शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पार्टनरच्या वागण्यात बदल झालाय? जाणून घ्या कसं वाचवाल नातं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 11:36 IST

नातं कितीही घट्ट का असेना त्यात छोटे मोठे खटके उडतच असतात. तुम्ही आणि तुमचा पार्टनर जर समजदार असाल तर हे छोट्या वादांमधून तुमचं नातं अधिक मजबूत होऊ शकतं.

नातं कितीही घट्ट का असेना त्यात छोटे मोठे खटके उडतच असतात. तुम्ही आणि तुमचा पार्टनर जर समजदार असाल तर हे छोट्या वादांमधून तुमचं नातं अधिक मजबूत होऊ शकतं. पण अनेकांना हे जमत नसल्याने अडचणी वाढतात. एका शोधानुसार, ७० टक्के नाती यासाठी बिघडतात कारण एका पार्टनरला असं वाटतं की, दुसऱ्या पार्टनरचा व्यवहार बदलला आहे. अशात नात्यात सतत भांडणे होऊ लागतात. पण यातून बाहेर येण्यासाठी आणि अतिसंवेदनशील पार्टनरला अशा स्थितीमध्ये कसं हाताळायचं याची काही उदाहरणे देता येतील.

का तुटतं नातं?

नात्यांमध्ये अडचणी येण्याची सुरुवात गैरसमजांमधून होते. विनाकारणच्या गोष्टींवरुन गैरसमज होतात आणि त्यातून भांडणं वाढतात. आणि एका काळानंतर या कारणांमुळे नात्यात राग आणि व्देष निर्माण होतो. या गैरसमजांमुळेच अनेकदा दोन्ही व्यक्ती एकमेकांप्रति सहानुभूती गमावून बसतात. त्यांना हे नातं ओझं वाटायला लागत असतं. 

अनेक मुद्द्यांवर महिला आणि पुरुष स्वत:ला श्रेष्ठ समजतात. पण अशावेळी दोघांपैकी एकानेही समजदारपणा घेतला नाही तर समस्या अधिक वाढू शकते. याचा अर्थ हा नाही की, तुम्ही सगळंकाही सहन करत जावं. योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेवर प्रश्नांची उत्तरे द्या. नात्यामध्ये एकमेकांवर विश्वास ठेवणे फार गरजेचे असते. आपल्या पार्टनरला याची जाणिव करुन द्या. 

काय बदलतो व्यवहार?

कोणत्याही नात्यामध्ये दोन्ही व्यक्तींना आपल्या नात्याप्रति काही जबाबदाऱ्या आणि काही मागण्या असतात. असे शक्य नाहीये की, ज्याप्रकारे तुम्ही आधी मित्र होतात तसंच वागणं नातं प्रेमात बदलल्यावर असेल. मैत्रीतून प्रेमाच्या नात्यात अडकलेले व्यक्ती सुरुवातीला तर गमती-जमती करतात, पण प्रेमात नंतर काही गोष्टी बदलतात. आधीसारखं तुम्हाला वागता येत नाही. पण ही बदलेली परिस्थिती त्याच्यात झालेल्या बदलाला कारणीभूत असते.  

प्रत्येक नात्याची गरज वेगळी

प्रत्येक नात्याच्या गरजा वेगळ्या असतात. कुठे तुम्हाला मोठेपणाची भूमिका घ्यावी लागते तर कुठे तुम्हाला लहान बनून ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या नात्याच्या गरजा समजून घेणे आणि त्यानुसार वागणे दोघांचीही जबाबदारी असते. असे केल्याने दोघांनाही नातं टिकवण्यास मदत होते. कधी कधी पार्टनरच्या बदलत्या व्यवहाराला सहन करणे कठीण होऊन बसतं. त्यामुळे नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. पण अशातच तुम्हाला संयमाने आणि डोकं शांत ठेवून विचार करायचा असतो. 

कसे कराल पार्टनरसोबत डील

कोणतही नातं वाचवण्यासाठी ते नातं भावनात्मक रुपाने स्विकारणं गरजेचं असतं. अनेकजण सुरुवातीच्या काही काळात आपल्या पार्टनरसोबत याबाबत बोलण्यास टाळाटाळ करतात. पण याच कारणाने दोघांमधील दरी आणखी वाढते. संवाद हा कोणत्याही नात्यातील महत्वाचा भाग आहे. तो नीट नसेल तर नातं अडचणीत येतं. याने तुमच्या पार्टनरच्या वागण्यात फरक पडलेला असू शकतो. अशावेळी तुम्ही हे समजून घेणं गरजेचं असतं तुम्ही मोकळेपणाने व्यक्त व्हा. पार्टनरच्या आतापर्यत न समजलेल्या भावना समजून घ्या. त्याच्याशी बोला आणि अडचण दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमचं नातं केवळ तुम्हीच वाचवू शकता इतर कुणीच नाही. 

भूतकाळातील संबंधांना समजून घेण्यास ज्या चुका तुमच्याकडून झाल्या असतील त्याच तुमच्या पार्टनरकडून झाल्या असतील. ही वेळ त्यातून शिकण्याची आणि नात्यात विश्वास निर्माण करण्याची आहे. सकारात्मक विचार आणि योग्य संवाद नातं आणखी मजबूत करण्यास नक्कीच मदत करतं.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट