शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

एक्ससोबत पुन्हा मैत्रीचं नातं निर्माण करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, नाहीतर होईल पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 17:57 IST

तुमच्या एक्ससोबत प्रेमाचं नातं संपवल्यानंतर पुन्हा केवळ मैत्रीचं नातं ठेवण्याची स्थिती समोर आली की, अनेक प्रश्न समोर येऊ लागतात. ज्या व्यक्तीसोबत केवळ प्रेमाच्या गोष्टी तुम्ही बोलायचे त्या व्यक्तीसोबत सामान्य मित्राप्रमाणे बोलणे शक्य आहे का?

तुमच्या एक्ससोबत प्रेमाचं नातं संपवल्यानंतर पुन्हा केवळ मैत्रीचं नातं ठेवण्याची स्थिती समोर आली की, अनेक प्रश्न मनात येऊ लागतात. ज्या व्यक्तीसोबत केवळ प्रेमाच्या गोष्टी तुम्ही बोलायचे त्या व्यक्तीसोबत सामान्य मित्राप्रमाणे बोलणे शक्य आहे का? काय पुन्हा त्या व्यक्तीसोबत मैत्री होऊ शकते? काय त्या व्यक्तीसोबत पुन्हा नजर मिळवली जाऊ शकेल? असे प्रश्न उभे ठाकतात. पण तरीही असं मैत्रीचं नातं ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. या गोष्टी तुमच नवं नातं योग्य मार्गाने पुढे सरकण्यास मदत होईल.

1) आधी वेळ घ्या

जर तुमच्या एक्स-बॉयफ्रेन्डने किंवा एक्स-गर्लफ्रेन्डने तुमच्याशी पुन्हा बोलण्याचा निर्णय घेतला असेल. प्रेमाच्या नात्याऐवजी केवळ मित्र किंवा मैत्रिण म्हणून हात पुढे करण्यास सांगितलं असेल, तर काहीही उत्तर देण्याआधी थोडा वेळ घ्या. नंतर स्वत:ला वेळ द्या, स्वत:ला प्रश्न करा की, काय खरंच तुम्ही पुन्हा त्या व्यक्तीसोबत बोलू शकणार आहात किंवा नाही. जर पूर्ण विचार केल्यावर हे कठीण असल्याचं वाटल्यास पुढे जाऊ नका.

2) दोघांची सहमती असावी

जर तुम्हाला वाटत असेल की, दोघांचं प्रेमाचं नातं संपवणं एक योग्य निर्णय होता, तर तुमच्या एक्स पार्टनरलाही असेच वाटणे गरजेचे आहे. दोघेही जर ब्रेकअपला योग्य मानत असतील तरच दोघेही मैत्रीच्या नात्याकडे वळू शकतात. पण जर कुणा एकाच्या मनात अजूनही प्रेमाची भावना असेल आणि त्या व्यक्तीला वाटत असेल की, पुन्हा प्रेमाचं नातं निर्माण व्हावं तेव्हा मैत्रिचं नातं तयार होऊ शकत नाही.  

3) भेटताना घ्या ही काळजी

प्रेमाचा रस्ता सोडून मैत्रीच्या मार्गावर दोघांचेही पडणारे पाऊल सहमतीने पुढे जात असतील तर चांगली गोष्ट आहे. केवळ फोनवरच नाही तर तुम्ही भेटूनही बोलू शकता. पण कुठे भेटायचं आहे, काय बोलायचं आहे, या गोष्टी विचारपूर्वक कराव्या लागतील. कोणत्याही रोमॅंटिक जागेवर भेटण्याचा विचार करु नका. याने दोघांमध्ये अवघडलेपणा येऊ शकतं. 

4) केवळ मित्र माना

जर तुमचं ब्रेकअप झालं असेल जर त्याच्यामागे काहीतरी कारण असेलच. त्यानंतर मैत्रीचं हे स्विकारलेलं नातंही विचार करुनच घेतलं असेल. नंतर पुन्हा प्रेमात पडणं किंवा तशा भावना मनात येणं चुकीचं ठरेल. त्यामुळे दोघांनीही मनाशी हे ठरवलं पाहिडजे की, तुम्ही आता केवळ मित्र आहात. 

5) सर्वात महत्वाची बाब

आता जर तुम्ही केवळ मैत्री ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही आणखीही काही गोष्टी ठरवायला हव्यात. जसे तुम्ही आधी बोलत होतात, एकमेकांना प्रेमाचे संदेश पाठवत होतात, असे काहीही आता करता येणार नाही. कुणाकडूनही असे होत असेल तर ती मैत्री टिकणारच नाही. आणि अशा मैत्रीला काही अर्थही उरणार नाही.

6) एकमेकांना लाइफ पुढे नेण्यास मदत करा

जर तुमच्या ब्रेकअपनंतर तुमच्या दोघांच्याही आयुष्यात दुसरं कुणी आलं नसेल तर दोघांनीही एकमेकांना लाइफमध्ये पुढे जाण्यास मदत केली पाहिजे. जर दोघांपैकी एकाच्या आयुष्यात कुणी आलं असेल तर त्याबाबत आनंद व्यक्त केला पाहिजे. नाराज होऊन कोणत्याही प्रकारचे चुकीचे संकेत देऊ नये. कारण तुम्ही आता केवळ मित्र आहात. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट