शहरं
Join us  
Trending Stories
1
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
2
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
3
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
6
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
7
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
8
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
9
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
10
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
11
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
12
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
13
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
14
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
15
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
16
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
17
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
18
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
19
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
20
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा

सावधान: मुलांसमोर भांडताय? मग मुलांना गमावून बसाल!

By admin | Updated: May 10, 2017 18:07 IST

मुलांसमोर कचाकचा भांडणाऱ्या पालकांच्या मुलांच्या मनावर होतात गंभीर दुष्परिणाम

-डॉ. अनिल मोकाशीआई वडिलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघतांना मुलांच्या रक्तात कॉरटीसोल नावाचे हार्मोन वाढते. मुलांना असुरिक्षत वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनावर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो. आईवडिलांच्या भांडणात मुलं काळजीने घेरली जातात. घाबरतात. भेदरतात. त्यांना वाटतं त्यांच्यामुळेच भांडणं होत आहेत. त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते. आईवडील विभक्त होतील, घटस्फोट घेतील अशी त्यांना भिती वाटते. या तणावाखाली ती शाळेपेक्षा भांडणावरच आपलं लक्ष केंद्रित करतात. वर्ग पुढे जातो. ती अभ्यासात मागे पडतात. एकाग्रता कमी होते. अवधानकाळ (कॉन्संट्रेशन) कमी होतो. त्यांची वर्तणूक बदलते. एकलकोंडी होतात. हसत नाहीत. कशात रस घेत नाहीत. हरवतात. चिडचिड, उलट बोलणे, उद्धटपणा, बेफिकीर वृत्ती, कुठेही दुखणे, अस्वस्थता, नैराश्य, नखे खाणे, गादी ओली करणे, बोबडेपणा, शाळा बुडविणे, आक्र मकता, इतरांशी न पटणे अशा पायरी पायरीने गंभीर मानिसक समस्या येऊ लागतात.मुलांच्या शैक्षणिक पिछेहाटीसाठी, वर्तणूक समस्यांसाठी मुलांना दोष देण्याआधी, त्यात कौटुंबिक भांडणाचा भाग किती याचा विचार करायला हवा. आई वडिलांनी भांडताना स्वत:वर मर्यादा घालून घ्यायला हव्यात. त्या पाळायला हव्या.

भांडण होतेय असे वाटले तर काय करावे?शांत रहावे. एक ते दहा आकडे म्हणून रागावर ताबा मिळवावा. राग शांत झाल्यावर समस्येवर चर्चा करावी. मोजून मापून, स्पष्टपणे योग्य शब्दात बोलावे. माफी मागायला व माफ करायला शिकावे. सहसंमतीने मधूनच पाणी, चहा इतर गोष्टींसाठी भांडण विश्रांती घ्यावी. ब्रेक घ्यावा. भांडताना काय करू नये?मारहाण, धक्काबुक्की, धमकावणे नको. शिविगाळ, निंदानालस्ती, सात पिढयांचा उद्धार नको. निघून जाऊ नये. त्याने प्रश्न सुटत नाही. किंचाळून, खेकसून बोलणे नको. जाहीर भांडण नको. मुलांना भांडणात ओढायला नको. फक्त वयस्कांचे, लैंगिक, पैसे, सासुरवाडी असे विषय मुलांसमोर नको. जुन्या चुका, जुने मुद्दे उकरून उकरून भांङण नको.भांडण होतेच पण..थोडीशी नोकझोक, वादविवाद हवेच. तो संसाराचा एक भाग असतो. अगदी बंद दाराआड, कुजबुजत भाडांयची काही गरज नाही. आपल्या रागाला कुणाशी तरी बोलूंन वाट मोकळी करु न देणं आवश्यक असते. कुटुंबियांनी आपल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करायला हव्यात. रागाच्या भरात बोललेले सगळेच खरे नसते हे मुलांना सांगायला हवे. कितीही भांडले तरी आईवडील एकमेकांवर प्रेम करतात. हे त्यांना समजायला हवे. मुलांनी आई वडिलांना भांडताना बघितल्यावर जुळवून घेतानांही बघायला हवे. त्यातून ते जीवनात तडजोड किती आवश्यक आहे, जूळवून कसे घ्यावे हे शिकतील.पण भांडणं वारंवार व जास्त काळ चालणारी, जास्त तीव्रतेची होऊ लागली, तर सल्ला घ्यावा. दोघांचाही विश्वास असेल अशा वडीलधाऱ्या व्यक्तीचा किंवा मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा. त्यातच संपूर्ण कुटुंबाचं हित आहे. भांडणाचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक समस्या, दारूचं हाताबाहेर गेलेले व्यसन, जुगार, पावित्र्याबद्द्ल शंका असे प्रश्न समुपदेनातुन उघड होतात. त्यांचे निवारण करता येते.म्हणून म्हणतो, आईबाबांनो, भांडा, पण जरा जपून, तुमची मुले बघताहेत, ऐकताहेत, तेच शिकताहेत.( लेखक बारामतीस्थित सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत.) dranilmokashi@gmail.com