शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

पार्टनरवर जास्त प्रेम करणंही पडू शकतं महागात, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 12:49 IST

नवरा बायको आणि त्यांची भांडणं म्हणजे न तुटणारी समिकरणंच. मग ती प्रेमळ असोत किंवा गंभीर स्परूपाची असोत. बऱ्याचदा ही भांडणे विकोपाला जातात आणि त्यामुळे नात्यांमध्ये फूट पडते.

नवरा बायको आणि त्यांची भांडणं म्हणजे न तुटणारी समिकरणंच. मग ती प्रेमळ असोत किंवा गंभीर स्परूपाची असोत. बऱ्याचदा ही भांडणे विकोपाला जातात आणि त्यामुळे नात्यांमध्ये फूट पडते. प्रत्येक नात्यामध्ये वेगवेगळी कारणं आढळून येतात जी लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरतात. परंतु एका अभ्यासातून लग्न मोडण्याचे एक असे कारण समोर आले आहे. जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल... या संशोधनानुसार जोडप्यांधील प्रेमच त्यांचे नाते तुटण्याचे आणि घटस्फोट होण्याचे कारण ठरते. 

खरंय... प्रत्येक नातं हे प्रेमावर उभं असतं आणि हेच प्रेम नातं तुटण्याचं कारण असतं. हे ऐकून थोडा धक्का बसणं सहाजिकच आहे. परंतु, इंटरनॅशनल वेबसाइट इंडिपेन्डट डॉट कॉम यूकेमध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार, लग्नानंतरच्या अनेक वर्षानंतरही नाते तुटण्याचे प्रमुख कारण त्यांचे एकमेकांप्रती असलेले गरजेपेक्षा जास्त प्रेम आहे. संशोधकांनी 13 वर्षे एकूण 168 जोडप्यांचा अभ्यास करून हे जानण्याचा प्रयत्न केला की, लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही नातं तुटण्याची नक्की काय-काय कारणं आहेत. 

संशोधनाच्या अहवालामध्ये असे स्पष्ट लिहिले आहे की, जोडप्यांमध्ये एकमेकांबाबत गरजेपेक्षा जास्त प्रेम असणे काही वर्षांनंतर लग्न तुटण्याचे कारण बनत आहे. या प्रकरणी जेव्हा संशोधकांनी काही एक्सपर्ट्शी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सांगितले की,  लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात जोडप्यांमध्ये एकमेकांची अधिक काळजी, अति प्रेम आणि अॅट्रॅक्शन असते. परंतु, हे अॅट्रॅ्क्शन अधिक काळापर्यंत टिकून राहत नाही. 

याव्यतिरिक्त मानसोपचारतज्ज्ञांनी आणखी एक कारण सांगितले ज्यामुळे आपण एखाद्या व्यक्तिच्या स्वभावातील केवळ एका गुणाचा विचार करून त्या व्यक्तिकडे अॅक्ट्रॅक्ट होतो. परंतु अनेकदा आपल्याला आवडलेला तोच गुण त्या व्यक्तिच्या स्वभावातून वेळेनुसार लोप पावतो. त्या एकाच गुणांमुळे आपण इतके प्रभावित होतो की, त्या व्यक्तिंच्या अनेक दुर्गुणांकडे दुर्लक्ष करतो.

लग्नाच्या काही वर्षांनंतर जेव्हा आपण आपल्या जोडिदाराकडे पाहतो त्यावेळी आपल्याला पश्चाताप होतो की, ज्या व्यक्तिवर आपण एवढं प्रेम करतो आणि जिच्यासोबत लग्न केले आहे, ती व्यक्ति आधीसारखी राहिलेली नाही. हिच भावना वाढत जाते आणि नाते तुटण्याचे कारण बनतं. 

या संशोधनातून आणखी एक गोष्ट समोर आली आहे. त्यांच्यानुसार नाते तुटण्याचे आणखी एक कारण म्हणजे नात्याला जोडून ठेवण्याचा प्रयत्न करणं हेही आहे. काही लोकांना स्पष्ट दिसते की त्यांचं नातं आता दुबळं होतं चाललं आहे. परंतु ते टिकवून ठेवण्यासाठी हे लोकं अनेक प्रयत्न करत असून जसाजसा वेळ जातो त्यानुसार हे नातं आणखी दुबळं होत जातं. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप