शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

या कारणांनी प्रेमात पार्टनरला दगा देतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 13:43 IST

व्यक्तींच्या राशींवरुन माणसांच्या व्यक्तीत्वाबद्दल बरंच काही जाणून घेता येतं. त्यानुसारच ब्रेकअप होण्याची कारणेही यावरुन जाणून घेता येतात. बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला दगा का देतात हे जाणून घेऊया त्यांच्या राशीनुसार...

प्रेमात मिळालेल्या दग्यातून सावरणं हे कुणासाठीही सोपं नसतं. ज्या व्यक्तीवर आपण जीवापेक्षा जास्त प्रेम करतो ती व्यक्तीच जेव्हा साथ सोडून जाते तेव्हा जगण्यातला उत्साहच निघून जातो. ब्रेकअप होण्याची वेगवेगळी कारणे असतात. पण याचं नेमकं कारण काय आहे हे त्यांच्या राशीमध्ये दडलं आहे. व्यक्तींच्या राशींवरुन माणसांच्या व्यक्तित्वाबद्दल बरंच काही जाणून घेता येतं. त्यानुसारच ब्रेकअप होण्याची कारणेही यावरुन जाणून घेता येतात. बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला दगा का देतात हे जाणून घेऊया त्यांच्या राशीनुसार...

मेष राशी

मेष राशीचे लोक हे चंचल स्वभावाचे असतात. त्यांना त्यांच्या अंदाजात आयुष्य जगायचं असतं. प्रत्येकवळी काहीतरी नवीन आणि रोमांचक करण्यात त्यांना आनंद मिळतो. पण जेव्हा त्यांचे पार्टनर त्यांना एका साच्यात बांधायला लागतात तेव्हा ते त्यांच्यापासून दूर होऊ लागतात. काही भलेही सोबत राहत असतील पण त्यांच्यात प्रेम राहत नाही. अशावेळी हे दूर जाणं ब्रेकअपचं कारण बनतं. 

वृषभ राशी

या राशीच्या लोकांना जेव्हा असं वाटायला लागतं की, त्यांच्यासोबत पार्टनर चुकीचं वागत आहे तेव्हा ते स्वत:हून पार्टनरपासून दूर राहण्याचा निर्णय घेतात. नातं जेव्हा केवळ फक्त नावाला शिल्लक राहतं, तेव्हा हे लोक नातं संपवण्यासाठी ठोस पाऊल उचलतात. 

मिथुन राशी

या राशीच्या लोकांना फ्लर्ट करण्याची वाईट सवय असते. अनेकदा हे लोक फ्लर्ट करताना आपल्या सीमा विसरुन जातात हेच त्यांना महागात पडतं. त्यांचा फ्लर्ट करण्याचा स्वभावच त्यांना पार्टनरला दगा देण्याला भाग पाडतो. 

कर्क राशी

प्रेम या राशींच्या लोकांसाठी सगळंकाही असतं. पार्टनरला भरभरुन प्रेम देणे, पार्टनरकडून प्रेमाची अपेक्षा करणे हेच या लोकांना यशस्वी नातं वाटत असतं. आणि जेव्हा पार्टनरकडून भरपूर प्रेम मिळत नाही तेव्हा नात्यात दरी निर्माण होते.

सिंह राशी

या राशीच्या लोकांना असं वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरने सतत त्यांना काय हवंय, त्यांचा आनंद कशात आहे, ते काय करत आहे, या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवावं. पण त्यांच्या या अपेक्षा पार्टनर जेव्हा पूर्ण करु शकत नाही, तेव्हा या राशीच्या लोकांचा त्या नात्यातील इंटरेस्ट कमी होतो.

कन्या राशी

असे म्हणतात की, सफाईदारपणे खोटं कसं बोलावं हे कन्या राशीच्या लोकांकडून शिकावं. या लोकांकडे पार्टनरला दगा देण्याचं ठोस कारण नसतं. पण पार्टनरला दिलेला दगा लपवण्यासाठी त्यांच्याकडे शेकडो खोट्या गोष्टी असतात. या लोकांची प्रत्येक खोटी गोष्ट पार्टनरला खरी वाटत असते.  

तुळ राशी

या राशीच्या लोकांच्या स्वभावात स्थिरता कमी असते. जर या लोकांना काही अडचण वाटली तर ते त्या अडचणीला दूर करण्याचा सतत प्रयत्न करत राहतात. प्रेमातही यांचं वागणं असंच असतं.  

वृश्चिक राशी

प्रेम तर आवश्यक आहेच. पण या राशीच्या लोकांचं लैंगिक जीवन परफेक्ट असणं गरजेचं असतं. आणि जेव्हा त्यांच्या पार्टनरकडून ते मिळत नाही, तेव्हा या राशीचे लोक यावर उपायही बाहेरच शोधतात. 

धनु राशी

या राशीचे लोक फारच मनमौजी असतात. प्रेमाच्या नात्यातही या लोकांची आनंदी राहणं, एन्जॉय करणं अशी इच्छा असते. पण जेव्हा यांचे पार्टनर यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे लोक त्यांच्यापासून दूर जातात.  

मकर राशी

या राशीच्या लोकांना जेव्हा असं वाटतं की, आता या नात्यात काही राहिलं नाही. या नात्यात भविष्य नाही त्यावेळी हे लोक स्वत:हून खूप माघार घेतात. अशात त्यांना कुणी नवीन साथीदार भेटल्यास हे लोक आपल्या पार्टनरसोबतचं नातं तोडतात. 

कुंभ राशी

या राशीचे लोक फारच रोमॅंटिक असतात. पण पार्टनर केवळ यांनाच चिकटून राहिली तर यांना राग येतो. या लोकांना प्रेमातही फ्रिडम हवं असतं. जेव्हा त्यांना हे फ्रिडम मिळत नाही तेव्हा ते वेगळ पर्याय शोधायला लागतात. 

मीन राशी

रोमान्स आणि रोमान्स कायम टिकून रहावा याचे स्वप्न या राशीचे लोक सतत बघत असतात. पण जर पार्टनरने यांचे स्वप्न मोडले किंवा  त्यांच्या भावनांची गंमत केली तर हे पार्टनरपासून दूर जातात.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट