शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

उतरवा मुलाला ‘हरभऱ्याच्या झाडावरून’..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 16:29 IST

त्यावरुन ‘पडलं’ तर मग पुन्हा कधीच ‘उभं’ राहणार नाही..

ठळक मुद्देमुलांचं कौतुक जरुर करा, पण त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका.आव्हानं पूर्ण केल्यानंतर मिळणारा आनंद किती उच्च कोटीचा असतो, हेही मुलांना कळायला हवंपडण्यातली आणि पुन्हा उभं राहण्यातली, साऱ्या आव्हानांना तोंड देण्यातली गंमत मुलांना कळली, तर त्यांच्यातली हिंमत त्यांना कुठल्या कुठे घेऊन जाईल..

- मयूर पठाडेमुलांना मारू नये, त्यांच्यावर चिडचिड करू नये, रागाच्या भरात त्यांना अद्वातद्वा बोलू नये.. कायम त्यांच्याशी गोड आणि प्रेमानंच बोलावं, हे सगळं सगळं खरं.. पण मुलांनी काहीही केलं तरी त्याला ‘बरोबर’च म्हटलं पाहिजे आणि त्यांचं ‘कौतुक’च केलं पाहिजे असं थोडीच आहे?..अनेकदा आपण मुलांचं वारेमाप कौतुक करतो. तो जे काही करतोय, त्यानं जे काही केलंय ते किती भारी आहे, याबद्दल आपण त्यांना इतकं काही हरभऱ्याच्या झाडावर चढवतो, की मुलांनाही वाटायला लागतं आपण फारच ‘भारी’ आहोत. शिवाय वेगळं काही करण्यासाठी त्यांना मोटिव्हेशनही मिळत नाही. सततच्या कौतुकामुळे आपल्यासारखे आपणच ही भावना तर त्यांच्या मनात तयार होतेच, पण पुढे जाण्याचे त्यांचे रस्तेही बंद होतात. त्यांचे हे रस्ते आपणच बंद केलेले असतात.त्यासाठी मुलांना चॅलेंजेस दिलीच पाहिजेत. अर्थातच ही आव्हानं त्यांना पेलणारी आणि त्यांच्या आवाक्यातली असावीत. मूल कितीही हुशार असलं तरी त्याला काही प्रेरणा लागताताच. त्यांच्यासमोर वेगवेगळी आव्हानं ठेवताना ती पूर्ण केल्यानंतर मिळणारा आनंद किती उच्च कोटीचा असतो, हेही मूलांना कळायला हवं असतं. ते कळलं की मुलं स्वत:हून नवनवी आव्हानं स्वीकारतातया आव्हानांशी झगडताना ती कदाचित पडतील, सुरुवातीला अपयश येईल, पण म्हणून ती आव्हानंच नकोत, असंही नको. पुन्हा उभं राहून या आव्हानांचा सामना करणं मुलांना शिकवलं पाहिजे. पण त्यांचं त्यांना लढू द्या, उभं राहण्याची उभारी त्यांना जरूर द्या, पण सगळ्याच गोष्टी त्यांना बोट धरुन शिकवू नका. नाहीतर पडण्यातली आणि पुन्हा उभं राहण्यातली, साºया आव्हानांना तोंड देण्यातली गंमत त्यांना कधी कळायचीच नाही..कळू द्या त्यांना ती गंमत.. आणि त्यातला आनंद.. ती ऊर्जा मग त्यांना आयुष्यभर पुरेल..