शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

एक्ससोबत पुन्हा मैत्रीचं नातं निर्माण करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, नाहीतर होईल पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 17:57 IST

तुमच्या एक्ससोबत प्रेमाचं नातं संपवल्यानंतर पुन्हा केवळ मैत्रीचं नातं ठेवण्याची स्थिती समोर आली की, अनेक प्रश्न समोर येऊ लागतात. ज्या व्यक्तीसोबत केवळ प्रेमाच्या गोष्टी तुम्ही बोलायचे त्या व्यक्तीसोबत सामान्य मित्राप्रमाणे बोलणे शक्य आहे का?

तुमच्या एक्ससोबत प्रेमाचं नातं संपवल्यानंतर पुन्हा केवळ मैत्रीचं नातं ठेवण्याची स्थिती समोर आली की, अनेक प्रश्न मनात येऊ लागतात. ज्या व्यक्तीसोबत केवळ प्रेमाच्या गोष्टी तुम्ही बोलायचे त्या व्यक्तीसोबत सामान्य मित्राप्रमाणे बोलणे शक्य आहे का? काय पुन्हा त्या व्यक्तीसोबत मैत्री होऊ शकते? काय त्या व्यक्तीसोबत पुन्हा नजर मिळवली जाऊ शकेल? असे प्रश्न उभे ठाकतात. पण तरीही असं मैत्रीचं नातं ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. या गोष्टी तुमच नवं नातं योग्य मार्गाने पुढे सरकण्यास मदत होईल.

1) आधी वेळ घ्या

जर तुमच्या एक्स-बॉयफ्रेन्डने किंवा एक्स-गर्लफ्रेन्डने तुमच्याशी पुन्हा बोलण्याचा निर्णय घेतला असेल. प्रेमाच्या नात्याऐवजी केवळ मित्र किंवा मैत्रिण म्हणून हात पुढे करण्यास सांगितलं असेल, तर काहीही उत्तर देण्याआधी थोडा वेळ घ्या. नंतर स्वत:ला वेळ द्या, स्वत:ला प्रश्न करा की, काय खरंच तुम्ही पुन्हा त्या व्यक्तीसोबत बोलू शकणार आहात किंवा नाही. जर पूर्ण विचार केल्यावर हे कठीण असल्याचं वाटल्यास पुढे जाऊ नका.

2) दोघांची सहमती असावी

जर तुम्हाला वाटत असेल की, दोघांचं प्रेमाचं नातं संपवणं एक योग्य निर्णय होता, तर तुमच्या एक्स पार्टनरलाही असेच वाटणे गरजेचे आहे. दोघेही जर ब्रेकअपला योग्य मानत असतील तरच दोघेही मैत्रीच्या नात्याकडे वळू शकतात. पण जर कुणा एकाच्या मनात अजूनही प्रेमाची भावना असेल आणि त्या व्यक्तीला वाटत असेल की, पुन्हा प्रेमाचं नातं निर्माण व्हावं तेव्हा मैत्रिचं नातं तयार होऊ शकत नाही.  

3) भेटताना घ्या ही काळजी

प्रेमाचा रस्ता सोडून मैत्रीच्या मार्गावर दोघांचेही पडणारे पाऊल सहमतीने पुढे जात असतील तर चांगली गोष्ट आहे. केवळ फोनवरच नाही तर तुम्ही भेटूनही बोलू शकता. पण कुठे भेटायचं आहे, काय बोलायचं आहे, या गोष्टी विचारपूर्वक कराव्या लागतील. कोणत्याही रोमॅंटिक जागेवर भेटण्याचा विचार करु नका. याने दोघांमध्ये अवघडलेपणा येऊ शकतं. 

4) केवळ मित्र माना

जर तुमचं ब्रेकअप झालं असेल जर त्याच्यामागे काहीतरी कारण असेलच. त्यानंतर मैत्रीचं हे स्विकारलेलं नातंही विचार करुनच घेतलं असेल. नंतर पुन्हा प्रेमात पडणं किंवा तशा भावना मनात येणं चुकीचं ठरेल. त्यामुळे दोघांनीही मनाशी हे ठरवलं पाहिडजे की, तुम्ही आता केवळ मित्र आहात. 

5) सर्वात महत्वाची बाब

आता जर तुम्ही केवळ मैत्री ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही आणखीही काही गोष्टी ठरवायला हव्यात. जसे तुम्ही आधी बोलत होतात, एकमेकांना प्रेमाचे संदेश पाठवत होतात, असे काहीही आता करता येणार नाही. कुणाकडूनही असे होत असेल तर ती मैत्री टिकणारच नाही. आणि अशा मैत्रीला काही अर्थही उरणार नाही.

6) एकमेकांना लाइफ पुढे नेण्यास मदत करा

जर तुमच्या ब्रेकअपनंतर तुमच्या दोघांच्याही आयुष्यात दुसरं कुणी आलं नसेल तर दोघांनीही एकमेकांना लाइफमध्ये पुढे जाण्यास मदत केली पाहिजे. जर दोघांपैकी एकाच्या आयुष्यात कुणी आलं असेल तर त्याबाबत आनंद व्यक्त केला पाहिजे. नाराज होऊन कोणत्याही प्रकारचे चुकीचे संकेत देऊ नये. कारण तुम्ही आता केवळ मित्र आहात. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट