शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

नवरा आणि मुलांशिवायही जास्त आनंदी राहू शकतात महिला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 13:01 IST

आपल्या आयुष्यात आनंदाचं वेगवेगळं महत्त्व आहे. खुश राहण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. तसेच आनंदाची वेगवेगळी कारणं असतात. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की, लग्नानंतर महिला नवरा आणि मुलांमध्ये रमतात आणि जास्त खूश असतात.

(Image Credit : https://www.mortgagebrokernews.ca)

आपल्या आयुष्यात आनंदाचं वेगवेगळं महत्त्व आहे. खुश राहण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. तसेच आनंदाची वेगवेगळी कारणं असतात. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की, लग्नानंतर महिला नवरा आणि मुलांमध्ये रमतात आणि जास्त खूश असतात. परंतु तुमचा हा विचार अत्यंत चुकीचा ठरवाल आहे एका संशोधनाने.संशोधनातून सिद्ध झालेल्या बाबींनुसार, महिला लग्नानंतर खूश नसून त्या लग्न न करता जास्त खूश असतात. महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनातून त्यांच्या आनंदी राहण्याची अनेक कारणं समोर आली. 

(Image Credit : https://www.pexels.com)

अमेरिकन टाइम यूज सर्वेने केलेल्या संशोधनातून  विवाहित, अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांच्या सुखाची आणि दुखःची वेगवेगळ्या स्तरांवर तुलना करण्यात आली. सर्वात आश्चर्यकारक बाब समोर आली ती म्हणजे, विवाहित महिलांना जेव्हा त्यांच्या जोडीदारासमोर सुखाबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आनंदी असल्याचं सांगितलं. सर्व निरिक्षणांमधून असं समोर आलं की, अविवाहित महिलांची विवाहित महिलांच्या तुलनेत दुखः यादी अत्यंत कमी होती. 

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधील व्यवहार विज्ञान प्रोफेसर आणि 'हॅप्पी एवर आफ्टर' पुस्तकाचे लेखर पॉल डोलन यांनी सांगितले की, लग्नामुळे पुरूषांना फायदा होतो आणि महिला लग्नाआधी जास्त खूश राहत असतं. डोलन यांनी याच संशोधनाबाबत बोलताना सांगितले की, अनेक पुरूष लग्नानंतर शांत होतात. त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभतं. 

पण महिलांबाबत अत्यंत उलट असतं. लग्न झाल्यानंतर त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. जर त्या लग्न करत नसतील तर त्या निरोगी आणि आनंदी राहतात. मार्केटिंग इंटेलिजेंस कंपनी मिंटेलद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनात एकट्या राहणाऱ्या महिलांवर काही निरिक्षणं नोंदवण्यात आली. एकूण महिलांपैकी 61 टक्के महिला आनंदी आहेत. तसचे यातील 75 टक्के महिला एकट्याच राहणं पसंत करतात. त्यांना जोडीदाराची अजिबात गरज नसते. 

संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष सांगतात की, सध्या परिस्थिती बदललेली आहे. तसेच विचारसरणीही बदलत आहे. त्यामुळे लग्न आणि मुलं या दोनच गोष्टी महिलांना आनंदी नाही करत. आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या नाही, हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 

टॅग्स :ResearchसंशोधनRelationship TipsरिलेशनशिपWomenमहिला