शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी सांगितली 'मन की बात', रिलेशनशिपचं सत्य आलं समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 13:25 IST

लोकांची लाइफस्टाइल इतकी बदलली आहे की, लोक नवीन काहीही करण्यासाठी वेळ काढू शकत नाहीयेत.

लोकांची लाइफस्टाइल इतकी बदलली आहे की, लोक नवीन काहीही करण्यासाठी वेळ काढू शकत नाहीयेत. म्हणजे बघा ना जीवन जगण्याच्या पद्घतीसोबतच तरूणाईच्या विचारांमध्येही आधीच्या लोकांच्या तुलनेत फार बदल झाला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून तरूणाईचे रिलेशनशिपबाबतचे विचार समोर आले आहेत. सर्व्हेनुसार, जास्तीत तरूणांना सिंगल रहायचं आहे आणि सोबतच त्यांचा लग्नावरही विश्वास नाही. याचं कारण बदलती जीवनशैली आणि दृष्टीकोनात झालेलं परिवर्तन आहे.

सिंगल राहताना जगणं सोपं

(Image Credit : Entrepreneur)

टींडर आणि कन्सल्टिंग फर्म मोरार एचपीआयने सिंगल लोकांवर फोकस केलं आणि यातून समोर आलं की, १८ ते २५ वर्षांचे ८६ टक्के तरूणांना सिंगल रहायचं आहे. त्यांच्यानुसार, सिंगल राहून जगणं सोपं आहे आणि त्यांना अधिक सकारात्मक वाटतं. काही तरूणांचं तर हे म्हणणं आहे की, सिंगल राहिल्याने करिअरबाबत चांगले पर्याय मिळतात. 

बदलत आहे मानसिकता

(Image Credit : blog.ecampus.com)

आधीच्या लोकांच्या तुलनेत आताच्या तरुणांच्या विचारात बराच बदल झालाय. आता त्यांना सिंगल राहण्यात काहीच चुकीचं वाटत नाही. त्यांना एकटं राहून लाइफस्टाइल जगणं जास्त सोपं वाटतं. सर्व्हेनुसार, ९० टक्के तरुण आठवड्यातून एक किंवा दोनदा डेटला जातात. ७७ टक्के तरुणांचं म्हणणं आहे की, सिंगल राहिल्याने ते जास्त रोमांचक आणि नवीन गोष्टींचा अनुभव घेऊ शकतात. कदाचित पार्टनर असल्यावर या गोष्टी अनुभवता येणार नाहीत.

कपल्स घेताहेत वेगळं राहण्याचा निर्णय

ही बाबही समोर आली आहे की, कपल्स सहमतीने एकमेकांपासून काही काळासाठी वेगळे राहण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्यानुसार, ही एक स्मार्ट पाऊल आहे. कारण यादरम्यान ते एकमेकांना स्वातंत्र्य देतात, जेणेकरुन या वेळेत ते एकमेकांसाठी वेळ काढू शकतील. आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत राहू शकतील. 

रिलेशनशिप आहे एक्स्ट्रा बोनस

(Image Credit : rodemill.co.uk)

हे तर स्पष्ट आहे की, वर्तमानात तरुण संधींच्या शोधात आहेत आणि त्यासाठी ते सतर्क राहतात. आता तर ते पार्टनरआधीच परिवार आणि मित्रांच्या आनंदावर लक्ष देतात. तरुणाई आधी एक चांगलं जीवन शोधतात आणि रिलेशनशिपला एक एक्स्ट्रा बोनस समजतात. अशा तरुणांची संख्या वाढत आहे जे डेटींग साइटवर जाऊन पार्टनरचा शोध घेण्याऐवजी आधी स्वत:चा शोध घेतात.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप