शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

या कारणांमुळे तर तुम्ही अजून सिंगल नाहीत ना? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 16:07 IST

पण हे लोक सिंगल का राहतात? ते का प्रेमात पडण्याचा विचार करत नाहीत? चला जाणून घेऊया याची काही कारणे....

कधी ना कधी तुमचा सामना अशा लोकांशी होतो जे अनेकवर्ष सिंगलच आहेत, किंवा ते कधी प्रेमाच्या नात्यात कधी अडकलेच नाहीतेय. अशा लोकांकडे सिंगल राहण्याची अनेक कारणेही असतात. पण हे लोक सिंगल का राहतात? ते का प्रेमात पडण्याचा विचार करत नाहीत? चला जाणून घेऊया याची काही कारणे....

1) स्वत:वर प्रेम

काही लोक असे असतात ज्यांना आनंदी राहण्यासाठी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची गरज लागत नाही. असे लोक इतरांवर प्रेम करण्यापेक्षा केवळ स्वत:च्याच प्रेमात अधिक असतात. ते स्वत:च्याच आनंदाची आणि गरजांची काळजी घेतात. त्यामुळे हे लोक सिंगल राहणे पसंत करतात.  

2) अॅडजस्टमेंट करायला घाबरतात

काही लोकांना आपलं जीवन हे त्यांच्या हिशोबाने जगायचं असतं. दुसऱ्याने त्यांना येऊन कंट्रोल करणे, अॅडजस्टमेंट करायला लावणे त्यांना पसंत नसतं. नातं प्रेमाचं असो वा लग्नाचं त्यात अनेक ठिकाणी तडजोड करावी लागते. पण काहींना तडजोड नको असते त्यामुळे ते सिंगल राहणं पसंत करतात. 

3) भूतकाळातून बाहेर न येणे

काही लोक हे कधीकाळी कुणावर केलेल्या प्रेमातून कधी बाहेरच येत नाहीत. हे सुद्धा सिंगल राहण्याचं एक महत्वाचं कारण आहे. पहिल्या प्रेमात दगा मिळाला असेल आणि त्याचा त्रास अजूनही होत असेल तर नवीन नातं तयार करणं जरा कठीणच असतं. 

4) करिअरवर लक्ष केंद्रीत करणारे

काही लोक हे आपल्या करिअरबाबत फारच सिरिअस असतात. त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. त्यांना एखाद्या नात्यात अडकून आपलं लक्ष भरकटवायचं नसतं. त्यामुळे तेही सिंगल राहतात. 

5) नात्यासाठी तयार नाही

अनेकदा आजूबाजूच्या लोकांच्या नात्यातील चढउतार पाहून काही लोक घाबरुन जातात. आजूबाजूला जे घडतंय ते बघून काही लोक आपण यासाठी तयार नसल्याचा विचार करतात. कदाचित त्यांना या गोष्टींसाठी वेळ लागणार असतो. पण काही असेही लोक असतात की, ते या गोष्टींता इतका धसका घेतात की, ते नेहमी सिंगलच राहतात.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट