शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

प्रेमात पडल्यावर मुलांमध्ये काय बदल होतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 16:45 IST

गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलाचं जीवन बदलून जातं. हे काही वेगळं सांगायला नको. गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलांकडे मित्रांसाठी वेळ नसतो.

अलिकडे प्रत्येक दुस-या तरुणाच्या जीवनात एक तरी गर्लफ्रेन्ड असतेच. गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलाचं जीवन बदलून जातं. हे काही वेगळं सांगायला नको. गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलांकडे मित्रांसाठी वेळ नसतो. याचा आनुभव अनेकांना आला असेल. तसेच अनेक बदल बघायला मिळतात. तुमच्याही मित्रांनी तुम्हाला काहीतरी कारण देत कलटी मारली असेलच!

गर्लफ्रेन्ड जीवनात आल्यावर मुलं सर्वातआधी खोटं बोलायला शिकतात. गर्लफ्रेन्डला राग येऊन नये यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारची कारणी देत असतो. पण प्रेम मुलांना फक्त वाईटच सवयी शिकवतं असं नाहीये. काही चांगल्याही सवयी प्रेमात शिकायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे महिलांचा सन्मान करणं.

प्रेमात पडल्यावर बेशिस्त मुलांना वेळेचं अधिक महत्व पटतं. जे आधी कधीही समजलेलं नसतं. गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी वेळेत पोहचण्यासोबतच मुलं ऑफिसमध्येही वेळेवर पोहचतात. प्रेमात पडलेला मुलगा हा आपल्या मित्रांनाही करिअर आणि नात्याचे डोज देऊ लागतो.

मुलांना जर चांगली पार्टनर मिळाली तर त्यांचं आयुष्य सुखी होतं. ते योग्य मार्गाने जगू लागतात. यासोबतच प्रेमात पडलेला मुलगा आपल्या जबाबदा-या समजून घेण्यालाही सुरूवात करत असतो. प्रत्येक नात्याला महत्व देणं सुरू करतो. 

सर्वात मोठा बदल म्हणजे जबाबदारी समजून घेणं ही आहे. कारण प्रेमात पडणं सोपं आहे पण ते नातं टिकवून ठेवणं. मजा-मस्तीसोबत करिअर सांभाळणं. वेगळ्याच विचारांच्या पार्टनरला समजून घेणे हे बदल देखील मुलांमध्ये बघायला मिळतात. प्रेम हे करायला सोपं वाटतं पण ते शेवटपर्यंत टिकणं जरा कठिण आहे पण अशक्य नाही. 

अनेक वाद-विवाद होतात. पण अशातही ऎकमेकांवरचा विश्वास तुटू न देणं महत्वाचं असतं. अनेकांमध्ये हे दिसत नाही. छोट्या छोट्या कारणांनी नातं तोडण्याकडे अनेकांचा कल दिसतो.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट