शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

Relation : 'या' कारणाने अति प्रेमही ठरु शकते नात्यासाठी घातक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 14:25 IST

प्रेमाचे नाते आणि ब्रेकअप सायकोसिससंबंधीत नुकतेच एक संशोधन करण्यात आले. त्यात चकित करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत.

-रवींद्र मोरे सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांचे प्रेमसंबंध आपणास माहित आहेच. त्यांचे नाते का तुटले याचे मुख्य कारण सांगता येईल ते म्हणजे सलमानचे ऐश्वर्यावर असणारे अति प्रेम. बॉलीवूडमध्ये या व्यतिरिक्त अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांचे प्रेमसंबंध फक्त अति प्रेमामुळे संपुष्टात आले. प्रेमाचे नाते आणि ब्रेकअप सायकोसिससंबंधीत नुकतेच एक संशोधन करण्यात आले. त्यात चकित करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. सध्या लोकांमध्ये लवकर प्रेम करण्याची क्रेझ दिसून येत असून याचा परिणाम तेवढ्याच लवकर एकमेकांपासून लांब होण्याच्या घटना घडत आहेत. या घटना का घडत आहेत, त्याची कारणे शोधण्यासाठी नेमके हे संशोधन करण्यात आले. दोघांमधील गरजेपेक्षा जास्त पे्रम त्यांना एकमेकांपासून लांब होण्यास जबाबदार ठरत असल्याचे या संशोधनात आढळले आहे. जेव्हा एक पार्टनर खूपच प्रेम करतो, तेव्हा तो समोरच्या पार्टनरकडून तशाच प्रेमाची अपेक्षा करतो. जर दुसरा पार्टनर या अपेक्षाला समजू शकला नाही किंवा पूर्ण करू शकला तेव्हा त्या नात्यात समस्या निर्माण होऊ लागतात. नेमके याच समस्या भविष्यात नात्यासाठी धोकादायक ठरतात. यात एक पार्टनर असा समजतो की, माझ्या प्रेमाची समोरच्याला काही किंमतच नाही आणि दुसरा असा विचार करतो की, माझ्या स्वातंत्र्यावर गदा निर्माण होत आहे. अशी परिस्थिती आल्यावर दोघेही स्वत:साठी काहीतरी नवे शोधणे सुरु करतात.   * काय आहेत लक्षणेआपल्या स्वातंत्र्यात कोणी अडसर निर्माण होणे हे कुणालाच आवडत नाही. प्रेम करणे आणि ते जाहिर करणे ही वेगळी गोष्ट आहे, मात्र याला आपण कोणावर बळजबरीने थोपवू शकत नाही. जर आपला पार्टनर आपल्या प्रेमानुसार अपेक्षित प्रतिसाद देत नसेल तर घाई न करता त्याच्याशी संवाद साधून आपले म्हणणे समजवू शकता.आपल्या नात्याला वेळेनुसार विकसित करण्याचा प्रयत्न करा. बहुतांश आपण वेळेनुसार खूप बदलतो मात्र आपल्या पार्टनरकडच्या आपल्या अपेक्षा पुर्वीसारख्या तशाच असतात. जेव्हा नात्याच्या सुरुवातीला जसे आणि जेवढे प्रेम करतो आजही तसेच वागत असाल आणि तेवढ्याच प्रेमाची अपेक्षा करीत असाल तर असे वागणे आपल्या नात्यासाठी घातक समजावे. कारण या अति प्रेमामुळे आपण जेवढे प्रभावित व्हाल तेवढाच आपला पार्टनरदेखील प्रभावित होईल. अशीच परिस्थिती कायम राहिली तर आपला पार्टनर त्रस्त होऊन आपल्यापासून कायमचा लांब जाऊ शकतो. यामुळे वेळीच सतर्क व्हा आणि आपले नाते जपून ठेवा.