत असाल, तर गमवाल आपल्या मुलांना..

ठळक मुद्देआपल्याच मुलांना नमवण्यात शूरपणा नाही, पराभव आपलाच आहे.मुलांना अद्वातद्वा बोलू नका आणि त्यांना मारू तर अजिबात नका.पालकांविषयी मुलांच्या मनात एकदा का अढी बसली की ती निघणं महामुष्किल.

- मयूर पठाडे‘नाही ना पप्पा.. नाही ना मम्मी. नाही मी पुन्हा असं करणार. तुम्ही सांगाल ते सगळं ऐकेन. रोज अभ्यास करेन. चांगले मार्क्स मिळवीन.. खरंच सांगतो.. चुकलो, सॉरी..’- अनेक घरांमध्ये आई-वडिलांनी मुलांवर रुद्रावतार धारण केल्यावर हे शब्द ऐकायला येतात. दिनवाणा चेहरा करून आणि रडत रडत मुलं आपल्या जमदग्नी आई-वडिलांसमोर विनवणी करीत असतात आणि पालक मुलावर ओरडत असतात, सांग, करशील पुन्हा असं?.. तोंड उचकटून पुन्हा सॉरी म्हणतो’.. पालकांचा तोंडाचा पट्टा सुरूच असतो..जोपर्यंत मुलाला पूर्ण अर्थानं ‘नमवलंय’ याची खात्री होत नाही, तोपर्यंत पालकांचा तोंडाचा आणि बºयाचदा हाताचा पट्टाही सुरूच असतो. सगळेच पालक असेच असतात असं बिलकुल नाही, पण अनेक घरांत आजही ही स्थिती आहे. कुठल्या ना कुठल्या कारणानं आपल्या मुलाला ‘नमवलं’ तरंच त्यांचा हा राग शांत होतो.अभ्यासकांनीही ही वस्तुस्थितीवर नेमकं बोट ठेवलं आहे आणि याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. जे पालक आपल्या मुलांबाबत असं करत असतील, त्यांनी वेळीच थांबाव, योग्य तो विचार करावा, आपल्या वर्तनात आधी सुधारणा करावी आणि मुलाबाबतचे आपले संबंध तसेच संवाद मधुर करावा असा कळकळीचा सल्लाही त्यांनी दिला आहे.मुलांच्या वर्तणुकीबद्दल आपण नाराज असतो, त्याबद्दल आपण त्रागा करतो, पण आपल्या वर्तनाची आपण कधी तपासणी केलीय? आणि मुलांना, त्यातही आपल्याच मुलांना ‘नमवण्यात’ कुठलं आलंय शौय?.. तेव्हा हा प्रकार ताबडतोब सोडा आणि आपलीही वागणूक ‘सभ्य’ मुलासारखी ठेवा, असं आवाहन अभ्यासकांनी पालकांना केलं आहे.मुलांना मिळत असणाºया वागणुकीबद्दल भले उघडपणे ते काही बोलणार नाहीत, पण पालकांबद्दलचा त्यांच्या मनातला दुरावा आपोआपच वाढत जाईल. नंतरची त्यांची वर्तणूक अत्यंत चांगली असली, तरी जायचा तो तडा जातोच.. त्यामुळे सावधान..