शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

‘जागतिक कविता दिवस’ : रत्नागिरीत नवसाहित्याचे स्वागत, संतगाथा ग्रंथांचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 17:25 IST

नवनिर्मितीचे... नवचैतन्याचे... नवसृष्टीचे स्वागत गुढी उभारून चैत्र प्रतिपदेला केले जाते. हाच धागा पकडत यंदा जनसेवा ग्रंथालयाने रत्नागिरीच्या साहित्यविश्वात प्रथमच साहित्यिक गुढी उभारली. रत्नागिरीची साहित्य चळवळ वृध्दींगत व्हावी, नवलेखकांद्वारे नवसाहित्य निर्माण व्हावे आणि अशा नवसाहित्याचे स्वागत करण्यास जनसेवा ग्रंथालय नेहमीच पुढे असेल, या उद्देशाने ही प्रतिकात्मक गुढी उभारण्यात आली होती.

ठळक मुद्देसाहित्यिक गुढीतून नवसाहित्याचे स्वागतसंतगाथा व मराठी साहित्यातील ग्रंथांचे पूजन.

रत्नागिरी :  युनेस्कोने २१ मार्च हा ‘जागतिक कविता दिवस’ म्हणून १९९९ पासून साजरा करण्याचे ठरवले. नवनिर्मितीचे... नवचैतन्याचे... नवसृष्टीचे स्वागत केले जाते. हाच धागा पकडत यंदा जनसेवा ग्रंथालयाने रत्नागिरीच्या साहित्यविश्वात प्रथमच  साहित्यिक गुढी उभारली. रत्नागिरीची साहित्य चळवळ वृध्दींगत व्हावी, नवलेखकांद्वारे नवसाहित्य निर्माण व्हावे आणि अशा नवसाहित्याचे स्वागत करण्यास जनसेवा ग्रंथालय नेहमीच पुढे असेल, या उद्देशाने ही प्रतिकात्मक गुढी उभारण्यात आली होती.गाडीतळ येथील जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात ही साहित्यिक गुढी मान्यवरांच्या उपस्थितीत उभी करण्यात आली. यावेळी गुढीला मराठी साहित्यातील विविध प्रकारांपैकी बालसाहित्य, युवा, ललित, वैचारिक अशी मासिके, पुस्तके यांची माळ बांधण्यात आली होती. साहित्यिक पताका हे या गुढीचे खास आकर्षण होते.

जनसेवाचे वाचक सरपोतदार यांनी स्वत: मराठीतील महानुभाव पंथ, ज्ञानेश्वर ते विद्यमान नामवंत लेखकांची नावे, त्यांचा साहित्यिक कालखंड व साहित्यसंपदा अशी माहिती भगव्या पताकांवर लिहिली होती. अशा या नाविन्यपूर्ण साहित्यिक पताकांचे मान्यवरांनी कौतुक केले.कार्यक्रमाच्या शुभारंभी ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी संतगाथा व मराठी साहित्यातील ग्रंथांचे पूजन केले. या साहित्यिक गुढीच्या उभारणीमागील हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले, जनसेवा ग्रंथालय रत्नागिरीची वाचन चळवळ आणि साहित्य चळवळ वृध्दींगत व्हावी, यासाठी नेहमीच प्रयत्नरत आहे. त्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम नेहमीच राबवित आले आहे.

गुढी ही चांगल्या गोष्टीच्या स्वागतासाठी उभारली जाते. नवनिर्मितीच्या स्वागताला उभारली जाते. जनसेवा ग्रंथालयाने ती रत्नागिरीतील साहित्यिक चळवळ वृध्दींगत व्हावी, तसेच नवसाहित्यिक आणि त्यांच्या नवसाहित्य निर्मितीच्या स्वागतासाठी उभारली आहे. कोकणात आणि संपूर्ण रत्नागिरीत हा एकमेव आणि पहिलाच उपक्रम आहे. या गुढी उभारणीबरोबरच वाचकांसाठी यापुढेही नाविन्यपूर्ण उपक्रम देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.या कार्यक्रमाला ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सुमित्रा बोडस, कार्यवाह राहुल कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य काळे, नानिवडेकर, भाग्यश्री पटवर्धन, अमोल पालये, ग्रंथपाल सिनकर, वाचक, सभासद, रत्नागिरीकर नागरिक, कर्मचारीवर्ग उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीliteratureसाहित्य