शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नव्याने प्रेमात पडला असाल तर पार्टनरसोबत बोलताना या गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 15:12 IST

काही कपल्स हे ऐकमेकांशी बोलताना कशाचाही विचार न करता काहीही बोलतात. याचा प्रभाव तुमच्या नात्यावर होतो.

प्रेमाच पडणं ही या जगातली सर्वात सुंदर भावना असावी. जेव्हा एखादा व्यक्ती कुणाच्या प्रेमात असतो तेव्हा त्या व्यक्तीची काळजी घेणे हे साहजिकच आलं. पण प्रेम जर नवंनवं असेल तर अनेक गोष्टीं उत्साहाच्या भरात बोलल्या आणि केल्या जातात. प्रेमात असलेले लोक एक वेगळ्याच विश्वात रमत असतात. पण काही कपल्स हे ऐकमेकांशी बोलताना कशाचाही विचार न करता काहीही बोलतात. याचा प्रभाव तुमच्या नात्यावर होतो.  त्यामुळे एकमेकांसोबत बोलताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी...

नात्याबाबत इमानदार रहा

नवीन नात्यात बातचीत होत असताना जास्तीत जास्त प्रश्न हे पर्सनल गोष्टींबाबत असतात. या प्रश्नांची उत्तरं इमानदारीने द्यावी, जेणेकरून तुमचा/तुमची पार्टनर तुम्हाला योग्यप्रकारे समजू शकेल. जर तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी खोटं सांगितलं आणि ती बाब तुमच्या पार्टनरला बाहेरून कळाली तर त्याला वाईट वाटू शकतं. याने त्याच्या मनात तुमच्याविषची चुकीची धारणा निर्माण होऊ शकते. जर तुम्ही तुमच्यातील एखादी वाईट गोष्ट किंवा तुमची वाईट सवय आधीच पार्टनरला स्वत:हून सांगितली तर कदाचित तुमच्यावरील पार्टनरचा विश्वास वाढू शकतो.  

गंमतीतही तुलना करु नका

कधी कधी गंमतीत किंवा रागात काही लोक आपल्या पार्टनरची तुलना दुसऱ्याच्या पार्टनरसोबत किंवा एक्ससोबत करतात. पण कुणालाही त्यांची तुलना इतरांशी केलेली पसंत पडणार नाही. अशाप्रकारे तुलना केल्यास तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं. 

प्रेमाचा पुरावा मागू नका

नातं नवीन असताना अनेकदा काही लोक आपल्या पार्टनरकडे प्रेमाचा पुरावा मागतात. यावर पुरावा म्हणून मिळणाऱ्या उत्तराने भलेही तुम्हाला काहीवेळ बरं वाटत असेल, पण ही गोष्ट पुढे जाऊन पार्टनरला इरिटेट करणारी ठरु शकते. प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट आहे त्यामुळे त्याचा पुरावा मागणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. प्रेम असेल तर ते तुम्हाला दिसेलच पुरावा मागण्याची गरज नाही. 

विनाकारणचे प्रश्न विचारु नका

प्रेमात अधिकाराची भावना असते. या भावनेने प्रेरित होऊन अनेकदा काही लोक आपल्या पार्टनरच्या खाजगी आयुष्यात लुडबूड करतात. हे तुमच्या पार्टनरला अजिबात आवडणारं नसतं. त्यामुळे असे प्रश्न विचारूच नये जे तुमच्या पार्टनरला पसंत नाहीयते किंवा त्यांची उत्तरं देताना त्यांना अवघडल्यासारखं होत असेल. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट