शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

सावधान: मुलांसमोर भांडताय? मग मुलांना गमावून बसाल!

By admin | Updated: May 10, 2017 18:07 IST

मुलांसमोर कचाकचा भांडणाऱ्या पालकांच्या मुलांच्या मनावर होतात गंभीर दुष्परिणाम

-डॉ. अनिल मोकाशीआई वडिलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघतांना मुलांच्या रक्तात कॉरटीसोल नावाचे हार्मोन वाढते. मुलांना असुरिक्षत वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनावर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो. आईवडिलांच्या भांडणात मुलं काळजीने घेरली जातात. घाबरतात. भेदरतात. त्यांना वाटतं त्यांच्यामुळेच भांडणं होत आहेत. त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते. आईवडील विभक्त होतील, घटस्फोट घेतील अशी त्यांना भिती वाटते. या तणावाखाली ती शाळेपेक्षा भांडणावरच आपलं लक्ष केंद्रित करतात. वर्ग पुढे जातो. ती अभ्यासात मागे पडतात. एकाग्रता कमी होते. अवधानकाळ (कॉन्संट्रेशन) कमी होतो. त्यांची वर्तणूक बदलते. एकलकोंडी होतात. हसत नाहीत. कशात रस घेत नाहीत. हरवतात. चिडचिड, उलट बोलणे, उद्धटपणा, बेफिकीर वृत्ती, कुठेही दुखणे, अस्वस्थता, नैराश्य, नखे खाणे, गादी ओली करणे, बोबडेपणा, शाळा बुडविणे, आक्र मकता, इतरांशी न पटणे अशा पायरी पायरीने गंभीर मानिसक समस्या येऊ लागतात.मुलांच्या शैक्षणिक पिछेहाटीसाठी, वर्तणूक समस्यांसाठी मुलांना दोष देण्याआधी, त्यात कौटुंबिक भांडणाचा भाग किती याचा विचार करायला हवा. आई वडिलांनी भांडताना स्वत:वर मर्यादा घालून घ्यायला हव्यात. त्या पाळायला हव्या.

भांडण होतेय असे वाटले तर काय करावे?शांत रहावे. एक ते दहा आकडे म्हणून रागावर ताबा मिळवावा. राग शांत झाल्यावर समस्येवर चर्चा करावी. मोजून मापून, स्पष्टपणे योग्य शब्दात बोलावे. माफी मागायला व माफ करायला शिकावे. सहसंमतीने मधूनच पाणी, चहा इतर गोष्टींसाठी भांडण विश्रांती घ्यावी. ब्रेक घ्यावा. भांडताना काय करू नये?मारहाण, धक्काबुक्की, धमकावणे नको. शिविगाळ, निंदानालस्ती, सात पिढयांचा उद्धार नको. निघून जाऊ नये. त्याने प्रश्न सुटत नाही. किंचाळून, खेकसून बोलणे नको. जाहीर भांडण नको. मुलांना भांडणात ओढायला नको. फक्त वयस्कांचे, लैंगिक, पैसे, सासुरवाडी असे विषय मुलांसमोर नको. जुन्या चुका, जुने मुद्दे उकरून उकरून भांङण नको.भांडण होतेच पण..थोडीशी नोकझोक, वादविवाद हवेच. तो संसाराचा एक भाग असतो. अगदी बंद दाराआड, कुजबुजत भाडांयची काही गरज नाही. आपल्या रागाला कुणाशी तरी बोलूंन वाट मोकळी करु न देणं आवश्यक असते. कुटुंबियांनी आपल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करायला हव्यात. रागाच्या भरात बोललेले सगळेच खरे नसते हे मुलांना सांगायला हवे. कितीही भांडले तरी आईवडील एकमेकांवर प्रेम करतात. हे त्यांना समजायला हवे. मुलांनी आई वडिलांना भांडताना बघितल्यावर जुळवून घेतानांही बघायला हवे. त्यातून ते जीवनात तडजोड किती आवश्यक आहे, जूळवून कसे घ्यावे हे शिकतील.पण भांडणं वारंवार व जास्त काळ चालणारी, जास्त तीव्रतेची होऊ लागली, तर सल्ला घ्यावा. दोघांचाही विश्वास असेल अशा वडीलधाऱ्या व्यक्तीचा किंवा मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा. त्यातच संपूर्ण कुटुंबाचं हित आहे. भांडणाचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक समस्या, दारूचं हाताबाहेर गेलेले व्यसन, जुगार, पावित्र्याबद्द्ल शंका असे प्रश्न समुपदेनातुन उघड होतात. त्यांचे निवारण करता येते.म्हणून म्हणतो, आईबाबांनो, भांडा, पण जरा जपून, तुमची मुले बघताहेत, ऐकताहेत, तेच शिकताहेत.( लेखक बारामतीस्थित सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत.) dranilmokashi@gmail.com