शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
3
Mumbai on Alert: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
4
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
5
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
6
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
7
"चेंगराचेंगरीतून राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही केलं, पण...", 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेलेल्या तुषार कपूरला आला असा अनुभव
8
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
9
Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक
10
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
11
आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा
12
रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट
13
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
14
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
15
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
16
अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल
17
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
18
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
19
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
20
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."

सिल्व्हर ज्युबिली सेपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2023 12:25 IST

छंद जोपासायचे असतात म्हणूनही ‘सिल्व्हर ज्युबिली सेपरेशन’ आपल्याला पाहायला मिळत आहे.

- ॲड. सुनीता कापरेकर, कुटुंब कायद्याच्या अभ्यासक

काही दिवसांपूर्वी जवळपास ३०-३२ वर्षे संसार केलेल्या जोडप्याचा घटस्फोट झाला. घेण्या-देण्याची काही अट नाही. फक्त घटस्फोट हवा होता आणि एकमेकांपासून विभक्त होऊन स्वतंत्र आयुष्य जगायचे होते. खरं तर वयाच्या साठी-पासष्टीनंतर व्यक्तीला साथीदाराची अधिक गरज असते. २०-२५ वर्षे संसाराचा गाडा सुखानं हाकलल्यानंतर त्याचा मुरंबा झालेला असतो आणि त्याचवेळी काही जोडप्यांना संसाराच्या गाडीची चाके वेगवेगळी करायची असतात. याला वैवाहिक कलह, एका साथीदाराने केलेली प्रतारणा, अशी असंख्य कारणे आहेत. पण आणखी एक कारण पुढे येत आहे, ते म्हणजे संसार करून तृप्त झालेल्या मनाला विरक्तीची आस लागलेली असते. बंधने नको असतात, आयुष्यात तोच तो पणा नको असतो... तारुण्यात अर्धवट राहिलेल्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. छंद जोपासायचे असतात म्हणूनही ‘सिल्व्हर ज्युबिली सेपरेशन’ आपल्याला पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांत तरुणांबरोबरच वयाच्या पन्नाशी-साठीनंतर घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांची संख्याही वाढली आहे. तरुणांनी घटस्फोट घेणे एकवेळ आपण मान्य करतो, पण पन्नाशीनंतर घटस्फोट घेणे आपल्या पचनी पडत नाही. आपल्याकडे ‘सिल्व्हर ज्युबली सेपरेशन’ ही संकल्पना रुजलेली नाही. पाश्चात्य देशात हे सर्रास चालते; पण आपल्याकडेही हे लोण पसरेल की काय?, अशी शंका येते.

काही महिलांनी सुखाच्या संसाराचा आनंद लुटलेला असतो. वयाच्या एका टप्प्यानंतर काही स्त्रियांना पतीच्या सहवास नको असतो. त्यांना संसारातून विरक्ती हवी असते आणि त्या नव्या जीवनाच्या शोधात असतात. संसारिक कर्तव्यातून मोकळ्या झालेल्या स्त्रिया स्वत:च्या स्वातंत्र्यासाठीही घटस्फोट घेत आहेत. पण असे कारण देऊन घटस्फोट मागणाऱ्या स्त्रिया हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत.

चारचौघांत अपमान करणारा नवरा नको 

स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याने त्यांनाही स्वच्छंदी आयुष्य जगायचे असते. पूर्वीसारख्या स्त्रिया पैशांसाठी पुरुषांवर अवलंबून नाहीत. वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यावर त्यांच्याकडे स्थैर्य आलेले असते. त्यामुळे नको असलेल्या नात्याचे ओझे त्या सहजपणे नाकारतात. व्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व पटल्याने ‘लाथ मारेल’ तोच पुरुष असे न मानता ‘बावळट’ म्हणून चारचौघांत अपमान करणारा नवराही सहन होत नाही.

साठीतील घटस्फोटाची काय आहेत कारणे? 

साठीत घटस्फोट घेतलेली चार-पाच जोडपी समोर आली. साधारणत: सर्वांचा ३० वर्षे संसार झाला होता. इतकी वर्षे सोबत राहून यांची मने जुळली नाही का? असा प्रश्न पडला. परंतु, काही कारणे पुढे आली. मुख्य म्हणजे ‘एम्प्टीनेस्ट सिंड्रोम’ रिकामेपण... मुले परदेशात किंवा अन्य ठिकाणी स्थायिक झाली की, भरलेले घरटे रिकामे होते आणि रिकामेपण येते. ते असह्य झाल्याने काहींचे मानसिक स्वास्थ बिघडते आणि त्यातूनही घटस्फोट मागितला जातो. काहीजणांचे विवाह्यबाह्य संबंध असतात, तर काहींच्या घरात वैवाहिक वाद असतात. पण मुलाबाळांकडे बघून संसार रेटला जातो. सासू-सासरे, आई-वडिलांच्या दबावाखाली, हे जोखड घेऊन २५-३० वर्षे कशीबशी काढली जातात. मुले मोठी झाली की, आई-वडिलांची नात्यातील घुसमट पाहून तेच त्यांना विभक्त होण्याचा सल्ला देतात.

 

टॅग्स :Divorceघटस्फोट