शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

साखरपुडा झाल्यावर अनेकदा 'या' चुका करतात कपल्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 12:25 IST

मग बोलण्यातून असू शकतात किंवा वागण्यातून. त्यामुळे लग्नाआधी होणाऱ्या जोडीदारासोबत बोलताना काही गोष्टींची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. चला जाणून घेऊया काही चुका ज्या कपल्स करतात. 

(Image Credit: jurnas.com)

साखरपुडा आणि लग्नादरम्यानचा काळ हा कपल्ससाठी फारच महत्वपूर्ण असतो. अलिकडे साखरपुड्यानंतर लगेल कपल्स फोनवर बोलू लागतात किंवा इंटरनेटच्या माध्यमातून संवाद साधतात. या काळात प्रेमाची भावना सातव्या आसमानावर असते. याच काळात कपल्स भविष्याबाबत अनेक स्वप्ने बघतात आणि रंगवतात. काहींना भेटण्याची संधी असेल तर भेटीही घेतात. या सगळ्यामागे एकमेकांना जाणून घेण्याची भावना असते. 

हे खरंय की, लग्नाआधी एकमेकांना जाणून घेणे गरजेचे आहे पण अनेकदा काही कपल्स यादरम्यानच्या काळात अशा काही चुका करतात की त्यामुळे नातं प्रभावित होण्याची शक्यता असते. मग बोलण्यातून असू शकतात किंवा वागण्यातून. त्यामुळे लग्नाआधी होणाऱ्या जोडीदारासोबत बोलताना काही गोष्टींची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. चला जाणून घेऊया काही चुका ज्या कपल्स करतात. 

आपल्याबाबत वाढवून सांगणे

लग्नाआधीच्या पहिल्या भेटीत अनेकदा कपल्स हे एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी स्वत:बाबत मोठमोठ्या बढाया मारतात. काही चुकीच्याही गोष्टी सांगतात. पण हे सांगताना काहीजण हे विसरतात की, समोरचा व्यक्ती त्याच्या घरातीलच नाहीतर आयुष्याचा भाग होणार आहे. पुढे जाऊन सगळंकाही त्याला कळणारच आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टी खोट्या सांगू नये नाहीतर याने नात्यात दरी निर्माण होऊ शकते.

प्रामाणिक न राहणे

अनेकदा कपल्स लग्नाआधी आपल्याबाबत खोटं सांगतात जे फार चुकीचं आहे. आपल्या भूतकाळाबाबत आपल्या पार्टनरला खरं सांगायला हवं. नंतर त्याबाबत माहिती मिळाल्यावर तुमच्या पार्टनरला धक्काही बसू शकतो. पण हे सांगण्याआधी आपल्या पार्टनरचा स्वभाव कसा आहे हे जाणून घ्या त्यानंतरच या गोष्टी सांगा.

लग्नाआधी स्वत:वर कंट्रोल ठेवत नाहीत

अनेकदा कपल्स साखरपुडा झाला की, एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेले असतात. ते लग्नांपर्यंत वाट पाहू शकत नाहीत. अशात बोलण्यापर्यंत, ऐकमेकांना जाणून घेण्यापर्यंत ठिक आहे पण लग्नाआधी फिजिकल रिलेशन ठेवणे चुकीचं ठरु शकतं. जर लग्नाआधीच तुम्ही तुमच्या पार्टनरमागे या गोष्टीसाठी तगादा लावत असाल, त्याबाबत सतत बोलत असाल तर यामुळे तुमच्या पार्टनरच्या नजरेत तुमचं चुकीचं इम्प्रेशन पडू शकतं. 

जास्त बोलणंही नाही चांगलं

सगळेच लग्न जुळल्यावर आपल्या पार्टनरसोबत बोलण्यासाठी उत्सुक असतात. अनेकजण जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत बोलण्यात घालवतात. संवाद योग्यच आहे पण लग्नाआधी इतकंही बोलू नये की, लग्नानंतर तुमच्यात काही रोमांच उरणार नाही. आताच पार्टनरला सगळं सांगितलं तर लग्नानंतर काय सांगाल?

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न