शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये हे 7 गुण असतील तर लगेच लग्नाला द्या होकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 14:44 IST

आजची जनरेशन  लग्न संस्थेकडे शंकेच्या दृष्टीने बघू लागली आहे. या जनरेशनला लिव्ह इन रिलेशनशिप मान्य आहे. त्यांना प्रेम मान्य आहे. पण त्यातील किती तरुणी आपल्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न करतात यात शंका आहे.

आत्ताच्या जनरेशनमधील तरुण-तरुणींना लग्न करण्यात रस नाही, असं एक निरीक्षण आहे. घरातील लोकांनी मुलींसाठी मुलं पाहणं हा रिवाज गेली कित्येक वर्ष सुरु आहे. आत्ताही अशी लग्न होतात पण प्रमाण कमी झालंय. आजची जनरेशन  लग्न संस्थेकडे शंकेच्या दृष्टीने बघू लागली आहे. या जनरेशनला लिव्ह इन रिलेशनशिप मान्य आहे. त्यांना प्रेम मान्य आहे. पण त्यातील किती तरुणी आपल्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न करतात यात शंका आहे. कारण आजूबाजूच्या लग्न झालेल्यांच्या विविध घटना पाहून ही जनरेशन  जरा लग्नापासून पळताना दिसते. पण तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये खालील गुण असतील तर तुम्ही त्याच्याशी लग्नाचा विचार करु शकता.

1) ऐकून घेणारा

बोलतात सगळेच. सगळ्यांनाच ओरडता येतं. पण असे फार कमी असतात जे चांगले ऐकून घेणारे असतात. हे फारच दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. अनेकदा अशी स्थिती येते की, तुम्हाला वाटत असतं की, तुमचं कुणीतरी ऐकावं. खासकरुन जेव्हा तुम्ही निराश असता. अशावेळी तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेन्डची मदत मिळत असेल, तो तुमची ही गरज भागवत असेल तर तुम्ही लकी आहात. जर त्याच्याशी बोलून तुम्हाला हलकं वाटत असेल, तुमचा आत्मविश्वास वाढत असेल, तर तो व्यक्ती नक्कीच मॅरेज मटेरिअल आहे. 

2) तुम्हाला सपोर्ट करणारा आणि तुमचं यश एन्जॉय करणारा

मुलींसाठी हा बदलता काळ फारच वेगवेगळ्या दृष्टीने संघर्षांचा आहे. खासकरुन मध्यम वर्गीय मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. जर अशात तुमचा बॉयफ्रेन्ड तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपोर्ट करत असेल तर तो तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जर तो तुमचं यश एन्जॉय करत असेल आणि तुमच्या आनंदात तो सहभागी होत असेल तर त्याच्याशी लग्नाचा विचार करु शकता. 

तुम्हाला या सवयी असतील तर तुमचं रिलेशनशिप आहे धोक्यात

3) त्याच्या यशात तुम्हाला स्थान देत असेल

फक्त सोबत फिरणं, पार्ट्या करणं हे न करता तो जर तुम्हाला त्याच्या यशात सहभागी करुन घेत असेल, त्या यशात तुमचाही वाटा सांगून तो तुम्हाला स्पेशल फिल करवत असेल, तर आणखी काय हवंय. तो तुमचा चांगला लाईफ पार्टनर होऊ शकतो.

4) इतरांशी कसा वागतो

तुम्हाला सोडून तुमचा बॉयफ्रेन्ड इतरांशी कसा वागतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो मोठ्यांशी कसा वागतो, लहानांशी कसा वागतो, महिलांशी कसा वागतो हे महत्वाचं आहे. जर तो सारख्याच प्रेमाने सर्वांचा सन्मान करत असेल, त्यांचा आदर करत असेल तर तुम्ही त्याला लाईफ पार्टनर बनवण्याचा विचार करु शकता.

5) त्याच्या निर्णयात तुमचं मत

निर्णय लहान असो वा मोठा तो जर तुम्हाला त्याच्या निर्णयात सहभागी करुन घेत असेल, तुमच्याकडूनही त्यात सल्ला घेत असेल, तुमचं मत विचारत असेल तर ही फारच चांगली बाब आहे. असे गुण फारच कमी लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये जर हा गुण असेल तर त्याने तुमचं नातं आणखीन मजबूत होऊ शकतं. 

अशा पुरूषांवर जास्त फिदा होतात महिला !

6) तुमचा ऐकमेकांवर विश्वास आहे

विश्वास हा कोणत्याही यशस्वी नात्याचा मुख्य पाया आहे. विश्वास असेल तर प्रेम टिकतं, वाढतं. विश्वास नसेल तर प्रेम असूच शकत नाही. जर तुम्हा दोघांचाही ऐकमेकांवर विश्वास असेल तर तुम्हाला कुणीही वेगळं करु शकत नाही. 

7) राग मनात धरुन न ठेवणारा

वाद-विवाद, भांडण हे प्रत्येक नात्यात होत असतात. पण ही भांडणं, वाद, इगो विसरुन आपण पुन्हा नव्याने कशी सुरुवात करतो हे जास्त महत्वाचं असतं. भांडण जास्त न लांबवता समजूतदारपणा घेणे हा गुण फारच कमी लोकांमध्ये बघायला मिळतो. 

मुळात कोणताही व्यक्ती 100 टक्के परफेक्ट नसतो. पण जेव्हा दोन वेगळे व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांना त्यांचं नातं परफेक्ट बनवायचं असतं.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपBeauty Tipsब्यूटी टिप्स