शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्लेसह यांत काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

मुलांचं ‘क्रेडिट’ मुलांनाच देता, की त्यावर ‘हक्क’ सांगता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 13:25 IST

मुलांचा आत्मविश्वास नाहीतर वाढेल कसा?

ठळक मुद्देलहानपणापासूनच मुलांना जबाबदारी शिकवायला हवी.लहानपणापासून घेतलेली ही जबाबदारी मुलांमधला आत्मविश्वास वाढवते.मुलं जर त्यात यशस्वी झाली, तर त्याचं क्रेडिट मात्र त्यांचं त्यांनाच दिलं जायला हवं.

- मयूर पठाडेमुलं कधीच कोणतीच जबाबदारी घेत नाहीत, अशी अनेक पालकांची नेहेमीची तक्रार असते. त्यासाठी ते मुलांना कायम दुषणंही देत असतात. ‘इतक्या वेळा तुला सांगावं लागतं, पण आजपर्यंत तू ऐकलं असेल तर शपथ..’ असे बोल कायम ते त्याला ऐकवतही असतात. अर्थातच ते प्रत्येक वेळी खरं असतंच असं नाही. मूल एकही जबाबदारी घेत नाही, असं नसतं. बºयाचदा जबाबदारी टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो, हे खरं असलं तरी जेव्हा जेव्हा आपली मुलं जबाबदारी घेतात, घेऊ पाहातात, तेव्हा त्यांना आपण किती उत्तेजन देतो, त्यांच्या त्या कृतीचं कितीवेळा कौतुक करतो हा प्रश्नही आपण स्वत:ला विचारायला हवा.मुलं जबाबदार व्हावीत यासाठी काय कराल?मुळात जबाबदारी ही एका रात्रीतून येत नाही आणि जादूची छडी फिरवल्यासारखं अचानक कोणी जबाबदार बनतही नाही. त्यासाठी लहानपणापासूनच मुलांना जबाबदारी शिकवायला हवी.अर्थातच मुलाचं वय काय आहे, त्यानुसारच आणि त्याला झेपणारी अशीच जबाबदारी त्याच्यावर टाकायला हवी. त्यात तो चुकला तरी त्याच्यावर न ओरडता त्याच्या पाठीशीच उभं राहायला हवं.लहानपणापासून घेतलेली ही जबाबदारी मुलं जसजशी मोठी होत जातील, तसतशी त्यांच्या खूपच उपयोगी पडेल आणि त्यांच्यातला आत्मविश्वासही वाढेल.एकदा का जबाबदारी घेण्याची सवय लागली की मग त्याचं उत्तरदायीत्वही त्यांना दिलं पाहिजे. एखादी जबाबदारी त्यांनी योग्य रीतीनं पार पाडली, तर त्याचं सारं क्रेडिट मुलांनाच जायला हवं. त्याचं क्रेडिट जर पालकांनी घ्यायचा प्रयत्न केला, ‘बघ, मी सांगितलं, त्याचा फायदा झाला की नाही, असंच माझं ऐकत जा..’ असं कधी आडून, कधी प्रत्यक्ष जर क्रेडिट घ्यायचा प्रयत्न पालकांनी केला, तर त्याचा उलटच परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.जबाबदारी घेतल्यानंतर त्याचा परिणाम जर चुकीचा झाला, तर मुलांना आणखी संधी दिली पाहिजे. ‘तुला काहीच कळत नाही, सांगितलं होतं ना, नको करूस म्हणून..’ असं केलं तर जबाबदारी घेण्यापासून मुलं लांबच राहतील आणि मोठेपणीही कोणताही निर्णय घेण्यापासून ते घाबरतील.जबाबदारी घेण्याचं योग्य ते स्पष्टीकरण देतानाच त्यांना सारखे उपदेशाचे डोस न पाजता, योग्यतेचं भान आपणही पाळलं तरी मुलं नक्कीच एकामागे एक जबाबदाºया स्वीकारतात. चुकांतून शिकतात आणि झटपट पुढे जातात. नैराश्यापासून कायम लांब राहातात..