शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कसा कमी कराल नात्यातील दुरावा? 'या' टिप्सने नात्याला द्या नवा तडका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 14:56 IST

पती-पत्नी दोघेही जेव्हा वर्किंग असतात तेव्हा दिवस कसा सुरू होतो आणि कसा संपतो हे कळतच नाही. त्यामुळे दोघांनाही एकमेकांसाठी वेळ काढणं कठीण होऊन बसतं.

पती-पत्नी दोघेही जेव्हा वर्किंग असतात तेव्हा दिवस कसा सुरू होतो आणि कसा संपतो हे कळतच नाही. त्यामुळे दोघांनाही एकमेकांसाठी वेळ काढणं कठीण होऊन बसतं. अशात एक पार्टनर जर कामानिमित्त आउट ऑफ स्टेशन राहत असेल तर दुसऱ्या पार्टनरला एकटेपणा जाणवणे सामान्य बाब आहे. अशात नात्याचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाऊ शकते. 

लाइफमध्ये ही गोष्ट गरजेची

(Image Credit : divinelifestyle.com)

आनंदी जीवनासाठी पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. हाच महत्वाचा मुद्दा आहे, ज्याने नात्याची जवळीकता टिकून राहते. पण असं गरजेचं नाही की, आपण नेहमीच असं करू शकू. अनेकदा परिस्थिती साथ देत नाही आणि आयुष्याच्या वेगळ्या गोष्टीवर अधिक लक्ष द्यावं लागतं.

नकळत होऊ लागतं असं

(Image Credit : bustle.com)

दोन्ही पार्टनरने सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे. याने एकमेकांची भावनिक गरज भागते आणि दोघांचीही जवळीकता अधिक मजबूत होते. पण कामाच्या वाढत्या तणावामुळे नकळत आपण याकडे कानाडोळा करू लागतो. इथूनच एकटेपणाची भावना वरचढ होऊ लागते.

मूडी होतात असे पार्टनर

(Image Credit : amansquest.com)

ज्या महिलांचे पती जास्त वेळ घराच्या बाहेर राहतात आणि दिवसातून केवळ १० ते १५ मिनिट पत्नीसोबत बोलू शकतात, अशा महिला नेहमीच एकटेपणाच्या भावनेने वेढल्या जातात. याचा त्यांच्या मूडवर वाईट प्रभाव पडतो. स्थिती उलट असेल तर पुरूषांसोबतही असंच होतं.

वाढते पार्टनरची जबाबदारी

(Image Credit : montcalmroyallondoncity.co.uk)

तुम्ही जर तुमच्या पार्टनरपेक्षा जास्त वेळ बिझी राहत असाल आणि पार्टनरला वेळ देऊ शकत नसाल, तर जमेल तसा फिरायला जाण्याचा प्लॅन करायला हवा. जेणेकरून पर्सनल लाइफ बॅलन्स राहील.

असे राहू शकता कनेक्टेड

(Image Credit : m.weddingwire.com)

जर तुमचा पार्टनर बिझनेस आणि कामामुळे दुसऱ्या शहरात किंवा देशात जात असेल तर अर्थातच तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची फार संधी मिळत नसेल. गरजेचं नाही की, तो तुमच्यासाठी सतत मोबाइलवर राहील. पण तुम्ही त्यांना रोमॅंटिक मेसेज करूच शकता. 

कायम राहते जवळीकता आणि समजूतदारपणा

(Image Credit : zoosk.com)

वेळेच्या कमतरतेमुळे आपल्या फीलिंग्स पार्टनरसोबक शेअर करू शकत नसाल तर तुम्ही त्यांना मेल करू शकता. अंतर हे फिजिकल असलं पाहिजे, इमोशनल नाही. जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते तुम्हाला रिप्लाय करतीलच. यादरम्यान तुम्हाला एक वेगळ्याच लेव्हलची जवळीकता जाणवेल. कारण शब्दांमध्ये फार ताकद असते.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप