शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

उतरवा मुलाला ‘हरभऱ्याच्या झाडावरून’..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 16:29 IST

त्यावरुन ‘पडलं’ तर मग पुन्हा कधीच ‘उभं’ राहणार नाही..

ठळक मुद्देमुलांचं कौतुक जरुर करा, पण त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका.आव्हानं पूर्ण केल्यानंतर मिळणारा आनंद किती उच्च कोटीचा असतो, हेही मुलांना कळायला हवंपडण्यातली आणि पुन्हा उभं राहण्यातली, साऱ्या आव्हानांना तोंड देण्यातली गंमत मुलांना कळली, तर त्यांच्यातली हिंमत त्यांना कुठल्या कुठे घेऊन जाईल..

- मयूर पठाडेमुलांना मारू नये, त्यांच्यावर चिडचिड करू नये, रागाच्या भरात त्यांना अद्वातद्वा बोलू नये.. कायम त्यांच्याशी गोड आणि प्रेमानंच बोलावं, हे सगळं सगळं खरं.. पण मुलांनी काहीही केलं तरी त्याला ‘बरोबर’च म्हटलं पाहिजे आणि त्यांचं ‘कौतुक’च केलं पाहिजे असं थोडीच आहे?..अनेकदा आपण मुलांचं वारेमाप कौतुक करतो. तो जे काही करतोय, त्यानं जे काही केलंय ते किती भारी आहे, याबद्दल आपण त्यांना इतकं काही हरभऱ्याच्या झाडावर चढवतो, की मुलांनाही वाटायला लागतं आपण फारच ‘भारी’ आहोत. शिवाय वेगळं काही करण्यासाठी त्यांना मोटिव्हेशनही मिळत नाही. सततच्या कौतुकामुळे आपल्यासारखे आपणच ही भावना तर त्यांच्या मनात तयार होतेच, पण पुढे जाण्याचे त्यांचे रस्तेही बंद होतात. त्यांचे हे रस्ते आपणच बंद केलेले असतात.त्यासाठी मुलांना चॅलेंजेस दिलीच पाहिजेत. अर्थातच ही आव्हानं त्यांना पेलणारी आणि त्यांच्या आवाक्यातली असावीत. मूल कितीही हुशार असलं तरी त्याला काही प्रेरणा लागताताच. त्यांच्यासमोर वेगवेगळी आव्हानं ठेवताना ती पूर्ण केल्यानंतर मिळणारा आनंद किती उच्च कोटीचा असतो, हेही मूलांना कळायला हवं असतं. ते कळलं की मुलं स्वत:हून नवनवी आव्हानं स्वीकारतातया आव्हानांशी झगडताना ती कदाचित पडतील, सुरुवातीला अपयश येईल, पण म्हणून ती आव्हानंच नकोत, असंही नको. पुन्हा उभं राहून या आव्हानांचा सामना करणं मुलांना शिकवलं पाहिजे. पण त्यांचं त्यांना लढू द्या, उभं राहण्याची उभारी त्यांना जरूर द्या, पण सगळ्याच गोष्टी त्यांना बोट धरुन शिकवू नका. नाहीतर पडण्यातली आणि पुन्हा उभं राहण्यातली, साºया आव्हानांना तोंड देण्यातली गंमत त्यांना कधी कळायचीच नाही..कळू द्या त्यांना ती गंमत.. आणि त्यातला आनंद.. ती ऊर्जा मग त्यांना आयुष्यभर पुरेल..