शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जे शिवसेनेचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार? : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 16:58 IST

गद्दारांची वृत्ती महाराष्ट्राला विकासापासून मागे खेचत आहे.

रत्नागिरी : जे ४० गद्दार शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे, महाराष्ट्राचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार? या गद्दारांना मातीत गाडा असे आवाहन युवासेना प्रमुख अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीतील शिवसंवाद यात्रेत केले. शिवसंवाद यात्रेनिमित्त रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते.

ते पुढे म्हणाले की, गद्दारांची वृत्ती महाराष्ट्राला विकासापासून मागे खेचत आहे. त्यांचे शिवसेना फोडण्याचेही प्रयत्न सुरू आहे. ज्यावेळी शिवसेना फुटेल तेव्हा महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील. सध्या ठाकरे परिवाराला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप करीत त्यांनी उपस्थित शिवसैनिक, जनतेला तुम्ही आमच्याबरोबर आहात तर तुम्ही हात उंचावून प्रेम आणि आशीर्वाद द्या, अशी भावनिक साद घातली.

स्थानिक आमदारांनी गद्दारी केली ती योग्य की अयोग्य? महाराष्ट्रात जे घाणेरडे राजकारण चालले आहे ते जनतेला पटणारे आहे का, हे मी येथील जनतेला विचारायला आलो आहे. मात्र, या ४० गद्दारांचे आम्हाला गद्दार म्हणून नका तर विश्वासघातकी म्हणा, असे निरोप येऊ लागले आहेत. आज तेच ४० आमदार स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, असे काम करत असून त्यांनी आजपर्यंतच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत एक तरी काम राज्याच्या हिताचे केले आहे का, ते दाखवून द्यावे असे आव्हान त्यांनी दिले.

वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सुमारे दीड लाख कोटीची गुंतवणूक आणि एक लाख युवकांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरात येथे नेण्यात आला. याच प्रकल्पासाठी त्यावेळचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आपण जून महिन्यापर्यंत पाठपुरावा करत होतो. मात्र, आताच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प केंद्र सरकारने गुजरातला पळवला. त्यामुळे एक लाख युवकांचा रोजगारही हिरावला, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, माजी खासदार अनंत गिते, आमदार राजन साळवी, जिल्हाध्यक्ष विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, उदय बने, प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी व अन्य नेते उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे