शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम आराखडा मंजुरीसाठी रखडले, नव्या उपाययोजनांचा आराखडा केंद्राकडे

By संदीप बांद्रे | Updated: February 14, 2024 12:42 IST

संदीप बांद्रे चिपळूण (जि. रत्नागिरी ) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुलावरील लाँचर ...

संदीप बांद्रेचिपळूण (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुलावरील लाँचर आणि तुटलेले गर्डर हटविण्यात आले. या घटनेनंतर उड्डाणपुलाचा आराखडा बदलून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. नव्या आराखड्यात दोन पिलरच्या मध्ये आणखी एक वाढीव पिलर उभारण्यात येणार आहे. मात्र, नवीन आराखड्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. बहादूरशेख नाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू करण्यात आले. मात्र, १६ ऑक्टोबर रोजी या पुलाचा काही भाग कोसळला. पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या.त्यानंतर केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या आराखड्यामध्ये बदल सुचविले होते. या बदलानुसार सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले आहेत. त्यामधील अंतर २० मीटरवर ठेवून तेथे अतिरिक्त पिलर उभा करून गर्डर सिस्टिम करण्याचे सांगण्यात आले. तसा प्रस्ताव ईगल कंपनीकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्यात आला आहे.नव्या आराखड्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच उड्डाणपुलाच्या पुढील कामास सुरुवात केली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. उड्डाणपुलाच्या कामाचा प्रस्ताव दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नसल्याने पुलाचे काम ‘जैसे थे’ आहे.

नवीन आराखड्यानुसारच कामकोकण मार्गावरच यापूर्वी ४० मीटरपेक्षा अधिक लांबीचे गाळे उभारून उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तिथे नियमित वाहतूकही सुरू आहे. त्या ठिकाणी अद्यापपर्यंत कोणत्याही अडचणी आलेल्या नाहीत. मात्र, चिपळुणातील उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर नवीन आराखडा तयार करण्यात आला. या नव्या आराखड्यानुसारच काम करण्याचे धाेरण ईगल कंपनीने स्वीकारले आहे.

  • लांबी १,८४० मीटर
  • रुंदी ४५ मीटर
  • एकूण ४६ पिलर
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण