शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम आराखडा मंजुरीसाठी रखडले, नव्या उपाययोजनांचा आराखडा केंद्राकडे

By संदीप बांद्रे | Updated: February 14, 2024 12:42 IST

संदीप बांद्रे चिपळूण (जि. रत्नागिरी ) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुलावरील लाँचर ...

संदीप बांद्रेचिपळूण (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुलावरील लाँचर आणि तुटलेले गर्डर हटविण्यात आले. या घटनेनंतर उड्डाणपुलाचा आराखडा बदलून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. नव्या आराखड्यात दोन पिलरच्या मध्ये आणखी एक वाढीव पिलर उभारण्यात येणार आहे. मात्र, नवीन आराखड्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. बहादूरशेख नाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू करण्यात आले. मात्र, १६ ऑक्टोबर रोजी या पुलाचा काही भाग कोसळला. पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या.त्यानंतर केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या आराखड्यामध्ये बदल सुचविले होते. या बदलानुसार सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले आहेत. त्यामधील अंतर २० मीटरवर ठेवून तेथे अतिरिक्त पिलर उभा करून गर्डर सिस्टिम करण्याचे सांगण्यात आले. तसा प्रस्ताव ईगल कंपनीकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्यात आला आहे.नव्या आराखड्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच उड्डाणपुलाच्या पुढील कामास सुरुवात केली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. उड्डाणपुलाच्या कामाचा प्रस्ताव दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नसल्याने पुलाचे काम ‘जैसे थे’ आहे.

नवीन आराखड्यानुसारच कामकोकण मार्गावरच यापूर्वी ४० मीटरपेक्षा अधिक लांबीचे गाळे उभारून उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तिथे नियमित वाहतूकही सुरू आहे. त्या ठिकाणी अद्यापपर्यंत कोणत्याही अडचणी आलेल्या नाहीत. मात्र, चिपळुणातील उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर नवीन आराखडा तयार करण्यात आला. या नव्या आराखड्यानुसारच काम करण्याचे धाेरण ईगल कंपनीने स्वीकारले आहे.

  • लांबी १,८४० मीटर
  • रुंदी ४५ मीटर
  • एकूण ४६ पिलर
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण