शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

रिलेशनशिपमधील असे काही कटू सत्य जे कुणालाही स्वीकार करायचे नसतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 15:59 IST

Relationship : रिलेशनशिपकडे खऱ्या दृष्टीने पाहिलं गेलं तर रिलेशनशिपमध्ये काहीना काही चढ-उतार येतातच. ज्यासाठी कपल्सना नेहमी तयार रहावं लागतं.

Relationship : आपलं रिलेशनशिप इतरांपेक्षा वेगळं आणि आनंदी असावं हे सगळ्यांनाच वाटत असतं. मुळात रिलेशनशिप चांगलं ठेवण्यासाठी दोघांनाही वेळोवेळी फार मेहनत घ्यावी लागते. रिलेशनशिपकडे खऱ्या दृष्टीने पाहिलं गेलं तर रिलेशनशिपमध्ये काहीना काही चढ-उतार येतातच. ज्यासाठी कपल्सना नेहमी तयार रहावं लागतं. चला जाणून घेऊ रिलेशनशिपच्या काही सत्यांबाबत जे कुणाला स्वीकार करायचे नसतात. 

1) दुसऱ्यांकडे आकर्षित होऊ शकतो

रिलेशनशिपमध्ये दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात. पण असं अजिबात नाही की, ते एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होणार नाहीत. रिलेशनशिपमध्ये असतानाही तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता.

2) वेळ न देऊ शकल्याने होऊ शकतं ब्रेकअप

रिलेशनशिपमध्ये प्रेमासोबतच सोबत वेळ घालवण्यालाही फार महत्व असतं. पण जर तुम्ही एकमेकांसाठी फार कमी वेळ काढत असाल किंवा एकमेकांसाठी पुरेसा वेळ काढू शकत नसाल तर हे तुमचं ब्रेकअफ होण्याचं मुख्य कारण ठरू शकतं.

3) रिलेशनशिप तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतं

तुम्ही आणि तुमचा पार्टनर एकमेकांवर खूप प्रेम करत असाल, पण तुम्हाला हे माहीत असायला हवं की, रिलेशनशिपमध्ये नेहमी आनंदी राहणं किंवा काही कुरबुरी न होणं शक्य नाही. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचं रोज भांडणं होऊ शकतं आणि यामुळे तुमचं रिलेशनशिप दु:खाचं कारण ठरू शकतं.

4) लग्नानंतरही येऊ शकतात अडचणी

अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पार्टनरसोबत लग्न करून जीवनातील सर्व समस्या संपत नसतात. लग्नानंतर जीवन बदलतं आणि तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात. अशात पदोपदी रिलेशनशिपमध्ये समोर येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी तयार रहा.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप