शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

मुलांचं ‘क्रेडिट’ मुलांनाच देता, की त्यावर ‘हक्क’ सांगता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 13:25 IST

मुलांचा आत्मविश्वास नाहीतर वाढेल कसा?

ठळक मुद्देलहानपणापासूनच मुलांना जबाबदारी शिकवायला हवी.लहानपणापासून घेतलेली ही जबाबदारी मुलांमधला आत्मविश्वास वाढवते.मुलं जर त्यात यशस्वी झाली, तर त्याचं क्रेडिट मात्र त्यांचं त्यांनाच दिलं जायला हवं.

- मयूर पठाडेमुलं कधीच कोणतीच जबाबदारी घेत नाहीत, अशी अनेक पालकांची नेहेमीची तक्रार असते. त्यासाठी ते मुलांना कायम दुषणंही देत असतात. ‘इतक्या वेळा तुला सांगावं लागतं, पण आजपर्यंत तू ऐकलं असेल तर शपथ..’ असे बोल कायम ते त्याला ऐकवतही असतात. अर्थातच ते प्रत्येक वेळी खरं असतंच असं नाही. मूल एकही जबाबदारी घेत नाही, असं नसतं. बºयाचदा जबाबदारी टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो, हे खरं असलं तरी जेव्हा जेव्हा आपली मुलं जबाबदारी घेतात, घेऊ पाहातात, तेव्हा त्यांना आपण किती उत्तेजन देतो, त्यांच्या त्या कृतीचं कितीवेळा कौतुक करतो हा प्रश्नही आपण स्वत:ला विचारायला हवा.मुलं जबाबदार व्हावीत यासाठी काय कराल?मुळात जबाबदारी ही एका रात्रीतून येत नाही आणि जादूची छडी फिरवल्यासारखं अचानक कोणी जबाबदार बनतही नाही. त्यासाठी लहानपणापासूनच मुलांना जबाबदारी शिकवायला हवी.अर्थातच मुलाचं वय काय आहे, त्यानुसारच आणि त्याला झेपणारी अशीच जबाबदारी त्याच्यावर टाकायला हवी. त्यात तो चुकला तरी त्याच्यावर न ओरडता त्याच्या पाठीशीच उभं राहायला हवं.लहानपणापासून घेतलेली ही जबाबदारी मुलं जसजशी मोठी होत जातील, तसतशी त्यांच्या खूपच उपयोगी पडेल आणि त्यांच्यातला आत्मविश्वासही वाढेल.एकदा का जबाबदारी घेण्याची सवय लागली की मग त्याचं उत्तरदायीत्वही त्यांना दिलं पाहिजे. एखादी जबाबदारी त्यांनी योग्य रीतीनं पार पाडली, तर त्याचं सारं क्रेडिट मुलांनाच जायला हवं. त्याचं क्रेडिट जर पालकांनी घ्यायचा प्रयत्न केला, ‘बघ, मी सांगितलं, त्याचा फायदा झाला की नाही, असंच माझं ऐकत जा..’ असं कधी आडून, कधी प्रत्यक्ष जर क्रेडिट घ्यायचा प्रयत्न पालकांनी केला, तर त्याचा उलटच परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.जबाबदारी घेतल्यानंतर त्याचा परिणाम जर चुकीचा झाला, तर मुलांना आणखी संधी दिली पाहिजे. ‘तुला काहीच कळत नाही, सांगितलं होतं ना, नको करूस म्हणून..’ असं केलं तर जबाबदारी घेण्यापासून मुलं लांबच राहतील आणि मोठेपणीही कोणताही निर्णय घेण्यापासून ते घाबरतील.जबाबदारी घेण्याचं योग्य ते स्पष्टीकरण देतानाच त्यांना सारखे उपदेशाचे डोस न पाजता, योग्यतेचं भान आपणही पाळलं तरी मुलं नक्कीच एकामागे एक जबाबदाºया स्वीकारतात. चुकांतून शिकतात आणि झटपट पुढे जातात. नैराश्यापासून कायम लांब राहातात..