शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

ही लक्षणे दिसतील तर लगेच करा ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 15:35 IST

जसाजसा वेळ पुढे जातो त्या नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. वेळेनुसार, परिस्थितीनुसार सगळं बदलेलं असतं. पार्टनरसोबत असूनही तुम्ही एकटे फिल करू लागता.

अनेकांना प्रेमाचं नातं सुरुवातीला फारच चांगलं, मजेशीर वाटतं. पण जसाजसा वेळ पुढे जातो त्या नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. वेळेनुसार, परिस्थितीनुसार सगळं बदलेलं असतं. पार्टनरसोबत असूनही तुम्ही एकटे फिल करू लागता. त्या नात्यात मग काही अर्थ उरलेला नसतो. अशात वेळीच जर त्यावर काही विचार केला नाही, तर दोघांचही जगणं कठीण होऊन बसतं. चला जाणून घेऊया अशीच काही लक्षण ज्यावरुन तुम्हा दोघात आता आधीसारखं प्रेम राहीलं नाही हे कळू शकतं.

पार्टनरचा चिडचिडपणा वाढणे -

जर तुमच्या पार्टनरची प्रत्येक कामात चिडचिड होत असेल, तुम्हाला टोमणे मारत असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरुन मोठ मोठी भांडणं होत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. असेही असू शकते की, त्याचा/तिचा मूड ठिक नसेल, पण अशा गोष्टी जर पुन्हा पुन्हा होत असतील तर अशा नात्याला किती पुढे घेऊन जायचं याचा विचार करायला हवा.

स्वाभिमान न जपणे - 

कोणत्याही नात्याप्रमाणे प्रेमाच्या नात्यातही ऐकमेकांचा सन्मान करणं महत्वाचं असतं. दोघांचही महत्व सारखं असतं. तुम्ही कोणत्या ना कोणत्या रुपात ऐकमेकांना मदतच करत असता. पण जर तो किंवा ती तुम्हाला कमी लेखत असेल किंवा तुमचा सतत अपमान करत असेल तर तुम्हाला वेळीच या नात्याबद्दल विचार करणे फायद्याचं ठरेल.

स्व:ताला सिद्ध करण्याची खुमखुमी -

नात्यात स्वत:ला सिद्ध करणं हे एक काम संघर्षाचं आणि विनाकारणचं असतं. जर तुमच्यात प्रेम आहे तर कुणाला काहीही सिद्ध करण्याची गरज नसते. पण प्रेमात कमतरता आली तर पार्टनरला काही गोष्टी खटकायला लागतात. अशात पार्टनरसोबत मोकळेपणाने बोलून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. 

नात्यात नाटकीपणा - 

तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत कम्फर्टेबल वाटत नसेल किंवा तुम्हाला माहीत आहे की, सगळं काही ठिक आहे पण काही गोष्टी जबरदस्तीने मान्य करुन तुम्ही आनंदी असल्याचा अभिनय करण्याचा प्रयत्न करत आहात, तर वेळीच याचा विचार करा. खोटं आणि दिखावा असलेलं नातं फार काळ टिकत नाही. 

ऐकमेकांना टाळणं - 

जर तुम्ही विचार करता की, उगाच विषय वाढेल किंवा त्याचा/तिचा मूड ठिक नसल्याने त्याच्या/तिच्याकडे जाण्याची भीती वाटत असेल. किंवा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऐकमेकांना टाळत असाल तर ते नातं तिथेच संपवलेलं बरं. 

केवळ आठवणीच राहिल्या -

जेव्हा तुम्ही विचार करता की, आधी तुम्ही दोघे किती आनंदी, सकारात्मक, उत्साही आणि मोकळे राहत होते. वेळेनुसार ते नातं पूर्णपणे बदललं आहे. जेव्हा पार्टनर सोबत असतो तरी तुम्ही आनंदी राहत नसाल आणि तुम्हाला काहीही बोलण्याआधी विचार करावा लागत असेल तर हे ते नातं संपल्याची लक्षणे आहेत.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट