शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

या 5 गोष्टींच्या मदतीने परत मिळवा नात्यातील हरवलेला रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 17:36 IST

हे केवळ तुमच्यासोबत होतं असं नाही आणि त्यावर कोणताही उपाय नाही असेही नाही. चला जाणून घेऊया अशा काही खास गोष्टी ज्यामुळे तुमच्या नात्यातील कमी झालेला रोमांच परत मिळवता येईल. 

प्रेम हा कुणालाही सुखावणाराच अनुभव असतो. प्रेमात पडलेला माणूस क्षणाक्षणाला त्या व्यक्तीचा विचार करत असतो. पार्टनर केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगली वाटायला लागते. पण सुरुवातीला प्रेमात असलेला रोमांच हळूहळू वेगवेगळ्या कारणांनी कमी होऊ लागतो. हे केवळ तुमच्यासोबत होतं असं नाही आणि त्यावर कोणताही उपाय नाही असेही नाही. चला जाणून घेऊया अशा काही खास गोष्टी ज्यामुळे तुमच्या नात्यातील कमी झालेला रोमांच परत मिळवता येईल. 

1) जर तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटलात हे आठवत असेल, ती जागा आठवत असेल तर दोघेही कामातून वेळ काढून त्या ठिकाणाला भेट द्या. पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाऊन जुन्या आठवणी ताज्या करा. तुम्हा दोघांनाही चांगलं वाटेल. 

2) तुमच्या नात्यात तुम्हाला पुन्हा आधीसारखा रोमान्स हवा असेल तर मोबाईल जरा दूर ठेवा. त्यासोबतच मोबाईवर पार्टनरला काही मुर्खासारखे प्रश्न विचारणे थांबवा. पार्टनरसोबत मिळून एखादं काम करा. सतत पार्टनरच्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करा. याने तुम्हाला नक्की फायदा होईल. 

3) नात्यात आधीसारखाच उत्साह हवा असेल तर पार्टनरला सरप्राईज देणे विसरु नका. पार्टनरला गिफ्ट द्या. ती तुमच्यासाठी किती आणि कशी स्पेशल आहे हे तिला कळू द्या. तिला न सांगता तिच्यासोबत एखादी सरप्राईज पिकनिक प्लॅन करा. 

4) दररोज एकसारखं काम केल्याने कुणालाही कंटाळा येईल. त्यामुळे तुमचं लाईफही बोरींग होणार. अशात तुमच्या पार्टनरसोबत वेगळं काही करण्याचा प्रयत्न करा. पार्टनरसोबत ट्रेकिंग, बंजी जम्पिंगसारख्या गोष्टी करा. असे केल्याने नात्यातील कमी झालेला प्रेमाचा ओलावा पुन्हा भरून येईल. 

5) कामाचं टेंशन कधीही घरी घेऊन जाऊ नका. बाहेरच्या गोष्टींचा राग घरी पार्टनरवर काढण्याचं सोडा. याने तुमचं नातं अधिक चांगलं होईल. बारीकसारीक गोष्टींवरुन भांडणं सोडा. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमच्या नात्यात नवा रोमांच येईल.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट