शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

या ३ राशीच्या मुली बनतात परफेक्ट पार्टनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 11:27 IST

मुलींच्या काही अशाही राशी सांगितल्या जातात, ज्या परफेक्ट पार्टनर होऊ शकतात. खालील तीन राशींच्या मुलींसोबत लग्न केल्यास तुमचा मोठा फायदा होऊ शकतो असे बोलले जाते.

भारतात लग्नाला जबाबदारी आणि सहयोगाशी जोडलं जातं. खरंतर प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की, त्याच्या जीवनात अशी व्यक्ती असावी जी त्याच्यासाठी परफेक्ट मॅच असेल. तसं पहायला गेलं तर हे सर्व स्वभाव आणि समजून घेण्यावर डीपेंड करतं. अलिकडेही राशी बघून लग्न जुळवली जातात. वेगवेगळ्या राशींमधून व्यक्तींच्या स्वभावाबद्दल जाणून घेता येतं असं म्हणतात. त्यानुसारच मुलींच्या काही अशाही राशी सांगितल्या जातात, ज्या परफेक्ट पार्टनर होऊ शकतात. खालील तीन राशींच्या मुलींसोबत लग्न केल्यास तुमचा मोठा फायदा होऊ शकतो असे बोलले जाते.

कर्क :

कर्क राशीच्या मुली खूप भावूक असतात. प्रेम असो की लग्न जर त्यांच्या मनात त्यांच्या साथीदाराबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली तर त्या ते नातं शेवटपर्यंत टिकवून ठेवतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे जेव्हा या मुली कुणावर प्रेम करतात, तेव्हा त्या प्रेमाला कोणतीही सीमा नसते. सोबतच आपल्या पार्टनरसाठी मुली पूर्णपणे समर्पित होतात. जर त्यांचा साथीदार लाजाळू असेल तर त्याला जवळ घेण्यासाठी त्या स्वत:हून पुढाकार घेतात. साथीदाराला आनंदी ठेवण्यासोबत दुसरी जबाबदारी परिवार आणि मुलं यामुळे येते. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष ठेवणे, घरातील मोठ्यांची काळजी घेणे हे सर्व त्यांना चांगलं येतं.

मेष:मेष राशींच्या मुलींचं मन हे ओठांवरच असतं. या मुलींच्या याच अंदाजामुळे मुलं त्यांच्याकडे आकर्षित होतात. ज्या मुली असतात एक आणि दाखवतात दुसरं अशा मुलींचा मुलांना लवकर कंटाळा येतो. पण जेव्हा पार्टनरसाठी काही करण्याची वेळ येते, तेव्हा या मुलींपेक्षा चांगली साथीदार कुणीच असू शकत नाही. कोणत्याही वेळी यांना मदतीसाठी हाक दिली तर त्या सतत तयार असतात. पण यासोबतच त्या मुली आपल्या पार्टनरकडूनही तशीच अपेक्षा ठेवतात. जर तसं नाही झालं तर त्याचा राग सातव्या आसमानावर असतो. या राशीच्या मुलींना कधीही इग्नोर करू नका.

सिंह:

ही एक अशी राशी आहे जी केवळ आपल्या रागासाठी ओळखली जाते. पण या राशीच्या महिलांची वैशिष्ट्ये जर तुम्ही जाणून घेतली तर तुम्ही तुमचे विचारा लगेच बदलाल. या राशीच्या मुली मजबूत व्यक्तिमत्व, कुणालाही न घाबरणे, कोणत्याही कठिण परिस्थीतीत हिंमतीने उभे राहणा-या असतात. अशा मुलींना आपलं करण्यासाठी मुलं कोणत्याही गोष्टी करायला तयार होतात, असे म्हटले जाते. पण या मुलींचं ज्यांच्यावर मन येईल, त्या मुलांचं नशीब खुललं असं समजा, असंही अनेकदा सांगितलं जातं. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप