शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नातं तुटायला वेळ लागणार नाही, जर विवाहीत कपल्स करत असतील 'या' चुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 12:35 IST

विवाहीत कपल्स नकळतपणे अशा चुका करूनआपलं चांगलं नातं बिघडवतात.

सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे लोक घरीच बसून आहेत. अशात २४ तास त्याच व्यक्तीसोबत राहिल्यामुळे भांडण होण्याची शक्यता असते.  जे कपल्स एकमेकांपासून लांब आहेत. त्यांची भेट न झाल्यामुळे त्यांच्यात प्रेमाची भावना वाढण्याची शक्यता आहे. पण जे विवाहीत आहेत आणि आपल्या पार्टनरसोबत राहत आहेत. 

अशा कपल्समध्ये काही कारणांमुळे वाद होण्याची शक्यता आहे.  कारण लॉकडाऊनमुळे अनेकांची चिडचिड होत आहे. काहीलोक तो राग आपल्या पार्टनरवर काढतात.  इतरवेळी सुद्धा विवाहीत कपल्स चुका करतात आणि घटस्फोटापर्यंत गोष्ट जाते. आज आम्ही तुम्हाला रिलेशन का  तुटतं याची कारणं सांगणार आहोत.

पार्टनरबद्दल लोकांशी चर्चा

अनेकदा पार्टनरचं वागणं खटकल्यानंतर लोक आपल्या मित्र,मैत्रिणींना, नातेवाईकांना आपल्या पार्टनरच्या पटत नसलेल्या गोष्टी सांगतात. जर तुम्ही वाईट गोष्टी किंवा चुका लोकांना सांगत असाल तर तुम्हाला अनेकदा समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा तशीच प्रतिक्रिया येऊ शकते. त्यामुळे तुमची पार्टनरबद्दल विचार करण्याची पध्दत नकारात्मक होऊ शकते. त्यातून वादाला तोंड फुटतं

एकमेकांच्या चुका  दाखवणं

भांडण होणं यात नवीन असं काहीही नसतं. पण प्रत्येकवेळी तुम्ही मागील चुका सतत पार्टनरला दाखवून देत असाल तर वाद वाढण्याची शक्यता असते. यासाठी आधी घडलेलं तेव्हाच विसरा. परत त्याच गोष्टी बोलून वाद वाढवू नका.

शांत न बसणं

एकावेळी दोघजणं एकमेकांना उलट बोलत भांडत असतील तर वाद वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी पार्टनर जर भांडत असेल तर तुम्ही शांत रहा. कारण एकच गोष्ट लांब खेचत राहिल्यामुळे तुमची इच्छा नसाताना सुद्धा राग ओढावून घ्यावा लागेल. तसंच कुठल्याही मुलीला किंवा मुलाला आपल्या कुटुंबियातील व्यक्तींना वाईट साईट बोल्लेलं आवडत नाही. तुम्ही पार्टनरसोबत वाद घालत असताना कुटुंबियाना कधीही मध्ये आणू नका. नेहमी सन्मानपूर्वक बोला.

इतरांशी तुलना करू नका

पार्टनरची इतरांशी तुलना करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे प्लस पॉईंट्स असतात. जरी तुम्हाला  पार्टनरची कोणती गोष्ट आवडली नाही तरी तुलना कधीही करू नका. त्यामुळे पार्टनरला  दुःख होण्याची शक्यता आहे. म्हणून आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी इतरांचे उदाहरण कधीही देऊ नका.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप