शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

जे शिवसेनेचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार? : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 16:58 IST

गद्दारांची वृत्ती महाराष्ट्राला विकासापासून मागे खेचत आहे.

रत्नागिरी : जे ४० गद्दार शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे, महाराष्ट्राचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार? या गद्दारांना मातीत गाडा असे आवाहन युवासेना प्रमुख अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीतील शिवसंवाद यात्रेत केले. शिवसंवाद यात्रेनिमित्त रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते.

ते पुढे म्हणाले की, गद्दारांची वृत्ती महाराष्ट्राला विकासापासून मागे खेचत आहे. त्यांचे शिवसेना फोडण्याचेही प्रयत्न सुरू आहे. ज्यावेळी शिवसेना फुटेल तेव्हा महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील. सध्या ठाकरे परिवाराला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप करीत त्यांनी उपस्थित शिवसैनिक, जनतेला तुम्ही आमच्याबरोबर आहात तर तुम्ही हात उंचावून प्रेम आणि आशीर्वाद द्या, अशी भावनिक साद घातली.

स्थानिक आमदारांनी गद्दारी केली ती योग्य की अयोग्य? महाराष्ट्रात जे घाणेरडे राजकारण चालले आहे ते जनतेला पटणारे आहे का, हे मी येथील जनतेला विचारायला आलो आहे. मात्र, या ४० गद्दारांचे आम्हाला गद्दार म्हणून नका तर विश्वासघातकी म्हणा, असे निरोप येऊ लागले आहेत. आज तेच ४० आमदार स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, असे काम करत असून त्यांनी आजपर्यंतच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत एक तरी काम राज्याच्या हिताचे केले आहे का, ते दाखवून द्यावे असे आव्हान त्यांनी दिले.

वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सुमारे दीड लाख कोटीची गुंतवणूक आणि एक लाख युवकांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरात येथे नेण्यात आला. याच प्रकल्पासाठी त्यावेळचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आपण जून महिन्यापर्यंत पाठपुरावा करत होतो. मात्र, आताच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प केंद्र सरकारने गुजरातला पळवला. त्यामुळे एक लाख युवकांचा रोजगारही हिरावला, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, माजी खासदार अनंत गिते, आमदार राजन साळवी, जिल्हाध्यक्ष विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, उदय बने, प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी व अन्य नेते उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे