शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

तुम्ही प्रेमात नसलेल्या व्यक्तीने प्रपोज केल्यास कसा द्याल नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 15:00 IST

काही लोक हे त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी काही महिने, काही वर्ष वेळ घेतात. पण त्यांचं हे प्रेम त्यांना न दुखवता नाकारणं ही सुद्धा एक कला आहे.

(Image Credit: www.aconsciousrethink.com)

ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याला ते प्रेम सांगणं यापेक्षा कठीण काय असू शकतं? कदाचित,  माझं तुझ्यावर प्रेम नाही, हे त्या व्यक्तीला सांगणं ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे. काही लोक हे त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी काही महिने, काही वर्ष वेळ घेतात. पण त्यांचं हे प्रेम त्यांना न दुखवता नाकारणं ही सुद्धा एक कला आहे.

एकतर तुम्ही त्या व्यक्तीला थेट नाही म्हणू शकता किंवा त्याला वाईट वाटू नये म्हणून त्याला खोटंही सांगू शकता. पण ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काहीच फिलिंग्स नाहीत अशा व्यक्तीसोबत खोटं नातं ठेवावं याहून काय त्रासदायक असू शकतं. त्यामुळे ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम नाहीये आणि त्या व्यक्तीने तुम्हाला प्रपोज केला तर त्याला नाही म्हणा. पण नाही म्हणण्याचीही एक पध्दत असायला हवी. 

1) आधी त्याचं/तिचं म्हणनं ऐकून घ्या

हे लक्षात ठेवा की, समोरच्या व्यक्तीने त्याचं तुमच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी काही महिने किंवा काही वर्ष वाट पाहिली आहे. तुम्ही त्याच्या/तिच्या या भावनांचा आदर  करायला हवा. त्याच्यावर थेट बंदुक तानण्यापेक्षा आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा त्याला/तिला काय बोलायचे आहे हे आधी शांतपणे ऐकून घ्यायला हवे. त्यानंतर विचार करुन शांतपणे तुम्ही बोलायला हवे.

2) भावनांशी प्रामाणिक राहा

एखाद्या व्यक्तीला नाही म्हणने खासकरुन जवळच्या व्यक्तींना, फार कठीण असतं. पण खोटं नातं जोपासत बसण्यापेक्षा स्वत:शी प्रामाणिक वागलेलं कधीही चांगलं. त्यामुळे उगाच चिडचिड करण्यापेक्षा त्या व्यक्तीचं ऐका आणि नंतर तुमचं उत्तर द्या. खोटं नातं निर्माण करुन पुढे पश्चातापाशिवाय काही मिळणार नाही. 

3)  खोटी आशा निर्माण करु नका

जर तुम्हाला माहीत आहे की, समोरच्या व्यक्तीवर तुमचं प्रेम नाहीये, तर त्या व्यक्तीला उगाच खोटी आशा दाखवू नका. उगाच विचार करते किंवा करतो असे सांगू नका. अनेकजण ही चूक करतात. काही लोक हे समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून 'नाही' म्हणण्यास घाबरतात. पण तुम्ही तुमचं उत्तर देण्यास उशीर कराल तर तुमच्यावर प्रेम करणारी समोरची व्यक्ती तुमच्या शांततेला सकारात्मक समजणार.

4) चिडू नका

असंही होऊ शकतं की, काहीही ध्यानीमनी नसताना तुम्हाला प्रपोजचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कदाचित तुमची पहिली रिअॅक्शन ही राग असू शकते. अशावेळी रागावणे चुकीचे आहे. परिस्थीती काय आहे हे आधी समजून घ्या. नाही तर त्या व्यक्तीला त्याचा अपमान झाल्यासारखं वाटेल. त्यामुळे त्याच्या किंवा तिच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. 

5) मैत्रीमध्ये एक सीमा ठेवा

अनेकदा मैत्रीमध्ये नकळत काही गोष्टी बोलल्या जातात, केल्या जातात. पण त्याला प्रेमाचे नाव देणे योग्य नाही. अशावेळी आधीच कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून एक सीमा आखून घेतल्यास परिस्थीती हाताबाहेर जाणार नाही. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट