शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

साखरपुडा झाल्यावर अनेकदा 'या' चुका करतात कपल्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 12:25 IST

मग बोलण्यातून असू शकतात किंवा वागण्यातून. त्यामुळे लग्नाआधी होणाऱ्या जोडीदारासोबत बोलताना काही गोष्टींची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. चला जाणून घेऊया काही चुका ज्या कपल्स करतात. 

(Image Credit: jurnas.com)

साखरपुडा आणि लग्नादरम्यानचा काळ हा कपल्ससाठी फारच महत्वपूर्ण असतो. अलिकडे साखरपुड्यानंतर लगेल कपल्स फोनवर बोलू लागतात किंवा इंटरनेटच्या माध्यमातून संवाद साधतात. या काळात प्रेमाची भावना सातव्या आसमानावर असते. याच काळात कपल्स भविष्याबाबत अनेक स्वप्ने बघतात आणि रंगवतात. काहींना भेटण्याची संधी असेल तर भेटीही घेतात. या सगळ्यामागे एकमेकांना जाणून घेण्याची भावना असते. 

हे खरंय की, लग्नाआधी एकमेकांना जाणून घेणे गरजेचे आहे पण अनेकदा काही कपल्स यादरम्यानच्या काळात अशा काही चुका करतात की त्यामुळे नातं प्रभावित होण्याची शक्यता असते. मग बोलण्यातून असू शकतात किंवा वागण्यातून. त्यामुळे लग्नाआधी होणाऱ्या जोडीदारासोबत बोलताना काही गोष्टींची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. चला जाणून घेऊया काही चुका ज्या कपल्स करतात. 

आपल्याबाबत वाढवून सांगणे

लग्नाआधीच्या पहिल्या भेटीत अनेकदा कपल्स हे एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी स्वत:बाबत मोठमोठ्या बढाया मारतात. काही चुकीच्याही गोष्टी सांगतात. पण हे सांगताना काहीजण हे विसरतात की, समोरचा व्यक्ती त्याच्या घरातीलच नाहीतर आयुष्याचा भाग होणार आहे. पुढे जाऊन सगळंकाही त्याला कळणारच आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टी खोट्या सांगू नये नाहीतर याने नात्यात दरी निर्माण होऊ शकते.

प्रामाणिक न राहणे

अनेकदा कपल्स लग्नाआधी आपल्याबाबत खोटं सांगतात जे फार चुकीचं आहे. आपल्या भूतकाळाबाबत आपल्या पार्टनरला खरं सांगायला हवं. नंतर त्याबाबत माहिती मिळाल्यावर तुमच्या पार्टनरला धक्काही बसू शकतो. पण हे सांगण्याआधी आपल्या पार्टनरचा स्वभाव कसा आहे हे जाणून घ्या त्यानंतरच या गोष्टी सांगा.

लग्नाआधी स्वत:वर कंट्रोल ठेवत नाहीत

अनेकदा कपल्स साखरपुडा झाला की, एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेले असतात. ते लग्नांपर्यंत वाट पाहू शकत नाहीत. अशात बोलण्यापर्यंत, ऐकमेकांना जाणून घेण्यापर्यंत ठिक आहे पण लग्नाआधी फिजिकल रिलेशन ठेवणे चुकीचं ठरु शकतं. जर लग्नाआधीच तुम्ही तुमच्या पार्टनरमागे या गोष्टीसाठी तगादा लावत असाल, त्याबाबत सतत बोलत असाल तर यामुळे तुमच्या पार्टनरच्या नजरेत तुमचं चुकीचं इम्प्रेशन पडू शकतं. 

जास्त बोलणंही नाही चांगलं

सगळेच लग्न जुळल्यावर आपल्या पार्टनरसोबत बोलण्यासाठी उत्सुक असतात. अनेकजण जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत बोलण्यात घालवतात. संवाद योग्यच आहे पण लग्नाआधी इतकंही बोलू नये की, लग्नानंतर तुमच्यात काही रोमांच उरणार नाही. आताच पार्टनरला सगळं सांगितलं तर लग्नानंतर काय सांगाल?

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न