शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई आराखडा लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:55 IST

Zp water scarcity Ratnagiri - पंचायत समित्यांकडून आराखडे देण्यास उशीर झाल्याने जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई आराखडा रखडला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अंतिम मंजुरी मिळणारा हा आराखडा यंदा अजून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादरही झालेला नाही. पंचायत समित्यांच्या दिरंगाईमुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची धावपळ उडाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा पाणीटंचाई आराखडा लांबला आराखडा मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार

रत्नागिरी : पंचायत समित्यांकडून आराखडे देण्यास उशीर झाल्याने जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई आराखडा रखडला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अंतिम मंजुरी मिळणारा हा आराखडा यंदा अजून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादरही झालेला नाही. पंचायत समित्यांच्या दिरंगाईमुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची धावपळ उडाली आहे.दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा डिसेंबरमध्ये तयार केला जातो. त्यातील त्रुटी दूर करून जानेवारीमध्ये त्याला जिल्हाधिकारी यांच्याकडून अंतिम मंजुरीही देण्यात येते. मात्र, यंदा हा आराखडा पंचायत समित्यांच्या सुस्त कारभारामुळे अजूनही रखडलेलाच आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे कारण पुढे करून तालुक्यांचे आराखडे देण्यास चालढकल करण्यात आली होती.

सन २०२१ चा जानेवारी महिना उलटला तरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या पंचायत समित्यांचे आराखडे तयार झालेले नव्हते. केवळ चिपळूण आणि दापोली या दोनच पंचायत समित्यांनी तालुक्यांचे टंचाई कृती आराखडे सादर केले होते.यंदा पाऊस उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईला उशिरा सामोरे जावे लागणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पाऊस उशिरापर्यंत सुरू होता तरीही शहरी भागामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर धावताना दिसत होते. गतवर्षी उन्हाळ्यामध्ये १६५ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली होती. त्यावर मात करण्यासाठी शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. तोही पाणीपुरवठा अपुरा होत असल्याची ओरड ग्रामीण भागातील जनतेकडून सुरू होती.गतवर्षी पाणीपुरवठा विभागाने १४ कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा सादर केला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने तो आराखडा दोन वेळा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे माघारी पाठविला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ८ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी दिली होती. त्यामध्ये ७ कोटी रुपये नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीवर आणि टँकरने पाणीपुरवठा यावर खर्च करण्यात आला होता.दरम्यान, १५ डिसेंबरपर्यंत सर्व तालुक्यांचे पाणीटंचाई कृती आराखडे सादर करण्याची सूचना पंचायत समित्यांना देण्यात आली होती. मात्र, जानेवारी २०२१ चा पंधवडा संपला तरीही हे आराखडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आले नव्हते. आठवडाभराच्या कालावधीमध्ये सर्वच तालुक्यांचे आराखडे जिल्हा परिषदेकडे आले असून त्यांची जुळवाजुळव सुरू असून लवकरच हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदwater scarcityपाणी टंचाईRatnagiriरत्नागिरी