शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई आराखडा लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:55 IST

Zp water scarcity Ratnagiri - पंचायत समित्यांकडून आराखडे देण्यास उशीर झाल्याने जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई आराखडा रखडला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अंतिम मंजुरी मिळणारा हा आराखडा यंदा अजून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादरही झालेला नाही. पंचायत समित्यांच्या दिरंगाईमुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची धावपळ उडाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा पाणीटंचाई आराखडा लांबला आराखडा मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार

रत्नागिरी : पंचायत समित्यांकडून आराखडे देण्यास उशीर झाल्याने जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई आराखडा रखडला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अंतिम मंजुरी मिळणारा हा आराखडा यंदा अजून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादरही झालेला नाही. पंचायत समित्यांच्या दिरंगाईमुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची धावपळ उडाली आहे.दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा डिसेंबरमध्ये तयार केला जातो. त्यातील त्रुटी दूर करून जानेवारीमध्ये त्याला जिल्हाधिकारी यांच्याकडून अंतिम मंजुरीही देण्यात येते. मात्र, यंदा हा आराखडा पंचायत समित्यांच्या सुस्त कारभारामुळे अजूनही रखडलेलाच आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे कारण पुढे करून तालुक्यांचे आराखडे देण्यास चालढकल करण्यात आली होती.

सन २०२१ चा जानेवारी महिना उलटला तरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या पंचायत समित्यांचे आराखडे तयार झालेले नव्हते. केवळ चिपळूण आणि दापोली या दोनच पंचायत समित्यांनी तालुक्यांचे टंचाई कृती आराखडे सादर केले होते.यंदा पाऊस उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईला उशिरा सामोरे जावे लागणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पाऊस उशिरापर्यंत सुरू होता तरीही शहरी भागामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर धावताना दिसत होते. गतवर्षी उन्हाळ्यामध्ये १६५ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली होती. त्यावर मात करण्यासाठी शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. तोही पाणीपुरवठा अपुरा होत असल्याची ओरड ग्रामीण भागातील जनतेकडून सुरू होती.गतवर्षी पाणीपुरवठा विभागाने १४ कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा सादर केला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने तो आराखडा दोन वेळा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे माघारी पाठविला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ८ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी दिली होती. त्यामध्ये ७ कोटी रुपये नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीवर आणि टँकरने पाणीपुरवठा यावर खर्च करण्यात आला होता.दरम्यान, १५ डिसेंबरपर्यंत सर्व तालुक्यांचे पाणीटंचाई कृती आराखडे सादर करण्याची सूचना पंचायत समित्यांना देण्यात आली होती. मात्र, जानेवारी २०२१ चा पंधवडा संपला तरीही हे आराखडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आले नव्हते. आठवडाभराच्या कालावधीमध्ये सर्वच तालुक्यांचे आराखडे जिल्हा परिषदेकडे आले असून त्यांची जुळवाजुळव सुरू असून लवकरच हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदwater scarcityपाणी टंचाईRatnagiriरत्नागिरी