शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'हे' ७ संकेत सांगतात त्याची नात्यात होत आहे घुसमट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 11:40 IST

जर प्रेम एकतर्फी असेल तर ते यशस्वी होत नाही. असं प्रेम फुलण्याआधीच संपतं. पण नात्यात दोघांपैकी एकाच्याही मनात निराशा आली तर याचा नात्यावर फार वाईट प्रभाव पडतो.

जर प्रेम एकतर्फी असेल तर ते यशस्वी होत नाही. असं प्रेम फुलण्याआधीच संपतं. पण नात्यात दोघांपैकी एकाच्याही मनात निराशा आली तर याचा नात्यावर फार वाईट प्रभाव पडतो. अशात नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर आलं येतं.

अनेकदा असं आढळतं की, महिला पार्टनर किंवा नात्यासंबंधी काही अडचणी असतील तर त्या खुलेपणाने सांगतात. किंवा भांडण करत समोरच्या व्यक्तीवर सगळंकाही वाईट केल्याचा आरोप लावतात. पण असं निरीक्षण आहे की, मुलं पुरुष याबाबत जरा वेगळे असतात. ते लगेच आपल्या मनातील व्यक्त करत नाहीत. पण त्यांचं वागणं सगळंकाही सांगतं.

१) सतत बदलणारा मूड

आनंदी होण्याचं कारण कुणालाही जाणून घ्यायचं नसतं. कारण आनंद हा सर्वांनाच हवा असतो. पण समोरचा दु:खी आहे. निराश आहे, चिडचिड करतोय तर यांचं कारण तुम्हाला शोधायचं असतं. मात्र अनेक प्रयत्न करुनही जर काही कारण सापडत नसेल तर अडचणी आणखी वाढतात. एका मुलगा जेव्हा आपल्या नात्यात हरलेला असतो तेव्हा त्याला कोणत्याही कारणाशिवाय निराशा आणि राग जाणवतो.

२) बोलणं कमी होणे

मुलांना कधीही खूप जास्त बोलणारे किंवा बडबडे मानलं जात नाही. कपलमध्ये बोलणी सुरु करण्याची जबाबदारी ही जास्तकरुन मुलींची असते. पण एकदा जर एखादा मुलगा कुणावर मनापासून प्रेम करायला लागला तर तो त्या व्यक्तीशी खूपकाही बोलतो. पण अचानक त्याचं गुप्प राहणं हा चांगला संकेत नाहीये. 

३) चूक मान्य करण्यास नकार

त्यांच्याकडून चुका आधीही होत होत्या आणि आजही होतात. फरक केवळ इतकाच आहे की, आधी तो आपली चूक मान्य करुन परत येत होता आणि माफी मागत होता. पण आता ना तो त्याची चूक मान्य करत आहे, ना परत येऊ माफी मागत आहे. 

४) सतत चुका काढणे

स्वत:ची चूक मान्य न करणे हे त्या व्यक्तीचा बिघडलेला मूड दाखवतो. पण जेव्हा ते पूर्णपणे हताश झालेले असतात तेव्हा ते आपल्या पार्टनरमधील चुका मोजायला लागतात. भलेही समोरच्या व्यक्तीची चूक असो वा नसो, त्यांना पार्टनरची प्रत्येक गोष्ट चूक वाटायला लागते. 

५) कोणतही प्लॅन नसणे

रिलेशनशिपच्या काही महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर फिरायला जाणे आणि सरप्राइज देणे यांसारखे प्लॅन कमी होणे स्वाभाविक आहे. ही मोठी गोष्ट नाहीये. पण यावर फुल स्टॉप लागणे, ही नकारात्मक गोष्ट आहे. ही फार गंभीर बाब असून यावर बोलणे गरजेचे आहे. 

६) तुमची किंमत कमी होणे

एकेकाळी पार्टनरच्या प्रत्येक प्लॅनमध्ये तुम्ही असाल किंवा नसाल तुमचं मत घेतलं जातं होतं. पण आता पार्टनर काय करतोय? कुठे जातोय? कुठून आला? हे तुम्हाला माहीत नाही. आणि याबाबत काही विचारलं तर यावर चिडचिड केली जाते.

७) कारणे देणे

स्वत:हून जवळ न येणे त्याचा कमी होणारा इंटरेस्ट दर्शवतो. पण तुम्ही पुढे जाऊनही जर पार्टनर इंटरेस्ट घेत नसेल तर हा गंभीर संकेत आहे. कधी मूड नसण्याचं कारण देणे तर कधी आजारी असल्याचं कारण देणे. जर या कारणांची संख्या वाढली तर तुम्हाला वेळीच यावर उपाय शोधण्याची गरज आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट