शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचं ‘क्रेडिट’ मुलांनाच देता, की त्यावर ‘हक्क’ सांगता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 13:25 IST

मुलांचा आत्मविश्वास नाहीतर वाढेल कसा?

ठळक मुद्देलहानपणापासूनच मुलांना जबाबदारी शिकवायला हवी.लहानपणापासून घेतलेली ही जबाबदारी मुलांमधला आत्मविश्वास वाढवते.मुलं जर त्यात यशस्वी झाली, तर त्याचं क्रेडिट मात्र त्यांचं त्यांनाच दिलं जायला हवं.

- मयूर पठाडेमुलं कधीच कोणतीच जबाबदारी घेत नाहीत, अशी अनेक पालकांची नेहेमीची तक्रार असते. त्यासाठी ते मुलांना कायम दुषणंही देत असतात. ‘इतक्या वेळा तुला सांगावं लागतं, पण आजपर्यंत तू ऐकलं असेल तर शपथ..’ असे बोल कायम ते त्याला ऐकवतही असतात. अर्थातच ते प्रत्येक वेळी खरं असतंच असं नाही. मूल एकही जबाबदारी घेत नाही, असं नसतं. बºयाचदा जबाबदारी टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो, हे खरं असलं तरी जेव्हा जेव्हा आपली मुलं जबाबदारी घेतात, घेऊ पाहातात, तेव्हा त्यांना आपण किती उत्तेजन देतो, त्यांच्या त्या कृतीचं कितीवेळा कौतुक करतो हा प्रश्नही आपण स्वत:ला विचारायला हवा.मुलं जबाबदार व्हावीत यासाठी काय कराल?मुळात जबाबदारी ही एका रात्रीतून येत नाही आणि जादूची छडी फिरवल्यासारखं अचानक कोणी जबाबदार बनतही नाही. त्यासाठी लहानपणापासूनच मुलांना जबाबदारी शिकवायला हवी.अर्थातच मुलाचं वय काय आहे, त्यानुसारच आणि त्याला झेपणारी अशीच जबाबदारी त्याच्यावर टाकायला हवी. त्यात तो चुकला तरी त्याच्यावर न ओरडता त्याच्या पाठीशीच उभं राहायला हवं.लहानपणापासून घेतलेली ही जबाबदारी मुलं जसजशी मोठी होत जातील, तसतशी त्यांच्या खूपच उपयोगी पडेल आणि त्यांच्यातला आत्मविश्वासही वाढेल.एकदा का जबाबदारी घेण्याची सवय लागली की मग त्याचं उत्तरदायीत्वही त्यांना दिलं पाहिजे. एखादी जबाबदारी त्यांनी योग्य रीतीनं पार पाडली, तर त्याचं सारं क्रेडिट मुलांनाच जायला हवं. त्याचं क्रेडिट जर पालकांनी घ्यायचा प्रयत्न केला, ‘बघ, मी सांगितलं, त्याचा फायदा झाला की नाही, असंच माझं ऐकत जा..’ असं कधी आडून, कधी प्रत्यक्ष जर क्रेडिट घ्यायचा प्रयत्न पालकांनी केला, तर त्याचा उलटच परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.जबाबदारी घेतल्यानंतर त्याचा परिणाम जर चुकीचा झाला, तर मुलांना आणखी संधी दिली पाहिजे. ‘तुला काहीच कळत नाही, सांगितलं होतं ना, नको करूस म्हणून..’ असं केलं तर जबाबदारी घेण्यापासून मुलं लांबच राहतील आणि मोठेपणीही कोणताही निर्णय घेण्यापासून ते घाबरतील.जबाबदारी घेण्याचं योग्य ते स्पष्टीकरण देतानाच त्यांना सारखे उपदेशाचे डोस न पाजता, योग्यतेचं भान आपणही पाळलं तरी मुलं नक्कीच एकामागे एक जबाबदाºया स्वीकारतात. चुकांतून शिकतात आणि झटपट पुढे जातात. नैराश्यापासून कायम लांब राहातात..