शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

तुम्हाला या सवयी असतील तर तुमचं रिलेशनशिप आहे धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 11:31 IST

छोट्या छोट्या गोष्टीवरुन अलिकडे नाती तोडली जातात. प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नाच्या नात्यात वेगवेगळ्या अडचणींचा सामना अनेकांना करावा लागतो.

(Image Credit : Beliefnet)

रिलेशनशिप टिकवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते. छोट्या छोट्या गोष्टीवरुन अलिकडे नाती तोडली जातात. प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नाच्या नात्यात वेगवेगळ्या अडचणींचा सामना अनेकांना करावा लागतो. व्यक्तींमधील अनेक सवयी याला अनेकदा कारणीभूत असतात. तुमच्या सवयी जर चुकीच्या असतील किंवा तुमच्याशीच केंद्रीत असतील तर तुमचं रिलेशनशिप धोक्यात आहे. अशाच काही सवयींची माहिती आम्ही तुम्हाला करून देत आहोत ज्यामुळे तुमचं नातं धोक्यात असू शकतं. 

१) स्वत:वर जास्त प्रेम करणे

अनेक वर्ष एकटे राहिल्यानेही असं होऊ शकतं. तुम्हाला स्वत:वर जास्त प्रेम असतं. तुमच्यासोबत कितीही चांगला, कितीही सुंदर, कितीही हुशार व्यक्ती असला तरी तुम्हाला दुस-याचं काहीच वाटत नसतं. तुम्ही स्वत:मध्येच गुंग असता. मी या शब्दापलिकडे तुम्ही कधीही बघत नसाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. मीपणा हा मनुष्याचा मोठा शत्रू आहे. जर तो तुमच्यात असेल तर तुम्ही कधीही कुणासोबत रिलेशनमध्ये राहू शकणार नाहीत. तुमच्याशी कुणालाही नातं जोडावं वाटणार नाही. कारण तुम्हाला समोरच्या व्यक्तीपेक्षा स्वत:त जास्त रस आहे.

२) कमिटमेंटची भीती वाटणे

कोणत्याही नात्यात काही वेळानंतर कमिटमेंट तर करावीच लागते. कारण कमिटमेंटशिवाय नात्याचं काहीच भविष्य नाही. अशात जर तुम्ही कमिटमेंट करण्यापासून दूर पळत असाल तर तुमच्या साथीदाराच्या मनात तुमच्याविषयी अविश्वास निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम म्हणजे काही दिवसात तो तुम्हाला सोडू शकतो. कमिटमेंट न करणं किंवा त्यापासून दूर पळणं हे नात्याला संपवतं. अशात एकतर साथीदारासोबत कमिटमेंट करा नाहीतर एकटे रहा. 

३) स्वातंत्र्य 

जोपर्यंत तुम्ही सिंगल असता तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाने काहीही करू शकता. कुणीही तुम्हाला काहीही म्हणणार नाही. पण तेच जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल किंवा तुम्ही कुणाच्या प्रेमात असाल तर त्यांच्याकडून तुम्हाला अनेक गोष्टींची विचारणा होऊ शकते. प्रत्येक गोष्टीला अडसरही केला जाऊ शकतो. अशात जर तुम्हाला स्वत:त काहीही बदल करायचा नाहीये, तुम्ही तुमच्या स्वातंत्र्यात मश्गूल असाल तर तुम्ही रिलेशनमध्ये राहू शकत नाही.

४) जोडीदारापेक्षा फोनमध्ये जास्त लक्ष

अलिकडे हे प्रमाण खूप वाढलंय. अनेकजण जोडीदारापेक्षा मोबाईल फोनमध्ये डोकं घालून बसलेले असतात. अनेक पत्नी मोबाईलला त्यांची सवत समजतात. कारण त्यांचे पती २४ तास मोबाईलला चिकटलेले असतात. असंच तुमच्याही नात्यात होऊ शकतं. तुम्ही गर्लफ्रेन्ड किंवा बॉयफ्रेंड तुमच्यासोबत असूनही मोबाईलमध्ये व्यस्त असाल तर तुमचं रिलेशन धोक्यात आहे.

५) मित्रांसोबत जास्त मिळतो आनंद:

अनेकजण असे असतात ज्यांना एका व्यक्तीच्या नात्यात बांधल्या जाण्यापेक्षा दोस्तांच्या गराड्यात राहण्यात जास्त आनंद असतो. मित्रांसोबत कुठेही जायला तुम्ही एका पायावर उभे असता. पण जर तेच तुमच्या जोडीदारासोबत कुठे जायचं म्हटलं तर तुमच्या जीवावर येत असेल तर तुम्ही आधीच सावध व्हा. तुमच्या जोडीदारालाही वेळ देणं हे तुमचं कर्तव्य आहे.

६) नेहमी आपलंच सांगणं:

जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तर अर्थातच तुम्ही जितक्यात तुमच्या गोष्टी शेअर करता तेवढ्याच गोष्टी तुमच्या जोडीदारालाही शेअर कराव्या वाटत असेलच. पण केवळ तुम्ही तुमचीच पिपाणी वाजवत राहिले तर या नात्यात संवाद कसा होईल. दुस-याचंही ऎकून घेण्याची तुमची तयारी हवी. दुस-यांचं ऎकणं आणि ते समजणं हे खूप महत्वाच आहे. जर तुम्ही असं करत नसाल तर तुम्ही रिलेशनमध्ये राहू शकत नाही.

७) बेजबाबदार वागणं:

तुमचा बेजबाबदारपणा तुम्हाला एकटं पाडू शकतो. जर तुम्ही स्वत:वर लक्ष देत नसाल तर तुमच्याकडे कुणालाही तुम्ही आकर्षित करू शकणार नाही. तसंच जर तुम्ही जबाबदार नसाल तर एका व्यक्ती, त्या व्यक्तीच्या गरजांची जबाबदारी कशी पेलणार…? त्यामुळे जर तुम्ही बेजबाबदार असाल तर तुम्ही एकटेच राहणार….नाहीतर तुमचं नातं तुटणार…. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप