शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रिलेशनशीपमध्ये पुरूषांना वाटते 'या' गोष्टीची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:02 IST

रिलेशनशीपमध्ये असताना तुमच्या पार्टनरला असुरक्षित वाटण्याची अनेक कारण असू शकतात.

रिलेशनशीपमध्ये असताना तुमच्या पार्टनरला असुरक्षित वाटण्याची अनेक कारण असू शकतात. कारण एकमेंकावर प्रेम करत असलेल्या कपल्सना असं वाटणं सामान्य बाब आहे. पण प्रत्येक रिलेशनशीपमध्ये असलेल्या मुलांचे  आणि मुलींचे स्वभाव वेगवेगळे असतात. कोणी समजून घेणारे असतात, कोणाला लगेच राग येतो, कोणी संशयी वृत्तीचे असतात. तसंच  कोणी सतत जास्त काळजी करणारे असतात. 

काही जणांना शांत राहायला आवडत, तर काहीजण नेहमी भांडत नाही तर कधीकधी भांडतात. पण ते भांडण खूप टोकाला जात असतं. अर्थात कोणताही प्रसंग असो. नातं जर टिकवून ठेवायचं असेल तर प्रत्येकालाच एकमेकांच्या स्वभावाची  ओळख होणं गरजेचं आहे. तुम्हाला सुध्दा तुमच्यात होणारी भांडण टाळायची असतील तर पार्टनरला कोणत्या गोष्टींशी भीती वाटते आणि कधी असुरक्षित वाटते. हे माहीत असणं  गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया पार्टनरला कोणत्या गोष्टीची भिती वाटते.

इतरांची प्रशंसा करणं

(Image credit- Elite daily)

जेव्हा तुम्ही इतर पुरूषांची प्रशंसा करत असता तेव्हा तुमच्या पार्टनरला भीती वाटू शकते. दुसऱ्या मुलाच्या नोकरीबद्दल, त्याच्या दिसण्याबद्दल जर तुम्ही तुमच्या पार्टनरसमोर बोलत असाल तर तेव्हा त्याला असुरक्षित वाटण्याची शक्यता असते. पण तुमचा पार्टनर तुमच्याशी कमिटेड असेल तर तो तुम्हाला हर्ट होईल असं वागणार नाही. 

भावनिक गरज

(Image credit- Elite daily)

प्रत्येक  व्यक्तीला  शारीरिक आणि आर्थिक गरजेसोबतच भावनिक गरज सुद्धा असते.  त्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरशी त्याला समजून घेऊन बोलत नसाल तर त्याला वाईट वाटू शकतं तसंच ते स्वतःच दुख मनातच ठेवून नकारात्मकतेकडे जाण्याची शक्यता असते.  त्यामुळे  तुम्ही शक्य होईल तितकं तुमच्या पार्टनरसोबत रोमॅन्टीक क्षण  घालवण्याचा प्रयत्न करा. 

 भूतकाळाची आठवण

आधीच्या नात्याबद्दल सतत आठवण करून दिली तर  पार्टनरला  भूतकाळ आठवून त्रास होण्याची शक्यता असते.  तुमच्यासोबत आधीच्या रिलेशनशीपमध्ये काही झालं असेल तर त्याचा परिणाम  दुसऱ्या नात्यांवर होणार नाही याची खात्री घ्या. दोन व्यक्तिंना एकाच तराजूत तोलू नका.

मुलीने स्वतःपेक्षा जास्त कमावणं

एखादी मुलगी स्वतः आपल्या पायांवर उभी राहत असेल किंवा तिने  चांगल्या पगाराची  नोकरी मिळवली असेल तेव्हा ती मुलगी आपल्याला सोडून  तर जाणार नाही याची भीती वाटत असते. तेव्हा स्वतः बद्दल कमीपणा वाटण्याची भावना य पार्टनरच्या मनात येत असते. तसंच जर तुमच्या फ्रेन्डस सर्कलमध्ये  जास्त मुलं असतील तरी पार्टनरला असुरक्षित वाटू शकतं. अर्थात जर एकमेकांवर विश्वास आणि अंडस्टॅडिंग  असेल तर या समस्या कमी प्रमाणात उद्भभवतात. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप