शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पाच वर्षांनंतर पती-पत्नीच्या नात्यात होतात हे 7 बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 12:07 IST

नवीन लग्न झाल्यावर पती-पत्नी दोघेही आनंदी असतात. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर या नात्यात काही खास बदल बघायला मिळतात. ते काय असतात ते खालीलप्रमाणे पाहुयात.

एका वेळेनंतर प्रत्येक नात्यात बदल होत असतात. सगळीच नाती नेहमी एकसारखी राहत नाही. काही बदल चांगले वाटतात तर काही बदल हे नात्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जातात. नवीन लग्न झाल्यावर पती-पत्नी दोघेही आनंदी असतात. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर या नात्यात काही खास बदल बघायला मिळतात. ते काय असतात ते खालीलप्रमाणे पाहुयात.

1) हनीमून 

लग्नानंतरचं पहिलं वर्ष हे हनीमून पिरीयडसारखं असतं. आजूबाजूला सगळंच चांगलं वाटत असतं. पण जसजसे दिवस पुढे जातात, दोघेही हनीमून पिरीयडमधून बाहेर येऊ लागतात. जीवनाकडे वेगळ्या नजरेने ते पहायला लागतात. पण जे लोक या हनीमून मूडमधून बाहेर येत नाहीत, त्यांचं नातं अडचणीत येण्याची अधिक शक्यता असते. 

2) दुसरं वर्ष

लग्नाच्या दुसऱ्या वर्षात पती-पत्नी एकमेकांचे स्वभाव आणि एकमेकांच्या सवयी जाणून असतात. चांगल्या सवयीचं काही नाही, पण वाईट सवयीमुळे खटके उडायला लागतात. त्यामुळे सतत छोटी छोटी भांडणं होऊ लागतात. दुसऱ्या वर्षात आर्थिक आणि मानसिक अडचणी, तसेच फॅमिली प्लॅनिंग याचाही विचार असतो त्यामुळे रोमान्स जरा कमीच होतो. 

3) बोलणं कमी

लग्नाच्या दोन-तीन वर्षांनंतर पती-पत्नी आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतले जातात की, त्यांना एकमेकांसोबत बोलण्याची सवडच मिळत नाही. दोघेही नोकरी करणारे असले की ही समस्या अधिक होते. घर आणि ऑफिसच्या धावपळीत ते आपलं नातं मागे सोडून आले असतात. 

4) भांडणं

ज्या गोष्टी आधी खूप चांगल्या वाटायच्या त्या गोष्टींही काही काळानंतर चिड यायला लागते. मग यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणं होतात. पण दोघांपैकी एकजण समजदार असेल तर भांडण पटकन सोडवलं जाऊ शकतं. पण तसं नसेल तर कठीण आहे. 

5) आधीसारखं प्रेम

लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रेम पूर्णपणे संपतं असं नाहीये. पण ते पूर्वीसारखं राहत नाही, ते कमी होतं. आधीसारख्या रोमॅंटिक डेट्स, सरप्राईज देणं, प्रेमाच्या गोष्टी, अनेक ताससोबत बसणं हे कमी होतं. 

6) संशयाचं भूत

नात्याचा पाया हा विश्वासावर रचला जातो. एकदा विश्वास गमावला तर नातं टिकवून ठेवणं जरा कठीण होऊन बसतं. आणि विश्वास कमी झाल्यावर संशयाचं भूत डोक्यात शिरतं.  

7) नमते घेणे

प्रेम असो वा लग्न भांडण झाल्यावर कुणी एकच सॉरी म्हणतो. एकाने सॉरी म्हटलं की, दोघांमधील वाद संपतो. भांडण मिटतं. त्यामुळे दोघांपैकी असा असतोच जो आपली चुकी नसतानाही भांडण मिटवण्यासाठी सॉरी बोलतो.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न