शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बॉयफ्रेंडमध्ये दिसतील 'हे' 7 गुण तरच द्या लग्नाला होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 13:07 IST

लग्न करण्यासाठी प्रत्येक मुलीला बेस्ट पार्टनर पाहिजे असतो. आता तुम्ही म्हणाल की, बेस्ट पार्टनर म्हणजे काय? तर याबाबतही प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना खूप शिकलेला आणि परदेशात राहणारा पार्टनर पाहिजे असतो.

लग्न करण्यासाठी प्रत्येक मुलीला बेस्ट पार्टनर पाहिजे असतो. आता तुम्ही म्हणाल की, बेस्ट पार्टनर म्हणजे काय? तर याबाबतही प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना खूप शिकलेला आणि परदेशात राहणारा पार्टनर पाहिजे असतो. तर काही त्यांना समजून घेणाऱ्या पार्टनरच्या शोधात असतात. काहीजणी तर पार्टनरच्या अपेक्षांबाबत एक लांबलचक लिस्टच करून तयार असतात. पण तुम्ही त्या मुलींपैकी असाल ज्या आधीपासूनच आपल्या बॉयफ्रेंडसोबत एन्गेज आहात आणि त्याच्याशीच लग्न करण्याच्या विचारात आहात, तर तुम्ही घाई न करता काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जरी तुम्ही अनेक दिवसांपासून एकत्र असाल तरी लग्न करण्याआधी काही बाबतीत विचार करणं गरजेचं असतं. आम्ही आज लग्नासाठी मुलगा निवडण्यासाठी त्याच्या काही परफेक्ट गुणांबाबत सांगणार आहोत. जर हे सर्व गुण तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडमध्ये दिसत असतील तर तुम्ही त्याची लग्नासाठी नक्की निवड करू शकता. जाणून घेऊया परफेक्ट मॅच ओळखण्यासाठी असलेल्या काही गुणधर्मांबाबत...

1. तुमची काळजी घेईल

काही मुलं प्रचंड केयरिंग असतात. पण काहीं फक्त स्वतःबाबत विचार करत असतात. त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय घडत असतं त्याबाबत काहीच फरक पडत नाही. अशी मुलं डेटवर आपली गर्लफ्रेडसोबत बाहेर तर जातात पण तिथ गेल्यावर तिच्या आवडीकडे लक्षं देण्याऐवजी फक्त स्वतःच्याच आवडीचा विचार करतात. जर तुमच्याबाबतीतही असचं घडत असेल तर लग्न करण्याआधी पुन्हा एकदा विचार करा. कारण प्रश्न फक्त डेटवर गेल्यानंतरचा नाही तर संपूर्ण आयुष्यभराचा आहे. 

2. तुमच्यावर बंधन तर घालणार नाही ना?

काही बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला फार डॉमिनेट करत असतात. तिच्यावर सतत बंधन घालत असतात. हे करू नकोस, त्याच्याशी बोलू नकोस, आताच्या आता भेटायला ये अशा अनेक गोष्टी ते तिच्यावर लादत असतात. जर तुम्हीही या गोष्टींचा सामना बऱ्याच दिवसांपासून करत असाल तर तुम्ही या नात्याला पूर्णविराम देणं गरजेचं असतं. अन्यथा पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. 

3. भविष्याबाबत विचार करा 

जर बॉयफ्रेंड नेहमी तुमच्याशी भविष्याबाबत बोलत असेल म्हणजेच, तो तुमच्याशी लग्न, लग्नानंतर कुठे फिरायला जायचं, रूटीन कसं सेट करायचं, तुमची रूम कशी असेल, वीकेंड्सच्या दिवशी काय करायचं या गोष्टींबाबत बोलत असेल तर तो तुमच्यासाठी परफेक्ट पार्टनर आहे. परंतु जर तुम्ही लग्नाबाबत बोलत असाल आणि तो त्याबाबत बोलणं तो टाळत असेल तर तुम्ही याबाबत एकदा नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. 

4. नेहमी तुमची साथ देतो 

जर तुमचा मूड खराब असेल किंवा कॉलेज आणि ऑफिसमध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल किंवा आर्थिक अडचणी असतील. यांसारख्या सर्व परिस्थितींमध्ये जर तो तुमच्या मदतीसाठी ठामपणे उभा असेल तर तो तुमच्यासाठी परफेक्ट मॅच आहे. कारण अडचणींच्यावेळी जो तुमच्यासाठी ठामपणे उभा राहतो. तोच आयुष्यभरासाठी आपली साथ निभावतो. 

5. अ‍ॅडजस्टमेंट करण्यासाठी तयार असेल 

लग्नानंतर फक्त एका मुलीच्या आयुष्यातच नाही तर मुलाच्या आयुष्यातही अनेक बदल घडून येतात. पण मुलांच्या तुलनेत मुली नेहमी जास्त अ‍ॅडजस्टमेंट करताना दिसतात. पण अनेकदा मुलं स्वतःला अजिबातच अ‍ॅडजस्ट करत नाहीत. जर ती व्यक्ती तुमच्यासोबत अ‍ॅडजस्टमेंट करण्यासाठी तयार असेल तर हाच तुमचा परफेक्ट पार्टनर आहे. 

6. तुम्हाला स्वप्नांकडे घेऊन जातो

जर तुमच्या पार्टनरला माहीत असेल की, पुढे जाऊन तुम्हाला काय साध्य करायचं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तुमची मदत करत असेल तर असा मुलगा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. फार कमी मुलं असतात जी आपल्या पार्टनरच्या फ्युचरसाठी उभी राहतात. त्यामुळे डोळे बंद करून तुम्ही या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता. 

7. रिस्पेक्ट देणं गरजेचं 

फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्याशी निगडीत प्रत्येक माणसाचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. जर त्या व्यक्तीला माहीत असेल की, कोणत्या व्यक्तीला किती रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे, तर अशा व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्वRanbir Kapoorरणबीर कपूरAlia Bhatआलिया भट