शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

ही लक्षणे दिसतील तर लगेच करा ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 15:35 IST

जसाजसा वेळ पुढे जातो त्या नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. वेळेनुसार, परिस्थितीनुसार सगळं बदलेलं असतं. पार्टनरसोबत असूनही तुम्ही एकटे फिल करू लागता.

अनेकांना प्रेमाचं नातं सुरुवातीला फारच चांगलं, मजेशीर वाटतं. पण जसाजसा वेळ पुढे जातो त्या नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. वेळेनुसार, परिस्थितीनुसार सगळं बदलेलं असतं. पार्टनरसोबत असूनही तुम्ही एकटे फिल करू लागता. त्या नात्यात मग काही अर्थ उरलेला नसतो. अशात वेळीच जर त्यावर काही विचार केला नाही, तर दोघांचही जगणं कठीण होऊन बसतं. चला जाणून घेऊया अशीच काही लक्षण ज्यावरुन तुम्हा दोघात आता आधीसारखं प्रेम राहीलं नाही हे कळू शकतं.

पार्टनरचा चिडचिडपणा वाढणे -

जर तुमच्या पार्टनरची प्रत्येक कामात चिडचिड होत असेल, तुम्हाला टोमणे मारत असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरुन मोठ मोठी भांडणं होत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. असेही असू शकते की, त्याचा/तिचा मूड ठिक नसेल, पण अशा गोष्टी जर पुन्हा पुन्हा होत असतील तर अशा नात्याला किती पुढे घेऊन जायचं याचा विचार करायला हवा.

स्वाभिमान न जपणे - 

कोणत्याही नात्याप्रमाणे प्रेमाच्या नात्यातही ऐकमेकांचा सन्मान करणं महत्वाचं असतं. दोघांचही महत्व सारखं असतं. तुम्ही कोणत्या ना कोणत्या रुपात ऐकमेकांना मदतच करत असता. पण जर तो किंवा ती तुम्हाला कमी लेखत असेल किंवा तुमचा सतत अपमान करत असेल तर तुम्हाला वेळीच या नात्याबद्दल विचार करणे फायद्याचं ठरेल.

स्व:ताला सिद्ध करण्याची खुमखुमी -

नात्यात स्वत:ला सिद्ध करणं हे एक काम संघर्षाचं आणि विनाकारणचं असतं. जर तुमच्यात प्रेम आहे तर कुणाला काहीही सिद्ध करण्याची गरज नसते. पण प्रेमात कमतरता आली तर पार्टनरला काही गोष्टी खटकायला लागतात. अशात पार्टनरसोबत मोकळेपणाने बोलून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. 

नात्यात नाटकीपणा - 

तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत कम्फर्टेबल वाटत नसेल किंवा तुम्हाला माहीत आहे की, सगळं काही ठिक आहे पण काही गोष्टी जबरदस्तीने मान्य करुन तुम्ही आनंदी असल्याचा अभिनय करण्याचा प्रयत्न करत आहात, तर वेळीच याचा विचार करा. खोटं आणि दिखावा असलेलं नातं फार काळ टिकत नाही. 

ऐकमेकांना टाळणं - 

जर तुम्ही विचार करता की, उगाच विषय वाढेल किंवा त्याचा/तिचा मूड ठिक नसल्याने त्याच्या/तिच्याकडे जाण्याची भीती वाटत असेल. किंवा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऐकमेकांना टाळत असाल तर ते नातं तिथेच संपवलेलं बरं. 

केवळ आठवणीच राहिल्या -

जेव्हा तुम्ही विचार करता की, आधी तुम्ही दोघे किती आनंदी, सकारात्मक, उत्साही आणि मोकळे राहत होते. वेळेनुसार ते नातं पूर्णपणे बदललं आहे. जेव्हा पार्टनर सोबत असतो तरी तुम्ही आनंदी राहत नसाल आणि तुम्हाला काहीही बोलण्याआधी विचार करावा लागत असेल तर हे ते नातं संपल्याची लक्षणे आहेत.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट