शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मुलं जितक्या लवकर परिसरात मिसळतील, तेवढ्या लवकर त्यांचा मेंदू होईल विकसित..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 4:05 PM

आपलं मूल कोणाशी खेळतंय, यापेक्षाही ते बाहेर जाऊन खेळतं की नाही याकडे द्या अधिक लक्ष..

ठळक मुद्देआपलं मूल कोणत्या मुलांमध्ये खेळतं, कोणाबरोबर राहतं, त्या मुलांचा दर्जा काय, या खरं तर दुय्यम गोष्टी आहेत.घरातले चांगले संस्कार आणि ‘आदर्श’ मुलांना नेहमीच चुकीच्या मार्गापासून दूर राखतात.मुलं जितक्या लवकर परिसरात मिसळतील, तितक्या लवकर ते अधिकाधिक गोष्टी शिकतील.

- मयूर पठाडेमुलं कोणताही खेळ खेळत असो, पण लहानपणापासून ती खेळली पाहिजेत. घराबाहेर पडली पाहिजेत. त्यासाठी त्यांनी अगदी ग्राऊंडवर जाऊन आणि एखादा खेळ सिरिअसली शिकला पाहिजे आणि फॉलो केला पाहिजे असं नाही, पण अगदी गल्लीत का होईना, त्यांनी नियमितपणे आपल्या बरोबरच्या मुलांबरोबर, मित्रांबरोबर खेळलं पाहिजे. ज्या अनेक गोष्टी आपण मुलांना घरात शिकवू शकत नाही, कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी आपण त्यांच्या मनावर बिंबवू शकत नाही अशा अनेक गोष्टी मुलं मित्रांमध्ये शिकतात.शिक्षणतज्ञांचं तर म्हणणं आहे, आपलं मूल कोणत्या मुलांमध्ये खेळतं, कोणाबरोबर राहतं, त्या मुलांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दर्जा काय आहे, या खरं तर दुय्यम गोष्टी आहेत. तुमच्या घरात जर चांगले संस्कार असतील, मुलांशी जर तुम्ही ‘आदर्श’ पद्धतीनं वागत असाल आणि त्यांच्या समोर किंवा नकळत काही चुकीच्या गोष्टी तुम्ही करीत नसाल, तर अशा पालकांना घाबरण्याची काहीच गरज नाही. ‘वाईट’ मुलांच्या संगतीत आपली मुलं बिघडतील असा धोकाही त्यामुळे फारसा उद्भवत नाही. खरंतर कोणतंच मूल वाईट नसतं आणि प्रत्येकांत काही ना काही गुण असतातच.मुलांशी आपले संबंध मात्र खेळीमेळीचे असले पाहिजेत आणि त्यांच्यापासून पालकांनी काही लपवूनही ठेवायला नको. जितक्या लहान वयात मुलं घराबाहेर पडतील, तितक्या लकवर ते सोशल होतीलच, पण अनेक प्रकारच्या गोष्टी ते शिकतील, जे त्यांच्या भविष्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल.संशोधनानं सिद्ध झालं आहे की, जी मुलं लवकर घराबाहेर, मित्रमंडळींमध्ये मिसळतात, त्यांच्यात अनेक प्रकरची स्किल्स डेव्हलप होतात, त्यांची मोटर स्किल्सही इतरांपेक्षा अधिक समृद्ध झालेली असतात. त्यांचा मेंदूही लवकर विकसित होतो आणि त्याचा सुयोग्य प्रकारे वापर करायलाही ती पटकन शिकतात.त्यामुळे आपलं मूल कोणाबरोबर खेळतं यापेक्षाही ते बाहेर जाऊन खेळतं की नाही याकडे जास्त लक्ष द्या. अर्थातच मूल कुठलं चुकीचं पाऊल उचलत असेल, तर त्याकडेही आपलं लक्ष असायलाच हवं..