शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

'हे' ७ संकेत सांगतात त्याची नात्यात होत आहे घुसमट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 11:40 IST

जर प्रेम एकतर्फी असेल तर ते यशस्वी होत नाही. असं प्रेम फुलण्याआधीच संपतं. पण नात्यात दोघांपैकी एकाच्याही मनात निराशा आली तर याचा नात्यावर फार वाईट प्रभाव पडतो.

जर प्रेम एकतर्फी असेल तर ते यशस्वी होत नाही. असं प्रेम फुलण्याआधीच संपतं. पण नात्यात दोघांपैकी एकाच्याही मनात निराशा आली तर याचा नात्यावर फार वाईट प्रभाव पडतो. अशात नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर आलं येतं.

अनेकदा असं आढळतं की, महिला पार्टनर किंवा नात्यासंबंधी काही अडचणी असतील तर त्या खुलेपणाने सांगतात. किंवा भांडण करत समोरच्या व्यक्तीवर सगळंकाही वाईट केल्याचा आरोप लावतात. पण असं निरीक्षण आहे की, मुलं पुरुष याबाबत जरा वेगळे असतात. ते लगेच आपल्या मनातील व्यक्त करत नाहीत. पण त्यांचं वागणं सगळंकाही सांगतं.

१) सतत बदलणारा मूड

आनंदी होण्याचं कारण कुणालाही जाणून घ्यायचं नसतं. कारण आनंद हा सर्वांनाच हवा असतो. पण समोरचा दु:खी आहे. निराश आहे, चिडचिड करतोय तर यांचं कारण तुम्हाला शोधायचं असतं. मात्र अनेक प्रयत्न करुनही जर काही कारण सापडत नसेल तर अडचणी आणखी वाढतात. एका मुलगा जेव्हा आपल्या नात्यात हरलेला असतो तेव्हा त्याला कोणत्याही कारणाशिवाय निराशा आणि राग जाणवतो.

२) बोलणं कमी होणे

मुलांना कधीही खूप जास्त बोलणारे किंवा बडबडे मानलं जात नाही. कपलमध्ये बोलणी सुरु करण्याची जबाबदारी ही जास्तकरुन मुलींची असते. पण एकदा जर एखादा मुलगा कुणावर मनापासून प्रेम करायला लागला तर तो त्या व्यक्तीशी खूपकाही बोलतो. पण अचानक त्याचं गुप्प राहणं हा चांगला संकेत नाहीये. 

३) चूक मान्य करण्यास नकार

त्यांच्याकडून चुका आधीही होत होत्या आणि आजही होतात. फरक केवळ इतकाच आहे की, आधी तो आपली चूक मान्य करुन परत येत होता आणि माफी मागत होता. पण आता ना तो त्याची चूक मान्य करत आहे, ना परत येऊ माफी मागत आहे. 

४) सतत चुका काढणे

स्वत:ची चूक मान्य न करणे हे त्या व्यक्तीचा बिघडलेला मूड दाखवतो. पण जेव्हा ते पूर्णपणे हताश झालेले असतात तेव्हा ते आपल्या पार्टनरमधील चुका मोजायला लागतात. भलेही समोरच्या व्यक्तीची चूक असो वा नसो, त्यांना पार्टनरची प्रत्येक गोष्ट चूक वाटायला लागते. 

५) कोणतही प्लॅन नसणे

रिलेशनशिपच्या काही महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर फिरायला जाणे आणि सरप्राइज देणे यांसारखे प्लॅन कमी होणे स्वाभाविक आहे. ही मोठी गोष्ट नाहीये. पण यावर फुल स्टॉप लागणे, ही नकारात्मक गोष्ट आहे. ही फार गंभीर बाब असून यावर बोलणे गरजेचे आहे. 

६) तुमची किंमत कमी होणे

एकेकाळी पार्टनरच्या प्रत्येक प्लॅनमध्ये तुम्ही असाल किंवा नसाल तुमचं मत घेतलं जातं होतं. पण आता पार्टनर काय करतोय? कुठे जातोय? कुठून आला? हे तुम्हाला माहीत नाही. आणि याबाबत काही विचारलं तर यावर चिडचिड केली जाते.

७) कारणे देणे

स्वत:हून जवळ न येणे त्याचा कमी होणारा इंटरेस्ट दर्शवतो. पण तुम्ही पुढे जाऊनही जर पार्टनर इंटरेस्ट घेत नसेल तर हा गंभीर संकेत आहे. कधी मूड नसण्याचं कारण देणे तर कधी आजारी असल्याचं कारण देणे. जर या कारणांची संख्या वाढली तर तुम्हाला वेळीच यावर उपाय शोधण्याची गरज आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट