शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळत नसेल तर काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 15:09 IST

एखाद्याच्या आयुष्यात नको असलेली व्यक्ती होणे फारच त्रासदायक असतं. खासकरून तेव्हा जेव्हा ती व्यक्ती तुमची पार्टनर असते.

एखाद्याच्या आयुष्यात नको असलेली व्यक्ती होणे फारच त्रासदायक असतं. खासकरून तेव्हा जेव्हा ती व्यक्ती तुमची पार्टनर असते. तुम्हाला भलेही त्या व्यक्तीच्या प्रेमात रहायचं असतं कारण तुम्हाला कुठेतरी असा विश्वास असतो की, भविष्यात ती व्यक्ती तुमची काळजी घेण्यासाठी तुमच्यासोबत असेल. पण प्रत्येकवेळी जसा आपण विचार करतो तसं होतंच असं नाही. ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम असतं अनेकदा त्या व्यक्तीकडून प्रेम मिळत नसतं. ज्याच्यासोबत हे घडतं ती व्यक्ती स्वत:च्या नशीबाला दोष देते. 

तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत आनंदाने जीवन जगायचं असतं, पण तोच उत्साह तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या व्यवहारातून दिसत नाही. हे तर सर्वांनाच माहीत असतं की, रिलेशनशिप यशस्वी ठेवण्यासाठी दोघांनाही पुढाकार घ्यावा लागत असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये असता तेव्हा सुरूवातीला एकमेकांच्या सर्वच गोष्टी चांगल्या वाटू लागतात. पण बदलत्या वेळेनुसार, परिस्थितीही बदलते. 

असंही झालं असेल की, तुम्ही स्वत: त्या स्थितीमध्ये पोहोचले असाल. तुम्ही तुमचा सगळा वेळ केवळ तुमच्या पार्टनरला दिली असेल. पण तसं समोरून झालं नसेल तर तुम्हाला स्वत: विचित्र अडचणीत अडकल्यासारखं वाटतं. अशात हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

जर तुम्ही अशाच काहीशा स्थितीचा सामना करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. यात सर्वात महत्त्वाची ही आहे की, काय खरंच तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी नकोसे झाले आहात?

१) तुम्हाला जाणवत असेल की, पार्टनर तुम्हाला टाळतोय किंवा टाळते.

२) तुम्हाला मिळत नाही त्यापेक्षा जास्त तुम्ही नात्याला देताय. 

३) कडलिंगदरम्यान पार्टनरची चिडचिड होते.

४) तुमचा पार्टनर दुसऱ्यांसोबत फ्लर्ट करतो. 

५) पार्टनर तुमच्यासोबत फार जास्त वेळ घालवत नसेल.

६) बेडरूममध्येही पार्टनरचा फार इंटरेस्ट नसतो. 

७) पार्टनरचा फोन चेक केल्यावर चिडचिड होते

८) पार्टनर तुमच्यासोबत फार जास्त खोटं बोलत असेल

९) तुम्ही रिलेशनशिपमध्ये असूनही एकटेपणा फिल करता.

अशात काय करावं?

अशी परिस्थिती जर समोर असेल तर तुम्ही परिस्थितीला मान्य केल्याशिवाय काही करू शकत नाही. तुम्हाला हे समजून यायला हवं की, तुम्हाला हवं असलेलं प्रेम हे नाही. जेव्हा समोरून याचा खुलासा होईल त्यावेळी अधिकच वाईट वाटेल आणि दु:ख होईल. दोन्हीकडून त्रास तुम्हालाच होणार आहे. 

स्वत:ला माफ करा

सर्वातआधी तर या नात्यात येण्यासाठी स्वत:ला माफ करा. या रिलेशनमधून बाहेर येण्याचा पूर्ण प्रयत्न करा. घाई अजिबात करू नका. यातून सहजासहजी बाहेर पडता येत नाही. पण त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. 

एकट्याने हे ओझं सहन करण्याची गरज नाही

तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, हे ते साधं ओझं नाहीये जे तुम्ही एकट्याने सहन करू शकाल. यासाठी तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची मदत घेऊ शकता. तसेच हे नातं यशस्वी झालं नाही म्हणजे तुम्ही पुन्हा प्रेम करू शकत नाही किंवा तुम्हाला कुणी प्रेम करणारं मिळणार नाही असं नाहीये. आयुष्याच्या वळणांवर तुम्हालाही प्रेम मिळेल.

दुरावा ठेवा

पार्टनरसोबत दुरावा ठेवायला सुरूवात करा. तुम्ही पार्टनरपासून दूर गेल्याशिवाय यातून बाहेर पडूच शकत नाही. जर तुमचं खरंच प्रेम असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर जबरदस्तीने स्वत:ला लादू शकत नाही. 

प्रेमावर ठेवा विश्वास

एकदा वाईट अनुभव आल्यावर तुम्ही हार मानू नये. प्रेमाच्या शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. त्यानेच तुमचा त्रास कमी होईल. प्रेमावरील विश्वास उडू देऊ नका.  

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप