शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

यंदा हापूस येणार उशिरा

By admin | Updated: October 10, 2015 23:50 IST

अवकाळी पाऊस : उत्पादकतेवर होणार परिणाम

रत्नागिरी :पावसाळा संपला असून, हिवाळा ऋतू सुरू होणार आहे. ऐन पावसाळ्यात ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. एकूणच संमिश्र हवामानामुळे यंदाचे भातपीक धोक्यात आले आहे. तापमान ३४ ते ५५ अंश सेल्सियस असले तरी हवेत ९० टक्क्यापर्यंत बाष्प असल्याने नागरिक हैराण होत आहेत. हवामान खात्याने येत्या २४ तासात पावसाचा इशारा दिला आहे. एकूणच या संमिश्र हवामानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होणार आहे. एकूणच आंबा हंगाम लांबण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा तीव्र ऊन्हाच्या झळा अनुभवायला मिळत आहेत. परंतु, गेले दोन दिवस अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. आॅक्टोबर हीट सुरू होते, त्याचवेळी थंडीही सुरू होते. यावर्षी पाऊसच न झाल्यामुळे अद्याप किरकोळ स्वरूपात पालवी सुरू झाली आहे. पाऊस लागला तर पालवीसुध्दा वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपासून आंबा कलमांना पालवी सुरू होते. साधारणत: पालवी जुन होण्यासाठी ५५ ते ६० दिवस लागतात. जून, जुलैमध्ये कलमांना खते घालण्यात येतात. याच दरम्यान लवकर फळे येण्यासाठी कल्टारचाही वापर केला जातो. परंतु, यावर्षी पावसाची वाट पाहत काही शेतकऱ्यांनी कल्टार वापरलेच नाही. त्याचप्रमाणे घातलेली खते अद्याप कलमांना लागू पडलेली नाहीत. पावसाअभावी झाडांच्या मूळापर्यंत खत पोहोचलेलेच नाही. तीच अवस्था कल्टारची देखील आहे. त्यामुळे यावर्षीच्या आंबा हंगामाबद्दल उत्सुकता लागली आहे. पालवी कडक (जुन) झाल्याशिवाय मोहोर येत नाही. पावसाळा लांबला तर थंडी ऊशीरा सुरू होण्याची शक्यता आहे. एकूणच आंबा हंगामाला ऊशीर होण्याची शक्यता आहे. पाऊस कमी झाल्यामुळे थंडी कितपत पडेल याबाबत शंका आहे. ऐन पावसाळ्यात ऊन्हाळा अनुभवयास मिळाला आहे. गेले दोन दिवस हवामानात बदल झाला आहे. वारे वाहत आहेत. परंतु, शेतकरी देखील पाऊस पडून जाण्याची शक्यता वर्तवत आहेत. गतवर्षी चांगल्याप्रकारे मोहोर आला होता, इतकेच नव्हे तर चांगल्याप्रकारे फळधारणा झाली होती. परंतु, फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या अवेळीच्या पावसामुळे पीक वाया गेले. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पाऊस पडण्याऐवजी आॅक्टोबरमध्ये पाऊस पडणे इष्ट ठरेल जेणेकरून आंब्याला पालवी येणे, पाला कडक होणे, मोहोर येण्याची प्रक्रिया सुरळीत होईल, असे बागायतदारांचा सूर दिसत आहे. (प्रतिनिधी)