शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

जर तुमची गर्लफ्रेन्ड सेंसिटिव्ह असेल तर चुकूनही या 5 गोष्टी तिला बोलू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 15:52 IST

अशात तुमचं नातं अडचणीत येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणत्या शब्दांचा किंवा कोणत्या गोष्टी मुलींना म्हणजेच गर्लफ्रेन्डला बोलू नये हे जाणून घेऊया....

रिलेशनशिपमध्ये काही दिवसांनी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत चांगलेच कम्फर्टेबल होता. त्यामुळे दोघेही एकमेकांकडे आपल्या मनातील गोष्टी मनमोकळेपणाने बोलतात. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कशाचाही विचार न करता पार्चटनरला काहीही बोलू शकता. तुम्ही कोणत्याही नात्यात असला तरी आणि कितीही राग आला तरी काही शब्दांचा वापर अजिबात करु नये. काही मुली या फार जास्त संवेदनशिल असतात. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्यांचं मन दुखतं. अशात तुमचं नातं अडचणीत येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणत्या शब्दांचा किंवा कोणत्या गोष्टी मुलींना म्हणजेच गर्लफ्रेन्डला बोलू नये हे जाणून घेऊया....

1) जास्त भावनिक होण्याची गरज नाहीये

काही मुली फार भावूक असतात. समोर असलेली प्रत्येक परिस्थितीकडे त्या भावनात्मक दृष्टीने बघतात. पण जर कधी भांडण झालं असेल आणि रागाच्या भरात म्हणत असाल की, इमोशनल होऊ नको, प्रॅक्टिकल होऊ नको, तर त्यांना या गोष्टींचं वाईट वाटू शकतं. अशा बोलण्याने तुमच्या नात्यात मिठाचा खडा पडू शकतो.  

2) तू फार जास्त विचार करते

संवेदनशील मुली प्रत्येक गोष्टीचा फार विचार करतात. त्यांच्यामुळे, त्यांच्या वागण्यामुळे कुणाला वाईट वाटू नये याचा विचार त्या करतात. हा सगळा विचार करुनच त्या सर्व निर्णय घेतात. पण भांडण झाल्यावर बॉयफ्रेन्ड त्यांना तू जरा जास्तच विचार करते, प्रॅक्टिकल होत नाही, असे बोललात तर त्यांच्या मनाला ते लागतं. कारण त्यांच्यानुसार परिस्थितीच्या प्रत्येक बाजूचा विचार करणे चुकीचे नाहीये.

3) फास्ट फॉरवर्ड हो!

संवेदनशील मुली कधीही कोणतही काम घाईत करत नाहीत. त्या त्यांना हवा असलेला वेळ घेऊनच कोणत्याही गोष्टीवर रिअॅक्ट होतात. तर त्यांना कुणी म्हटलं की, तुला एकही काम पटकन करता येत नाही, तू जरा फास्ट हो...तर या गोष्टीने त्यांना वाईट वाटतं. त्यांचा हा स्वभाव बॉयफ्रेन्डने समजन घ्यायला हवा. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करु नये.

4) आकर्षणासाठी अशी वागते

जर तुमची संवेदनशील गर्लफ्रेन्ड निर्णय घ्यायला थोडा वेळ लावत असेल आणि तिला वाटत असेल की, त्या गोष्टीत तिला तुमची साथ हवी तर समजा की, तिला तुमचं अटेंशन हवंय. अशा मुलींना तुमचं अटेंशन हवं असतं त्या आकर्षणाच्या भूकेल्या नसतात. त्यांच्या स्वभावाचा विचार न करता काहीही बोलू नये.

5) मला तुझा कंटाळा आलाय

जर तुम्ही गर्लफ्रेन्डसोबत भावनात्मक रुपाने जोडले गेले नसाल तर याचा दोष त्यांना देऊ नका. कधी भांडण झालंच तर त्यांना कधीही 'मला तुझा कंटाळा आलाय' असं म्हणू नका. अशाप्रकारे बोलल्यास तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट