शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तुमची गर्लफ्रेन्ड तुम्हाला इग्नोर करते का? ही असू शकतात कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 13:23 IST

असं होण्याला कोणतही एक कारण नसतं. हे घडण्याला एकापेक्षा जास्त कारणे असू शकतात. ही कारणे काय असू शकतात हे जाणून घेऊया...

मस्त मजेत सुरु असलेलं तुमचं रिलेशन एकाएकी अडचणीत येतं. कारण अचानकपणे तुमची गर्लपफ्रेन्ड तुम्हाला इग्नोर करु लागते. याचं नेमकं कारण कळू न शकल्याने तुम्हीही विचार करुन करुन हैराण झालेले असता. पण असं होण्याला कोणतही एक कारण नसतं. हे घडण्याला एकापेक्षा जास्त कारणे असू शकतात. ही कारणे काय असू शकतात हे जाणून घेऊया...

* प्रत्येकवेळी तर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेन्डजवळ असू शकत नाही. पण मुलींना असं वाटतं की, त्यांच्या नात्याला थोडी स्पेस मिळावी. तिला असं वाटतं की आपल्या पार्टनरसाठी सरप्राईस प्लान करावा. पण जर तुम्ही तिला एकटच सोडणार नाहीतर तर ती हे सगळं कसं करेल? अशात तिला तुमचा कंटाळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती तुम्हासा इग्नोर करू लागण्याची शक्यता आहे. 

* असेही होऊ शकते की, ती तिच्या करिअरबद्दल किंवा एखाद्या गोष्टीवरुन स्ट्रेसमध्ये असेल. आणि त्यामुळे कदाचित ती तुम्हाला इग्नोर करत असेल. प्रत्येकजण स्ट्रेस घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. अशात तिला काही दिवसांसाठी एकटं सोडलं तर जास्त फायद्याचं होईल.

* कधी कधी इनसिक्यूरिटी फिल होत असल्याने मुली आपल्या बॉयफ्रेन्डला इग्नोर करतात. अशात याची तुम्ही घ्यायला हवी. तिला असं अजिबात फिल होऊ देऊ नका. अशाने तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं. या गोष्टींचीही भीती असते की, काहीतरी गैरसमज झालेला असेल आणि तिला काही कळत नसेल.

* काही मुली स्वभावाने खूप जास्त लाज-या असतात. हे सुद्धा तुम्हाला इग्नोर करण्याचं कारण असू शकतं. कदाचित तिला हे कळत नसेल की तुमच्याशी कसं बोलावं. अशात तिला थोडा वेळ देणं अधिक गरजेचं आणि महत्वाचं ठरेल. काही मुली ह्या पूर्णपणे मॅच्युअर नसतात. प्रेमाचं नातं कसं टिकवायचं, त्यात कसं वागायचं हे त्यांना कळत नसतं. अशात तुम्ही तिला समजावून सांगा.

* यासोबतच तुमची गर्लफ्रेन्ड तुम्हाला इग्नोर करण्याचं आणखी एक कारण असू शकतं. ते म्हणजे कदाचित ती तुम्हाला चिट करत असेल. आणि त्यामुळे ती तुमच्याशी नजर मिळवत नसेल. चोराच्या मनात चांदणं तशी ही गोष्ट आहे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिप