शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात पडल्यावर मुलांमध्ये काय बदल होतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 16:45 IST

गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलाचं जीवन बदलून जातं. हे काही वेगळं सांगायला नको. गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलांकडे मित्रांसाठी वेळ नसतो.

अलिकडे प्रत्येक दुस-या तरुणाच्या जीवनात एक तरी गर्लफ्रेन्ड असतेच. गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलाचं जीवन बदलून जातं. हे काही वेगळं सांगायला नको. गर्लफ्रेन्ड जीवनात येताच मुलांकडे मित्रांसाठी वेळ नसतो. याचा आनुभव अनेकांना आला असेल. तसेच अनेक बदल बघायला मिळतात. तुमच्याही मित्रांनी तुम्हाला काहीतरी कारण देत कलटी मारली असेलच!

गर्लफ्रेन्ड जीवनात आल्यावर मुलं सर्वातआधी खोटं बोलायला शिकतात. गर्लफ्रेन्डला राग येऊन नये यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारची कारणी देत असतो. पण प्रेम मुलांना फक्त वाईटच सवयी शिकवतं असं नाहीये. काही चांगल्याही सवयी प्रेमात शिकायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे महिलांचा सन्मान करणं.

प्रेमात पडल्यावर बेशिस्त मुलांना वेळेचं अधिक महत्व पटतं. जे आधी कधीही समजलेलं नसतं. गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी वेळेत पोहचण्यासोबतच मुलं ऑफिसमध्येही वेळेवर पोहचतात. प्रेमात पडलेला मुलगा हा आपल्या मित्रांनाही करिअर आणि नात्याचे डोज देऊ लागतो.

मुलांना जर चांगली पार्टनर मिळाली तर त्यांचं आयुष्य सुखी होतं. ते योग्य मार्गाने जगू लागतात. यासोबतच प्रेमात पडलेला मुलगा आपल्या जबाबदा-या समजून घेण्यालाही सुरूवात करत असतो. प्रत्येक नात्याला महत्व देणं सुरू करतो. 

सर्वात मोठा बदल म्हणजे जबाबदारी समजून घेणं ही आहे. कारण प्रेमात पडणं सोपं आहे पण ते नातं टिकवून ठेवणं. मजा-मस्तीसोबत करिअर सांभाळणं. वेगळ्याच विचारांच्या पार्टनरला समजून घेणे हे बदल देखील मुलांमध्ये बघायला मिळतात. प्रेम हे करायला सोपं वाटतं पण ते शेवटपर्यंत टिकणं जरा कठिण आहे पण अशक्य नाही. 

अनेक वाद-विवाद होतात. पण अशातही ऎकमेकांवरचा विश्वास तुटू न देणं महत्वाचं असतं. अनेकांमध्ये हे दिसत नाही. छोट्या छोट्या कारणांनी नातं तोडण्याकडे अनेकांचा कल दिसतो.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट