शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

पार्टनरच्या वागण्यात बदल झालाय? जाणून घ्या कसं वाचवाल नातं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 11:36 IST

नातं कितीही घट्ट का असेना त्यात छोटे मोठे खटके उडतच असतात. तुम्ही आणि तुमचा पार्टनर जर समजदार असाल तर हे छोट्या वादांमधून तुमचं नातं अधिक मजबूत होऊ शकतं.

नातं कितीही घट्ट का असेना त्यात छोटे मोठे खटके उडतच असतात. तुम्ही आणि तुमचा पार्टनर जर समजदार असाल तर हे छोट्या वादांमधून तुमचं नातं अधिक मजबूत होऊ शकतं. पण अनेकांना हे जमत नसल्याने अडचणी वाढतात. एका शोधानुसार, ७० टक्के नाती यासाठी बिघडतात कारण एका पार्टनरला असं वाटतं की, दुसऱ्या पार्टनरचा व्यवहार बदलला आहे. अशात नात्यात सतत भांडणे होऊ लागतात. पण यातून बाहेर येण्यासाठी आणि अतिसंवेदनशील पार्टनरला अशा स्थितीमध्ये कसं हाताळायचं याची काही उदाहरणे देता येतील.

का तुटतं नातं?

नात्यांमध्ये अडचणी येण्याची सुरुवात गैरसमजांमधून होते. विनाकारणच्या गोष्टींवरुन गैरसमज होतात आणि त्यातून भांडणं वाढतात. आणि एका काळानंतर या कारणांमुळे नात्यात राग आणि व्देष निर्माण होतो. या गैरसमजांमुळेच अनेकदा दोन्ही व्यक्ती एकमेकांप्रति सहानुभूती गमावून बसतात. त्यांना हे नातं ओझं वाटायला लागत असतं. 

अनेक मुद्द्यांवर महिला आणि पुरुष स्वत:ला श्रेष्ठ समजतात. पण अशावेळी दोघांपैकी एकानेही समजदारपणा घेतला नाही तर समस्या अधिक वाढू शकते. याचा अर्थ हा नाही की, तुम्ही सगळंकाही सहन करत जावं. योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेवर प्रश्नांची उत्तरे द्या. नात्यामध्ये एकमेकांवर विश्वास ठेवणे फार गरजेचे असते. आपल्या पार्टनरला याची जाणिव करुन द्या. 

काय बदलतो व्यवहार?

कोणत्याही नात्यामध्ये दोन्ही व्यक्तींना आपल्या नात्याप्रति काही जबाबदाऱ्या आणि काही मागण्या असतात. असे शक्य नाहीये की, ज्याप्रकारे तुम्ही आधी मित्र होतात तसंच वागणं नातं प्रेमात बदलल्यावर असेल. मैत्रीतून प्रेमाच्या नात्यात अडकलेले व्यक्ती सुरुवातीला तर गमती-जमती करतात, पण प्रेमात नंतर काही गोष्टी बदलतात. आधीसारखं तुम्हाला वागता येत नाही. पण ही बदलेली परिस्थिती त्याच्यात झालेल्या बदलाला कारणीभूत असते.  

प्रत्येक नात्याची गरज वेगळी

प्रत्येक नात्याच्या गरजा वेगळ्या असतात. कुठे तुम्हाला मोठेपणाची भूमिका घ्यावी लागते तर कुठे तुम्हाला लहान बनून ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या नात्याच्या गरजा समजून घेणे आणि त्यानुसार वागणे दोघांचीही जबाबदारी असते. असे केल्याने दोघांनाही नातं टिकवण्यास मदत होते. कधी कधी पार्टनरच्या बदलत्या व्यवहाराला सहन करणे कठीण होऊन बसतं. त्यामुळे नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. पण अशातच तुम्हाला संयमाने आणि डोकं शांत ठेवून विचार करायचा असतो. 

कसे कराल पार्टनरसोबत डील

कोणतही नातं वाचवण्यासाठी ते नातं भावनात्मक रुपाने स्विकारणं गरजेचं असतं. अनेकजण सुरुवातीच्या काही काळात आपल्या पार्टनरसोबत याबाबत बोलण्यास टाळाटाळ करतात. पण याच कारणाने दोघांमधील दरी आणखी वाढते. संवाद हा कोणत्याही नात्यातील महत्वाचा भाग आहे. तो नीट नसेल तर नातं अडचणीत येतं. याने तुमच्या पार्टनरच्या वागण्यात फरक पडलेला असू शकतो. अशावेळी तुम्ही हे समजून घेणं गरजेचं असतं तुम्ही मोकळेपणाने व्यक्त व्हा. पार्टनरच्या आतापर्यत न समजलेल्या भावना समजून घ्या. त्याच्याशी बोला आणि अडचण दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमचं नातं केवळ तुम्हीच वाचवू शकता इतर कुणीच नाही. 

भूतकाळातील संबंधांना समजून घेण्यास ज्या चुका तुमच्याकडून झाल्या असतील त्याच तुमच्या पार्टनरकडून झाल्या असतील. ही वेळ त्यातून शिकण्याची आणि नात्यात विश्वास निर्माण करण्याची आहे. सकारात्मक विचार आणि योग्य संवाद नातं आणखी मजबूत करण्यास नक्कीच मदत करतं.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट