शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पार्टनरला दगा देण्यापेक्षाही जास्त महागात पडतात 'या' 4 चुका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 12:51 IST

Relationship : काही चुकांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला नातं टिकवून ठेवण्यास मदत मिळेल.

Relationship : कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासवर टिकून असतो. विश्वासामुळेच नातं टिकून राहतं. पण कधी कधी नात्यात असणाऱ्या दोन्ही व्यक्तींकडून असं काही घडतं ज्यामुळे नातं बिघडू लागतं. कपल काही अशा चुका करतात ज्यामुळे नातं दुरावतं. अशाच काही चुकांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

स्वार्थी होणे

रिलेशनशिपमध्ये समानतेची भावनाच दोन्ही पार्टनरला एकमेकांमध्ये बांधून ठेवते. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये केवळ तुमच्या आनंदासाठी असाल, तुम्ही केवळ तुमच्या इच्छांचा विचार करत असाल तर याने तुमच्या पार्टनरला दु:खं होईल. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये स्वार्थीपणा ठेवणे टाळा.

खोटं बोलणे

आपण बालपणापासूनच शिकत असतो की, खोटं फार जास्त काळ लपून राहू शकत नाही. तरी सुद्धा अनेकजण पार्टनरसोबत खोटं बोलतात. पण खोटं टाळलं पाहिजे, खासकरून तेव्हा जेव्हा नातं नवीन असतं. कारण नात्याची सुरूवात खोट्याने झाली तर या नात्यात तुम्हाला आनंद मिळूच शकणार नाही.

फायद्यासाठी नातं

असं गरजेचं नाही की, रिलेशनशिप नेहमी एकसारखंच चालत रहावं. वेळेनुसार जेव्हा तुम्ही एकमेकांना चांगलं समजू लागता तेव्हा आपापसातील वाद समोर येऊ लागतात किंवा एकमेकांसोबत सहज राहू शकत नाहीत. तरी सुद्धा तुम्ही ते नातं कायम ठेवलं असेल, मग ते समाजाच्या भीतीने असो वा एकमेकांच्या सुविधेसाठी असो हे नातं तुम्हाला त्रासाशिवाय काहीच देऊ शकणार नाही. असं करणं सुद्धा दगा देण्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट आहे.

बोलणं बंद करणे

असं नेहमीच ऐकायला मिळतं की, छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वाढतात. या गोष्टींना रिलेशनशिपमध्ये फार महत्त्व असतं. तुम्ही आपसात भांडण करता किंवा एखाद्या वेगळ्याच कारणाने रिलेशनशिप सुरळीत नसेल तर एकमेकांशी बोलणं बंद करता. हे फारच चुकीचं आहे. याने प्रश्न सुटणार नाहीत. त्यापेक्षा पार्टनरसोबत बोला. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप